शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ओल्या दुष्काळाने चिंतेत अन् इकडे मुख्यमंत्री उत्सवात मग्न; अंबादास दानवेंचे टीकास्त्र

By बापू सोळुंके | Updated: October 22, 2022 18:58 IST

पावसाने पिकाचे वाटोळे, ओला दुष्काळ जाहीर करा;

औरंगाबाद : या वर्षी सलग अडीच ते पावणे तीन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे हाती आलेले मका, बाजरी, सोयाबीन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सुमारे साडेचारशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, राज्यातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

दानवे म्हणाले की, मी काल पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात जाऊन आलो. मराठवाडा, विदर्भाचाही नुकताच दौरा केला. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत सुरू असलेल्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेले पीक पावसाने हिरावून नेले. पावसामुळे शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेले आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, रब्बीची पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता, राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. असे असताना राज्याचे कृषिमंत्री राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे वक्तव्य करीत आहेत. विशेष म्हणजे कृषिमंत्री गुडघाभर पाण्यात उभे राहून नुकसानीची पाहणी करतानाचे व्हिडीओ आहेत. ते सोडले, तर राज्यातील अन्य मंत्री असंवेदनशील असल्याचा आरोप दानवे यांनी केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री उत्सव साजरा करण्यात मग्न असल्याचाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवे