शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘राजतडाग’ ते औरंगाबाद व्हाया खडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 02:52 IST

औरंगाबाद जिल्हा बुद्धकाळापासून इतिहासात प्रसिद्ध

- शांतीलाल गायकवाडऔरंगाबाद : औरंगाबाद शहराचा इतिहास ४०० वर्षांचा नसून तो जवळपास दीड हजार वर्ष जुना आहे. हे शहर प्राचीन काळातही समृद्ध होते. औरंगाबाद लेणी, पितळखोरा, अजिंठा, वेरूळ आदी प्राचीन स्थानांबरोबरच हे शहरही विकसित होत गेले. बुद्धकाळात हे नगर राजतडाग या नावाने ओळखले जात होते. भारतातील प्राचीन व्यापारी महामार्गावर वसलेल्या या वैभवशाली नगरीला बौद्धसंस्कृतीचा मोठा इतिहास आहे. राजतडाग ते औरंगाबाद व्हाया खडकी असा या शहराचा रंजक इतिहास आहे.औरंगाबाद शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास सातवाहन राजाच्या काळापर्यंत मागे आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, मोगल आणि निजाम यांच्या राजवटी या भूमीवर नांदल्या. त्यामुळे जिल्ह्यात संमिश्र संस्कृतीचा सुंदर असा मिलाफ झालेला आढळतो. सातवाहनाच्या काळात खामनदी किनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे औरंगाबाद मानले जाते. सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेकडील डोंगर रांगात बुद्धलेणी व बुद्धविहारे तयार करण्यात आली, नंतरच्या शतकांमध्ये या गावाचा उल्लेख राजतडाग म्हणून आढळतो.सातवाहन कालखंडात खामनदीवर खडकी गावात राजतडाग नावाचा मोठा जलाशय निर्माण केला होता. त्याचे लहान रूप आपणास ‘हरिशूल’ नावाच्या तलावाच्या रूपाने पाहावयास मिळते. राजतडाग विशाल होता. त्याच्या तिरावर सध्याचे शासकीय रुग्णालय आहे. या शहराला औरंगाबाद हे नाव १७ व्या शतकात औरंगजेब बादशहाच्या नावावरून पडले असले तरी औरंगाबादचे मूळ नाव ‘राजतडाग’ असल्याचे शिलालेखावरून स्पष्ट होते. मुंबईच्या कान्हेरी येथील सातवाहनकालीन लेण्यांमध्ये असलेल्या शिलालेखात राजतडागचा स्पष्ट उल्लेख आढळतो. राजतडाग म्हणजे राजाने निर्माण केलेले सरोवर होय. प्रतिष्ठान ते श्रावस्ती या सार्थवाह पथावरील राजतडाग हा महत्त्वाचा थांबा होता. सार्थवाह पथ म्हणजेच व्यापारी मार्ग होय. प्रतिष्ठान (पैठण) वरून उज्जैन, श्रावस्ती येथे प्रवास करणारे अनेक प्रवासी तांडे या मुक्कामास थांबत असत. त्यांची मुक्कामाची सोय करण्याच्या दृष्टीने सातवाहनराजांनी राजतडागची निर्मिती केली होती. आजचा हर्सूल तलाव म्हणजेच सातवाहनांनी निर्माण केलेले राजतडाग होय, असे मानले जाते.अशी झाली नामांतरे...सातव्या शतकातील राजतडागनंतर हे शहर पुढे खडकी नावाने ओळखले जाऊ लागले. निजामशाहीचा वजीर मलिक अंबरने हे शहर जिंकले व १६१० मध्ये दौलताबादवरून तत्कालीन खडकीला राजधानी हलविली. मलिक अंबरचा उत्तराधिकारी फतेह खान याने सन १६२९ मध्ये या शहराचे नामकरण फतेहपूर असे केले. हे फतेहपूर नंतर दिल्लीच्या मोगल बादशाह शाहजहानने जिंकून मोगल साम्राज्यात सामील केले. शाहजहानचा मुलगा औरंगजेब दोनदा या प्रदेशाचा सुभेदार झाला व त्याने सन १६५३ मध्ये फतेहपूर नाव बदलून औरंगाबाद असे ठेवले.‘वर्षावास’साठी लेणी ते विहारे...इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात बौद्ध धम्माचा उदय झाला. बौद्ध धम्माच्या प्रचार व विकासासाठी बौद्ध भिक्खूंना गावापासून दूर पावसाळ्यात राहण्यासाठी डोंगरात लेणी खोदण्यास सम्राट अशोकाने सुरुवात केली. अशा लेणींचा उल्लेख बौद्ध ग्रंथात ‘वर्षावास’ या नावाने केला आहे. या लेण्यांना पुढे विहार ही संज्ञा प्राप्त झाली. कालांतराने विहाराबरोबर प्रार्थनागृहे खोदण्यात आली. मराठवाड्यात इ.स. पूर्व पहिल्या शतकात प्रतिष्ठानच्या सातवाहन सत्तेचा उदय झाला. औरंगाबाद शहरालगतच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांतील औरंगाबाद बौद्ध लेणी सहाव्या ते सातव्या शतकात खोदली गेली. दीड किलो मीटरच्या डोंगरात एकूण १२ लेण्या कोरल्या आहेत.12 लेण्यांपैकी लेणी क्रमांक ४ हे एकच चैत्यगृह असून उर्वरित ११ लेण्या विहारे आहेत. या लेण्यांमध्ये नागराज,नागराणी, बोधिसत्व, पद्मपाणी, वज्रपाणी, यक्ष आणि ध्यानस्थ बुद्ध मूर्ती, हत्ती, घोडे व सिंह कोरले आहेत. या लेण्यांचा शोध १९६१ मध्ये लागला. या परिसरात बौद्ध संस्कृती नांदत असल्याचे पुरावे असे सहाव्या, सातव्या शतकापर्यंत मागे आढळतात. एकाच जिल्ह्यामध्ये युनोस्कोचा सर्वाधिक वारसा लाभलेला देशातील औरंगाबाद हा एकमेव जिल्हा आहे.1545 भारतातील एकूण लेणी1200 पुरातत्त्व खात्याकडे नोंदी800 महाराष्ट्रात एकूण लेणी132 मराठवाड्यात एकूण लेणीऔरंगाबाद जिल्ह्यात- औरंगाबादची बौद्ध लेणी, पितळखोरा लेणी, लोहगड लेणी, अजिंठा व वेरूळ लेणी.