शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

वाळूज महानगरात प्रवासी निवारा उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:48 IST

संबंधित विभागाच्या प्रशासनाने मुख्य चौकात प्रवासी निवारे उभारावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वाळुज महानगर : वाळुज महानगरात प्रवाशांना थांबण्यासाठी प्रवासी निवारा शेडची व्यवस्था नाही. रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत आहे. संबंधित विभागाच्या प्रशासनाने मुख्य चौकात प्रवासी निवारे उभारावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वाळूज महानगरातील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची शहरात वर्दळ असते. तसेच बाहेरगावी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. एमआयडीसीने सुरुवातीला प्रवाशांसाठी गैरसोय होऊ नये म्हणून मुख्य चौकात बसथांबे उभारले होते. पण रस्ता रुंदीकरण व सुशोभिकरणात बसथांबे काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्याठिकाणी प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली नाही.

सध्या बजाजनगर, रांजणगाव, पंढरपूर, साऊथसिटी, गोलवाडी फाटा आदी ठिकाणी ऊन, वारा, पावसापासून बचाव व्हावा म्हणून प्रवाशांना थांबण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामगार, महिला व जेष्ठ नागरिकांना भर उन्हात रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. बहुतांश चौक अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. बºयाचदा प्रवाशांच्या बस न थांबताच पुढे निघून जात आहे. प्रवासी निवारे उभारावेत यासाठी अनेकदा नागरिक व विविध संघटनांकडून मागणी करण्यात आली आहे.

पण संबंधित प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेवून बजाजनगरातील मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, मोहटादेवी मंदिर चौक, जयभवानी चौक, पंढरपूरातील तिरंगा चौक, साऊथसिटी चौक, गोलवाडी फाटा या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी प्रवाशांसाठी निवारा शेड उभारावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

टॅग्स :Walujवाळूज