शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

गंगापूर साखर कारखान्याचा राज्य बँक आज ताबा घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:56 IST

: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राज्य सरकारच्या आदेशावरून शेतक-यांच्या ताब्यात दिलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेतल्याने विद्यमान संचालकांचा प्रदीर्घ लढा संपुष्टात आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कगंगापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राज्य सरकारच्या आदेशावरून शेतक-यांच्या ताब्यात दिलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेतल्याने विद्यमान संचालकांचा प्रदीर्घ लढा संपुष्टात आला आहे. मंगळवार, ९ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे कारखाना ताब्यात घेतला जाणार असून, याठिकाणी शेतक-यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.राज्य सरकारने गंगापूर सहकारी साखर कारखाना शेतक-यांना ताब्यात दिल्यानंतर विद्यमान संचालक मंडळाकडून येणाºया हंगामात कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने जोरात हालचाली सुरू झाल्या होत्या. राज्य सरकारकडून शेतक-यांना कारखाना चालू करणे, तसेच कारखान्याला आर्थिक मदत करण्याबाबत दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंगापूर येथील नगरपालिका निवडणूक प्रचाराप्रसंगी शब्द दिला होता; मात्र महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने शेतकºयांच्या मालकीचा कारखाना परत घेण्याच्या हालचाली सुरू केल्याने गंगापूर तालुक्यातील शेतकरी व कामगार पुन्हा अडचणीत आले आहेत.गेल्या ८ ते ९ वर्षांपूर्वी हा कारखाना ताब्यात घेऊन राजाराम फूडस् यांच्याशी कारखाना विक्रीचा व्यवहार केला होता. सदर खरेदी-विक्रीचा व्यवहार डी.आर.ए.टी. मुंबई न्यायालयाने रद्द केला होता. सतत ९ वर्षे कारखाना बंद पडल्याने शेतकरी व कामगारांवर मोठे आर्थिक संकट ओढावले असून, हजारो शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. बंद कारखान्यामुळे हजारो शेतक-यांनी स्वत:चे ऊस उत्पादन घेणे बंद केले आहे. तरीही कारखाना परिक्षेत्रात गोदावरी नदीकाठची बरीच जमीन असल्याने शेतक-यांना ऊस उत्पादन घेऊनही त्यांना नाईलाजास्तव नगर जिल्ह्यातील कारखान्यांना आपला ऊस बेभाव विकावा लागत आहे.चालू अवस्थेतील कारखाना बँकेने ताब्यात घेतला होता; मात्र राज्य सहकारी बँकेने कारखाना ताब्यात घेतल्यापासून बंद ठेवल्याने कारखान्याच्या मालमत्तेची मोठी झीज झाली आहे. ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्य शासनाचे घटनात्मक अधिकार वापरून हा कारखाना शेतकºयांच्या ताब्यात दिला होता; मात्र आता हा कारखाना पुन्हा बँकेच्या ताब्यात जात असल्याने शेतकरी संतप्त झाले.याबाबत शेतक-यांनी सोमवारी सायंकाळी ७ वाजता पोलीस निरीक्षक बिर्ला यांच्याकडे आत्मदहनाबाबत निवेदन दिल्याने पोलीसही चक्रावून गेले. निवेदनावर खंडू बाजीराव गवारे, सयाजी शंकर पंडित, सुधाकर गवारे, प्रताप शिवनाथ पवार, आशीर्वाद सजन रोडगे, मुरलीधर कोंडीबा गांधिले, सुरेश रंघाजी दारुंटे, कल्याण गायकवाड, नवनाथ भागीनाथ सुराशे, सोमीनाथ दंडे, आत्माराम लहुरे, मच्छिंद्र्र ठोंबरे, भारत पाचपुते आदी शेतक-यांच्या स्वाक्षºया आहेत.