शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

चार दिवसांपासून पावसाची रिपरिप

By admin | Updated: July 23, 2014 00:19 IST

हिंगोली : जिल्ह्यात मागील चार दिवसांत सोमवारी सर्वाधिक ७ मिमी पाऊस झाला. दररोज अगदी सकाळपासून सायंकाळपर्यंत हलक्या स्वरूपात होत असलेला पाऊस रात्रभर रिपरिप लावित आहे.

हिंगोली : जिल्ह्यात मागील चार दिवसांत सोमवारी सर्वाधिक ७ मिमी पाऊस झाला. दररोज अगदी सकाळपासून सायंकाळपर्यंत हलक्या स्वरूपात होत असलेला पाऊस रात्रभर रिपरिप लावित आहे. मंगळवारी ही स्थिती कायम राहिली असल्याने या रिमझिममुळे खरीप हंगामाच्या पेरण्यांवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात ११ जुलैै रोजी हलक्या स्वरूपाच्या पावसाचे आगमन झाले होते. तद्नंतर सलग चार दिवस हा पाऊस कायम राहिल्याने उत्पादकांनी खरीप हंगामाच्या पेरणीला सुरूवात केली होती. दरम्यान, ११ जुलै रोजी २.९६ मिमी, १२ जुलै रोजी २.९९ मिमी असा हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर पावसात थोडी वाढ झाल्याने १३ जुलै रोजी जिल्ह्यात १२.६२ मिमी पाऊस झाला. १४ जुलै रोजी पावसात सातत्य राहिल्याने दिवसभरात ३.७९ मिमी पाऊस झाला. पुढे १५ जुलै रोजी नावालाच पाऊस झाल्याने २.२ मिमी सरासरीनंतर सलग तीन दिवस पाऊस गायब झाला होता. अचानक पाऊस गायब झाल्याने पेरणी थांबविण्याची वेळ आली होती; पण १९ जुलै रोजी पुन्हा आगमन झालेल्या पावसात सातत्य राहिले. मागील चार दिवसांपासून पाऊस होत असताना सरासरीत मात्र वाढ झालेली नाही. १९ जुलै रोजी ४.७१ मिमी तर २० जुलै रोजी दिवसभर झालेल्या पावसाने पेरणीवर फारसा परिणाम झाला नाही. या सर्वांपेक्षा अधिक पाऊस २१ जुलैै रोजी झाला. सोमवारी सकाळी सुरूवात झालेला पाऊस रात्रभर पडला. सर्वदूर असलेल्या या पावसामुळे जिल्ह्याची सरासरी ७६.७१ मिमीपर्यंत गेली. प्रामुख्याने वसमत तालुक्यात सर्वाधिक १२ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल औंढा तालुक्यात झालेल्या ८ मिमी पाऊस झाला. चार दिवसांपासून पाऊस होत असला तरी अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा उत्पादकांना आहे. शेतकऱ्यांना दिलासाजिल्ह्यात आतापर्यंत ७६.७१ मि.मी. पाऊस झाल्याची महसूल विभागाकडे झाली नोंद.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत अत्यल्प पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून झाले स्पष्ट.जिल्ह्यातील एकही नदी-नाले आतापर्यंत वाहिले नसल्याने मोठ्या पावसाची जिल्हावासियांना लागली प्रतीक्षा.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काहीअंशी सुटला.बोअर, विहिरींची पाणीपातळी मात्र वाढेना.