शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

राकाँचे थाळीनाद आंदोलन

By admin | Updated: October 26, 2015 00:05 IST

बीड : भाजपा सरकारच्या वर्षभराच्या काळात महागाई २०० टक्क्यांनी वाढली असून, दुष्काळात भर पडली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे

बीड : भाजपा सरकारच्या वर्षभराच्या काळात महागाई २०० टक्क्यांनी वाढली असून, दुष्काळात भर पडली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईच्या विरोधात काढलेल्या थाळीनाद आंदोलनाप्रसंगी राकाँचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर बोलत होते.अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भाजपा सत्तेवर आली आहे. परंतु जीवनावश्यक गोष्टींचे भाव वाढले आहेत. केंद्रातील मोदी सरकारला दीड वर्षाचा तर राज्यातील युती सरकारला सत्तेवर येऊन वर्ष होत आहे. या वर्षभराच्या कालावधीत महागाईने कळस गाठला आहे. ४० रूपये किलो असणारी दाळ २४० रूपयांवर जाऊन पोहचली आहे. इतर सर्व वस्तूंचे भाव दुपटीने, तिपटीने वाढले आहेत. वर्षभरातच वाढलेल्या या महागाईला भाजपा सरकारचे धोरण कारणीभूत असून या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन बिकट बनले आहे, असे डॉ. क्षीरसागर म्हणाले.महागाईचा जाब विचारून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्याच्या उद्देशाने बीड येथे राकाँ जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यशवंत उद्यान, डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात झालेल्या आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात महिला थाळी व बेलणे घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. यामुळे परिसर दणाणून गेला होता.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. क्षीरसागर म्हणाले, आघाडी सरकार असताना अनेक महत्वाचे चांगले निर्णय घेण्यात आले. आघाडी सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवले होते. भाजपचे सरकार आणि नेते हे व्यापाऱ्यांच्या हितांची धोरणे राबवत आहेत. त्यामुळे महागाईने कळस गाठला आहे.आंदोलनात जेष्ठ नेते मोईन मास्टर, शेख शफीक, विलास विधाते, अ‍ॅड. हेमा पिंपळे, हेमलता चांदणे, परमेश्वर सातपुते, अ‍ॅड. वर्षा दळवी, प्रिया डोईफोडे, शालिनी परदेशी, नगराध्यक्षा रत्नमाला दुधाळ, उपनगराध्यक्ष नसीम इनामदार, फारूक पटेल, अ‍ॅड. महेश धांडे, बबन वडमारे, विष्णू वाघमारे, गणेश वाघमारे, नागेश तांबारे, परवीन यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)