शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

पावसाचा अहवाल कुलाबा वेधशाळेकडे

By admin | Updated: July 24, 2016 00:46 IST

लातूर : लातूर जिल्हा अवर्षणग्रस्त म्हणून गेल्या तीन वर्षांपासून पुढे आला आहे. यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

लातूर : लातूर जिल्हा अवर्षणग्रस्त म्हणून गेल्या तीन वर्षांपासून पुढे आला आहे. यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ढग भरून येत आहेत. मात्र पाऊस पडत नसल्याने कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी होत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा करण्यात आला असल्याने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने लातूर जिल्ह्यातील पावसाचा आढावा कुलाबा वेधशाळेकडे पाठविला आहे. गेल्या १० वर्षांची पावसाची परिस्थिती यात मांडण्यात आली असून, आॅगस्ट महिन्यात लातूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची शक्यता आहे.लातूर जिल्ह्यात मांजरा धरण आहे. परंतु फेब्रुवारी २०१६ पासून कोरडेठाक आहे़ लातूर शहरासाठी रेल्वेने मिरजहून तसेच निम्न तेरणाहून टँकरव्दारे पाऊस सुरू आहे़ गेल्या वर्षभराच्या तुलनेत चालू वर्षातील मोठे, मध्यम व लघुप्रकल्प अशा एकूण १४२ प्रकल्पामध्येही पाणी आलेले नाही़ जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणी साठवणूक क्षमता ६९५़१८५ एमएमक्यूब इतकी आहे़ तर दोन मोठ्या प्रकल्पापैकी मांजरा कोरडे आहे व निम्न तेरणामध्ये १़ ६१९ दलघमी मृत पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे भविष्यातील टंचाईचे वेध लातूरकरांना लागले आहेत.जिल्ह्यातील दोन्ही प्रकल्प बीड-उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. या प्रकल्पांतर्गत १० मंडळे येतात. या कॅचमेंट भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही. तर ज्या भागात झाला तो भाग कँचमेंट भागात येत नसल्याने त्या पावसाचा लातूर जिल्ह्यासाठी उपयोग होत नाही़ मांजरा, निम्न तेरणा, व्हटी, घरणी या प्रकल्पातील पाणीसाठी कमी होता. त्यातच पर्जन्यमानही झाले नसल्याने अनेक गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले़लातूर जिल्ह्यात गेल्या १० वर्षांपासून दरवर्षी पाऊस कमी-कमी होत गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विंधन विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. भर पावसाळ्यात लातूर शहरासह ग्रामीण भागांतही टंचाईच्या झळा कायम आहेत. ढग भरून येत असले, तरी ते पडत नसल्याने कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ४गतवर्षी लातूर जिल्ह्यात सहा वेळा कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गतवर्षीपेक्षा यावर्षी अधिक ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे यावर्षी हा प्रयोग राबविल्यास नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे लातुरात विमानतळ, गोडावून व कृत्रिम पावसासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.