शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘राज्यराणी’ एक्स्प्रेसमुळे मुंबई प्रवास होणार आणखी सुखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 19:32 IST

जनशताब्दी, तपोवन, नंदिग्राम, देवगिरीसह आणखी एक रेल्वे

ठळक मुद्देरेल्वेमंत्र्यांकडून हिरवा कंदिल 

औरंगाबाद : मुंबई- मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेडपर्यंत नेण्यास अखेर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हिरवा कंदिल दिला आहे. मुंबईसाठी नव्या रेल्वेची मागणी लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे शहराची मुंबई कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.  

औरंगाबादहून मुंबईसाठी आजघडीला जनशताब्दी, तपोवन, नंदिग्राम, देवगिरी एक्स्प्रेसशिवाय अन्य रेल्वे नाही. शहरातून मुंबईला दररोज दोन ते तीन हजारांवर प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांची संख्या पाहता या शहरासाठी नव्या रेल्वेची मागणी होत आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यानंतर नांदेड ते मुंबईसाठी लवकरच नवीन रेल्वे मिळणार असल्याची घोषणा नांदेड विभागाने केली होती; परंतु एक-एक महिना उलटत आहे, तरीही मुंबईसाठी नवीन रेल्वे मिळत नाही. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. 

औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या पाहणी दौऱ्यात १२ डिसेंबर २०१८ रोजी ‘दमरे’चे तत्कालीन महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसला ८ बोगी जोडून नांदेड-मुंबई रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात वर्ष उलटूनही औरंगाबादहून मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू होऊ शकली नाही. औरंगाबादकरांचा मुंबईचा प्रवास खचाखच गर्दीतून आणि वेटिंगवरच होतो. नव्या रेल्वेची महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करणे, नांदेड-मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू करणे, हा रेल्वे बोर्डाचा धोरणात्मक निर्णय आहे, असे म्हणत मध्य रेल्वेने वारंवार रेल्वे बोर्डाकडेच बोट दाखविले. या रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी लोकप्रतिनिधी, रेल्वे संघटनांकडून सतत पाठपुरावा करण्यात आला. अखेर रेल्वेमंत्र्यांनी या रेल्वेच्या विस्तारीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच ही रेल्वे नांदेडहून धावेल.

नव्या वर्षाचा मुहूर्तराज्यराणी एक्स्प्रेस नांदेडहून सुरू करण्यासाठी नव्या वर्षाचा मुहूर्त साधला जाणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, ही रेल्वे नांदेडहून कधी सुरू होणार, याबाबत अद्याप काही माहिती प्राप्त झालेली नाही, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनNandedनांदेड