शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

'समृद्धी'च्या कामावर पावसाच्या पाण्याचे नियोजनच नाही; शेकडो हेक्टरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 10:48 IST

ठेकेदाराने पावसाच्या पाण्याचे नियोजन न केल्याने जयपूर, वरुड काजी, कच्छीघाटी येथील शेकडो हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे.

ठळक मुद्देसमृद्धी महामार्ग जात असून त्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यास पर्यायी मार्ग बंद

करमाड : औरंगाबाद तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून त्यावर अनेक ठिकाणी छोटे मोठे पूल देखील तयार करण्याचे काम सुरू आहे. ठेकेदाराने पावसाच्या पाण्याचे नियोजन न केल्याने जयपूर, वरुड काजी, कच्छीघाटी येथील शेकडो हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. शेतात जाणारे रस्ते बंद झाले. शिवाय करमाड - पिंप्रीराजा रोडच्या कामामुळे मंगरूळ, जडगाव शिवारात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल मार्फत पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत. सध्या औरंगाबाद तालुक्यातील फेरण जळगाव, जयपूर, वरुड काजी असा अनेक गावातून समृद्धी महामार्ग जात असून त्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या महामार्गावर आवश्यक ठिकाणी छोट्या मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. मान्सून पूर्व तयारी म्हणून ठेकेदाराने पुलाच्या दोन्ही बाजूने वाहणाऱ्या पाण्याचे नियोजन करणे, नाल्या करणे आवश्यक होते. ज्या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे त्यासर्वच ठिकाणी पायाभरणी केलेल्या खोदकामाचा मुरूम, मातीची ढीगारे अस्ताव्यस्त पडलेले आहे. तर कुठे मोठं मोठे खड्डे पडलेले आहे. या परिस्थितीत शुक्रवारी व शनिवारी औरंगाबाद तालुक्यातील याच भागात अतिवृष्टी झाली. या मुसळधार पावसामुळे जयपूर, वरूडकाजी, कच्छीघाटी, शिवारात समृद्धी लगतच्या शिवरातून पाणी नैसर्गिक प्रवाहाच्या दिशेने न वाहता इतरत्र वाहिले. त्यामुळे शेकडो एकर वहीत असलेल्या शेतजमीनिला बंदिस्त असलेले अनेक वळण फुटले पीक उगवण्यासाठी आवश्यक असलेल्या मोकळ्या मातीचा थर या पाण्यामुळे वाहून गेला. शेती नापीक होण्याची नामुष्की येथील शेतकऱ्यांवर आली. शिवाय कच्छीघाटी गावच्या रोड लगतच समृद्धीचे काम सुरू असून त्या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे. पुलाचे काम नदीच्या १०० फूट बाजूला सुरू आहे. त्या ठिकाणी रोडच्या उंचीसाठी २५ फूट उंच भाराव भरण्यात आला आहे.त्यामुळे नदीच्या पात्राचा नैसर्गिक प्रवाह बदलला गेला.आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे येथील रास्ता पूर्णपणे बंद झाला. येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यास पर्यायी मार्ग नसल्याने  समृद्धी मार्फत तात्काळ आवश्यक उपाय योजना कारून रस्ता मोकळा करून घ्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे. 

करमाड - पिंप्री रोडच्या कामामुळे मंगरुळ, जडगाव शिवराचे नुकसान      सध्या करमाड - पिंप्रीराजा रोडचे काम सुरू असून या रोडच्या बाजूला नाल्या करण्यात आल्या नाही. मान्सूनपूर्व कामाचे नियोजन या ठिकाणी देखील करण्यात आले नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहिलेल्या पाण्यामुळे  मंगरुळ, जडगाव शिवारातील गट नं २६३, २२६, २२९, २३०, २३८, २३९ आशा अनेक शिवारातील शेकडो एकर जमिनीवरील मातीचा थर वाहून गेला. या ठिकाणी महसूल मार्फत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जडगाव, मंगरुळ, येथील शेतकरी एकनाथ भोसले, बद्रीनाथ हिवाळे, गंगाधर भोसले, रामभाऊ चिंचोले, जनार्धन शिंदे, धनंजय भोसले आदींनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग