शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

राजरोस वाळू तस्करी

By admin | Updated: September 12, 2014 00:27 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड जिल्ह्यात वाळू तस्करीच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत आहे़ जिल्ह्यात केवळ सहाच अधिकृत वाळू उपसे आहेत़ त्यातील दोनच वाळू पट्ट्यातून वाळू घेवून

व्यंकटेश वैष्णव, बीडजिल्ह्यात वाळू तस्करीच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत आहे़ जिल्ह्यात केवळ सहाच अधिकृत वाळू उपसे आहेत़ त्यातील दोनच वाळू पट्ट्यातून वाळू घेवून जाण्याचे कंत्राट संबंधित ठेकेदारांना दिलेले आहे़ असे असताना देखील सर्वच ठिकाणच्या वाळू पट्यांमधून राजरोसपणे वाळू उपसा होत आहे़ अवैध वाळू उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात पहावयास मिळत आहे़बीड जिल्हयात एकूण सहा वाळू पट्टे आहेत़ यामध्ये माजलगाव तालुक्यातील डुब्बाधडी येथे एक वाळू पट्टा आहे़ गेवराई तालुक्यात तपेनिमगाव, रामपुरी, भोगलगाव, आगर नांदूर, राक्षसभुवन या ठिकाणाहून वाळूचा उपसा होतो़ यातील केवळ दोन ठिकाणाहूनच वाळू उपसा करण्यासाठी कंत्राट दिलेले आहे़ यामध्ये आज घडीला राक्षसभुवन व रामपुरी या ठिकाणाहूनच अधिकृत वाळू उपसा केला जातो़ अधिकृत वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणावरून दिवसाकाठी शंभरच्या जवळपास ट्रक दिवसाकाठी वाहतूक करतात़ मात्र जे वाळू पट्टे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार बंद आहेत तेथून दिवसाकाठी ५० ते ६० ट्रक अवैध वाळूची तस्करी होत आहे़ प्रशासन आठ-दहा दिवसाला ५-१० दहा वाळूच्या ट्रकांवर कारवाई करून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करत आहे़ आज स्थितीला केवळ दोनच वाळूपट्टे सुरू असताना देखील बीड जिल्ह्याला वाळू भरमसाठ पुरविली जात आहे़ एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू येते कोठून, असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांनी केला आहे़याबाबत गेवराई तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की, यापुर्वी आम्ही अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे़ त्यांच्या या उत्तरावरून जिल्ह्यात अवैध वाहतूक होत असल्याच्या प्रकरणावर शिक्कामोर्तब झाला आहे़ पर्यावरण व रस्त्याची दुरावस्थाप्रचंड प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे़ या बरोबरच गेवराई तालुक्यातील ठिकठिकाणच्या वाळू पट्यांमधून वाळू भरून जाणाऱ्या जड वाहनांमुळे छोटे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहे़जिल्ह्यात वाळू तस्करांचा धिंगाणा सुरू असताना प्रशासनाने मात्र डोळ्यावर पट्टी बांधली आहे़४वाळू पट्टे कमी आणि उपसा भरमासाठ अशी स्थिती असताना कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़४अवैध वाळू उपशावर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बडगा उगारला जात आहे़४त्यामुळे साप सोडून भुई धोपटण्याचा प्रकार घडत आहे़४अवैध वाळू उपशावर कठोर कारवाईची आवश्यकता आहे़