शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

शेतकरी ओल्या दुष्काळाने चिंतेत अन् इकडे मुख्यमंत्री उत्सवात मग्न; अंबादास दानवेंचे टीकास्त्र

By बापू सोळुंके | Updated: October 22, 2022 18:58 IST

पावसाने पिकाचे वाटोळे, ओला दुष्काळ जाहीर करा;

औरंगाबाद : या वर्षी सलग अडीच ते पावणे तीन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे हाती आलेले मका, बाजरी, सोयाबीन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सुमारे साडेचारशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, राज्यातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.अंबादास दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

दानवे म्हणाले की, मी काल पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात जाऊन आलो. मराठवाडा, विदर्भाचाही नुकताच दौरा केला. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत सुरू असलेल्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेले पीक पावसाने हिरावून नेले. पावसामुळे शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेले आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, रब्बीची पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता, राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे. असे असताना राज्याचे कृषिमंत्री राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे वक्तव्य करीत आहेत. विशेष म्हणजे कृषिमंत्री गुडघाभर पाण्यात उभे राहून नुकसानीची पाहणी करतानाचे व्हिडीओ आहेत. ते सोडले, तर राज्यातील अन्य मंत्री असंवेदनशील असल्याचा आरोप दानवे यांनी केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री उत्सव साजरा करण्यात मग्न असल्याचाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवे