शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

सेवालाल महाराज यांच्या जयंंतीनिमित्त औरंगाबादेत उत्साहात रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 23:58 IST

संत शिरोमणी सेवालाल महाराजांच्या जयंतीचा आज अमाप उत्साह पाहावयास मिळाला. वाहन रॅलीत सहभागी होऊन शेकडो युवक वसंतराव नाईक चौकातील पुतळ्यापर्यंत आले आणि तेथे त्यांनाही मन:पूर्वक अभिवादन केले.

ठळक मुद्देलक्षवेधी रॅली : वाहनस्वार शेकडो युवक सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : संत शिरोमणी सेवालाल महाराजांच्या जयंतीचा आज अमाप उत्साह पाहावयास मिळाला. वाहन रॅलीत सहभागी होऊन शेकडो युवक वसंतराव नाईक चौकातील पुतळ्यापर्यंत आले आणि तेथे त्यांनाही मन:पूर्वक अभिवादन केले.आॅल इंडिया बंजारा टायगर्सने दुपारी क्रांतीचौकातून काढलेली वाहन रॅली लक्षवेधी ठरली. लाल रंगांचा फेटा बांधून शेकडो युवक या रॅलीत सहभागी झाले होते. हातात लाल-पांढरा आणि पिवळे रंग असलेले झेंडे होते. काही जणांच्या हातात पांढºया रंगाचेही झेंडे होते. बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबूराव पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच वाहन रॅलीत असलेल्या संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजनही त्यांनी केले.या रॅलीचे नेतृत्व आॅल इंडिया बंजारा टायगर्सचे संस्थापक अध्यक्ष व राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. अशोक राठोड, उपाध्यक्ष वनसिंग चव्हाण यांनी केले. ही रॅली सिल्लेखाना चौक, बंजारा कॉलनी, सम्राट अशोक चौक, मोंढा नाका, आकाशवाणीसमोरून सेव्हन हिल उड्डाणपुलावरून कॅनॉट प्लेस, वसंतराव नाईक चौक येथे आली आणि तेथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी बाबूराव पवार यांनी सेवालाल महाराजांबद्दल माहिती देऊन बंजारा समाज हा संघटित होणे ही काळाची गरज आहे, यावर भर दिला. सेवालाल महाराजांनी देशभरातील बंजारा समाज बंधू-भगिनींना स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली. सेवालाल महाराजांचे विचारच बंजारा समाज संघटित होण्यास कारणीभूत ठरत आहेत आणि त्यांचे प्रेरणादायी विचारच बंजारा समाजाला एक ना एक दिवस देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळवून देणार आहेत, असा आशावादही बाबूराव पवार यांनी यावेळी व्यक्त केला. अ‍ॅड. रमेश टी. राठोड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.‘लालेम लाल एकच लाल सेवालाल’, हा आवाज कुणाचा... आॅल इंडिया बंजारा टायगर्सचा, एकच टायगर, बंजारा टायगर, एक बंजारा... लाख बंजारा, जगात भारी... १५ फेब्रुवारी अशा जोशपूर्ण घोषणा रॅलीभर देण्यात आल्या.शंकर पी. चव्हाण, राकेश पवार, राजेंद्र जाधव, रमेश तोफाननाईक, बबन चव्हाण, संतोष राठोड, राजू चव्हाण, मानसिंग राठोड, शुभम चव्हाण, पंडित चव्हाण, मदन चव्हाण, गोरख चव्हाण, विजय चव्हाण, नीतेश चव्हाण, मधुर चव्हाण, आकाश चव्हाण, प्रकाश चव्हाण, साहेबराव चव्हाण, गोरख राठोड, धामसिंग राठोड, प्रताप राठोड, नीलेश जाधव, मोहन चव्हाण, देवीदास राठोड, राजू पवार, पंडित चव्हाण आदींनी या रॅलीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.