शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

शेतकरी ओल्या दुष्काळाने चिंतेत अन् इकडे मुख्यमंत्री उत्सवात मग्न; अंबादास दानवेंचे टीकास्त्र

By बापू सोळुंके | Updated: October 22, 2022 18:58 IST

पावसाने पिकाचे वाटोळे, ओला दुष्काळ जाहीर करा;

औरंगाबाद : या वर्षी सलग अडीच ते पावणे तीन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे हाती आलेले मका, बाजरी, सोयाबीन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सुमारे साडेचारशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, राज्यातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

दानवे म्हणाले की, मी काल पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात जाऊन आलो. मराठवाडा, विदर्भाचाही नुकताच दौरा केला. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत सुरू असलेल्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेले पीक पावसाने हिरावून नेले. पावसामुळे शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेले आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, रब्बीची पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता, राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. असे असताना राज्याचे कृषिमंत्री राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे वक्तव्य करीत आहेत. विशेष म्हणजे कृषिमंत्री गुडघाभर पाण्यात उभे राहून नुकसानीची पाहणी करतानाचे व्हिडीओ आहेत. ते सोडले, तर राज्यातील अन्य मंत्री असंवेदनशील असल्याचा आरोप दानवे यांनी केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री उत्सव साजरा करण्यात मग्न असल्याचाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवे