शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

राजरोस वाळू तस्करी

By admin | Updated: September 12, 2014 00:27 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड जिल्ह्यात वाळू तस्करीच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत आहे़ जिल्ह्यात केवळ सहाच अधिकृत वाळू उपसे आहेत़ त्यातील दोनच वाळू पट्ट्यातून वाळू घेवून

व्यंकटेश वैष्णव, बीडजिल्ह्यात वाळू तस्करीच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत आहे़ जिल्ह्यात केवळ सहाच अधिकृत वाळू उपसे आहेत़ त्यातील दोनच वाळू पट्ट्यातून वाळू घेवून जाण्याचे कंत्राट संबंधित ठेकेदारांना दिलेले आहे़ असे असताना देखील सर्वच ठिकाणच्या वाळू पट्यांमधून राजरोसपणे वाळू उपसा होत आहे़ अवैध वाळू उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात पहावयास मिळत आहे़बीड जिल्हयात एकूण सहा वाळू पट्टे आहेत़ यामध्ये माजलगाव तालुक्यातील डुब्बाधडी येथे एक वाळू पट्टा आहे़ गेवराई तालुक्यात तपेनिमगाव, रामपुरी, भोगलगाव, आगर नांदूर, राक्षसभुवन या ठिकाणाहून वाळूचा उपसा होतो़ यातील केवळ दोन ठिकाणाहूनच वाळू उपसा करण्यासाठी कंत्राट दिलेले आहे़ यामध्ये आज घडीला राक्षसभुवन व रामपुरी या ठिकाणाहूनच अधिकृत वाळू उपसा केला जातो़ अधिकृत वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणावरून दिवसाकाठी शंभरच्या जवळपास ट्रक दिवसाकाठी वाहतूक करतात़ मात्र जे वाळू पट्टे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार बंद आहेत तेथून दिवसाकाठी ५० ते ६० ट्रक अवैध वाळूची तस्करी होत आहे़ प्रशासन आठ-दहा दिवसाला ५-१० दहा वाळूच्या ट्रकांवर कारवाई करून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करत आहे़ आज स्थितीला केवळ दोनच वाळूपट्टे सुरू असताना देखील बीड जिल्ह्याला वाळू भरमसाठ पुरविली जात आहे़ एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू येते कोठून, असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांनी केला आहे़याबाबत गेवराई तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की, यापुर्वी आम्ही अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केलेली आहे़ त्यांच्या या उत्तरावरून जिल्ह्यात अवैध वाहतूक होत असल्याच्या प्रकरणावर शिक्कामोर्तब झाला आहे़ पर्यावरण व रस्त्याची दुरावस्थाप्रचंड प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे़ या बरोबरच गेवराई तालुक्यातील ठिकठिकाणच्या वाळू पट्यांमधून वाळू भरून जाणाऱ्या जड वाहनांमुळे छोटे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहे़जिल्ह्यात वाळू तस्करांचा धिंगाणा सुरू असताना प्रशासनाने मात्र डोळ्यावर पट्टी बांधली आहे़४वाळू पट्टे कमी आणि उपसा भरमासाठ अशी स्थिती असताना कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़४अवैध वाळू उपशावर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाकडून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बडगा उगारला जात आहे़४त्यामुळे साप सोडून भुई धोपटण्याचा प्रकार घडत आहे़४अवैध वाळू उपशावर कठोर कारवाईची आवश्यकता आहे़