सोमनाथ खताळ , बीड
क्षित रहावेत, त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अद्यापर्यंत कसल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. निम्म्याहून आधिक बसगाड्या नादुरूस्त आहेत. खराब वायपर, तुटलेल्या खिडक्या आणि गळक्या बसगाड्यांमधून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.जिल्ह्यात धावणाऱ्या ५०० बसगाड्यांपैकी ४० टक्के बसगाड्या गळक्या असून त्यांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. तिकीटात भरमसाठ वाढ करूनही प्रवाशांना अपेक्षेप्रमाणे सोयी-सुविधा मिळत नसल्याची प्रवाशांमधून ओरड आहे. बसगाड्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.आदेशाला केराची टोपलीपावसाळा सुरू होण्यापूर्वीच वायफर दुरूस्त करावेत, योग्य उपाययोजना कराव्यात, असे आदेश मध्यवर्ती कार्यालयाकडून विभागीय कार्यालयाला दिलेले आहेत, मात्र याला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.खिडक्याही झाल्यात ‘लॉक’अनेक बसगाड्यांमधील खिडक्या मागे-पुढे सरकत नाहीत. त्या ‘लॉक’ झालेल्या आढळल्या. तर काही बसगाड्यांच्या खिडक्या तुटलेल्या होत्या. या नादुरूस्त खिडक्यांमुळे पावसाचे पाणी आत येते आणि प्रवाशांना भिजावे लागते.ग्रामीण भागातील गाड्यांना ग्रहणग्रामीण भागात जाणाऱ्या बसगाड्या तर नेहमीच कुठल्या ना कुठल्या समस्येत अडकलेल्या आहेत. ग्रामीण प्रवाशांकडूनच एसटीला जादा उत्पन्न मिळते, मात्र दुर्दैव असे की याच प्रवाशांना सुविधा दिल्या जात नाहीत, हे वास्तव आहे.खराब रस्तेच कारणीभूतबसगाड्या खराब होण्यास महामंडळच जबाबदार आहे, असे नाही. या गाड्या खराब होण्यासाठी कारण आहे ते खराब रस्ते. सा.बां. विभागाच्या दुर्लक्षामुळे आजही अनेक गावांना जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीत. मात्र, प्रवाशांच्या खातर हीच एसटी ‘दणक्या’त प्रवासी आणते, आणि नेते.या दणक्यांमुळेच एसटी खिळखिळी होते आणि एसटीचे पार्ट तुटतात. खराब रस्त्यांमुळे अनेक गावांत बसगाडीच गेलेली नाही.