शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘राजतडाग’ ते औरंगाबाद व्हाया खडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 02:52 IST

औरंगाबाद जिल्हा बुद्धकाळापासून इतिहासात प्रसिद्ध

- शांतीलाल गायकवाडऔरंगाबाद : औरंगाबाद शहराचा इतिहास ४०० वर्षांचा नसून तो जवळपास दीड हजार वर्ष जुना आहे. हे शहर प्राचीन काळातही समृद्ध होते. औरंगाबाद लेणी, पितळखोरा, अजिंठा, वेरूळ आदी प्राचीन स्थानांबरोबरच हे शहरही विकसित होत गेले. बुद्धकाळात हे नगर राजतडाग या नावाने ओळखले जात होते. भारतातील प्राचीन व्यापारी महामार्गावर वसलेल्या या वैभवशाली नगरीला बौद्धसंस्कृतीचा मोठा इतिहास आहे. राजतडाग ते औरंगाबाद व्हाया खडकी असा या शहराचा रंजक इतिहास आहे.औरंगाबाद शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास सातवाहन राजाच्या काळापर्यंत मागे आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, मोगल आणि निजाम यांच्या राजवटी या भूमीवर नांदल्या. त्यामुळे जिल्ह्यात संमिश्र संस्कृतीचा सुंदर असा मिलाफ झालेला आढळतो. सातवाहनाच्या काळात खामनदी किनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे औरंगाबाद मानले जाते. सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेकडील डोंगर रांगात बुद्धलेणी व बुद्धविहारे तयार करण्यात आली, नंतरच्या शतकांमध्ये या गावाचा उल्लेख राजतडाग म्हणून आढळतो.सातवाहन कालखंडात खामनदीवर खडकी गावात राजतडाग नावाचा मोठा जलाशय निर्माण केला होता. त्याचे लहान रूप आपणास ‘हरिशूल’ नावाच्या तलावाच्या रूपाने पाहावयास मिळते. राजतडाग विशाल होता. त्याच्या तिरावर सध्याचे शासकीय रुग्णालय आहे. या शहराला औरंगाबाद हे नाव १७ व्या शतकात औरंगजेब बादशहाच्या नावावरून पडले असले तरी औरंगाबादचे मूळ नाव ‘राजतडाग’ असल्याचे शिलालेखावरून स्पष्ट होते. मुंबईच्या कान्हेरी येथील सातवाहनकालीन लेण्यांमध्ये असलेल्या शिलालेखात राजतडागचा स्पष्ट उल्लेख आढळतो. राजतडाग म्हणजे राजाने निर्माण केलेले सरोवर होय. प्रतिष्ठान ते श्रावस्ती या सार्थवाह पथावरील राजतडाग हा महत्त्वाचा थांबा होता. सार्थवाह पथ म्हणजेच व्यापारी मार्ग होय. प्रतिष्ठान (पैठण) वरून उज्जैन, श्रावस्ती येथे प्रवास करणारे अनेक प्रवासी तांडे या मुक्कामास थांबत असत. त्यांची मुक्कामाची सोय करण्याच्या दृष्टीने सातवाहनराजांनी राजतडागची निर्मिती केली होती. आजचा हर्सूल तलाव म्हणजेच सातवाहनांनी निर्माण केलेले राजतडाग होय, असे मानले जाते.अशी झाली नामांतरे...सातव्या शतकातील राजतडागनंतर हे शहर पुढे खडकी नावाने ओळखले जाऊ लागले. निजामशाहीचा वजीर मलिक अंबरने हे शहर जिंकले व १६१० मध्ये दौलताबादवरून तत्कालीन खडकीला राजधानी हलविली. मलिक अंबरचा उत्तराधिकारी फतेह खान याने सन १६२९ मध्ये या शहराचे नामकरण फतेहपूर असे केले. हे फतेहपूर नंतर दिल्लीच्या मोगल बादशाह शाहजहानने जिंकून मोगल साम्राज्यात सामील केले. शाहजहानचा मुलगा औरंगजेब दोनदा या प्रदेशाचा सुभेदार झाला व त्याने सन १६५३ मध्ये फतेहपूर नाव बदलून औरंगाबाद असे ठेवले.‘वर्षावास’साठी लेणी ते विहारे...इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात बौद्ध धम्माचा उदय झाला. बौद्ध धम्माच्या प्रचार व विकासासाठी बौद्ध भिक्खूंना गावापासून दूर पावसाळ्यात राहण्यासाठी डोंगरात लेणी खोदण्यास सम्राट अशोकाने सुरुवात केली. अशा लेणींचा उल्लेख बौद्ध ग्रंथात ‘वर्षावास’ या नावाने केला आहे. या लेण्यांना पुढे विहार ही संज्ञा प्राप्त झाली. कालांतराने विहाराबरोबर प्रार्थनागृहे खोदण्यात आली. मराठवाड्यात इ.स. पूर्व पहिल्या शतकात प्रतिष्ठानच्या सातवाहन सत्तेचा उदय झाला. औरंगाबाद शहरालगतच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांतील औरंगाबाद बौद्ध लेणी सहाव्या ते सातव्या शतकात खोदली गेली. दीड किलो मीटरच्या डोंगरात एकूण १२ लेण्या कोरल्या आहेत.12 लेण्यांपैकी लेणी क्रमांक ४ हे एकच चैत्यगृह असून उर्वरित ११ लेण्या विहारे आहेत. या लेण्यांमध्ये नागराज,नागराणी, बोधिसत्व, पद्मपाणी, वज्रपाणी, यक्ष आणि ध्यानस्थ बुद्ध मूर्ती, हत्ती, घोडे व सिंह कोरले आहेत. या लेण्यांचा शोध १९६१ मध्ये लागला. या परिसरात बौद्ध संस्कृती नांदत असल्याचे पुरावे असे सहाव्या, सातव्या शतकापर्यंत मागे आढळतात. एकाच जिल्ह्यामध्ये युनोस्कोचा सर्वाधिक वारसा लाभलेला देशातील औरंगाबाद हा एकमेव जिल्हा आहे.1545 भारतातील एकूण लेणी1200 पुरातत्त्व खात्याकडे नोंदी800 महाराष्ट्रात एकूण लेणी132 मराठवाड्यात एकूण लेणीऔरंगाबाद जिल्ह्यात- औरंगाबादची बौद्ध लेणी, पितळखोरा लेणी, लोहगड लेणी, अजिंठा व वेरूळ लेणी.