शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

पावसाचा अहवाल कुलाबा वेधशाळेकडे

By admin | Updated: July 24, 2016 00:46 IST

लातूर : लातूर जिल्हा अवर्षणग्रस्त म्हणून गेल्या तीन वर्षांपासून पुढे आला आहे. यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

लातूर : लातूर जिल्हा अवर्षणग्रस्त म्हणून गेल्या तीन वर्षांपासून पुढे आला आहे. यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ढग भरून येत आहेत. मात्र पाऊस पडत नसल्याने कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी होत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा करण्यात आला असल्याने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने लातूर जिल्ह्यातील पावसाचा आढावा कुलाबा वेधशाळेकडे पाठविला आहे. गेल्या १० वर्षांची पावसाची परिस्थिती यात मांडण्यात आली असून, आॅगस्ट महिन्यात लातूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची शक्यता आहे.लातूर जिल्ह्यात मांजरा धरण आहे. परंतु फेब्रुवारी २०१६ पासून कोरडेठाक आहे़ लातूर शहरासाठी रेल्वेने मिरजहून तसेच निम्न तेरणाहून टँकरव्दारे पाऊस सुरू आहे़ गेल्या वर्षभराच्या तुलनेत चालू वर्षातील मोठे, मध्यम व लघुप्रकल्प अशा एकूण १४२ प्रकल्पामध्येही पाणी आलेले नाही़ जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणी साठवणूक क्षमता ६९५़१८५ एमएमक्यूब इतकी आहे़ तर दोन मोठ्या प्रकल्पापैकी मांजरा कोरडे आहे व निम्न तेरणामध्ये १़ ६१९ दलघमी मृत पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे भविष्यातील टंचाईचे वेध लातूरकरांना लागले आहेत.जिल्ह्यातील दोन्ही प्रकल्प बीड-उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. या प्रकल्पांतर्गत १० मंडळे येतात. या कॅचमेंट भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही. तर ज्या भागात झाला तो भाग कँचमेंट भागात येत नसल्याने त्या पावसाचा लातूर जिल्ह्यासाठी उपयोग होत नाही़ मांजरा, निम्न तेरणा, व्हटी, घरणी या प्रकल्पातील पाणीसाठी कमी होता. त्यातच पर्जन्यमानही झाले नसल्याने अनेक गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले़लातूर जिल्ह्यात गेल्या १० वर्षांपासून दरवर्षी पाऊस कमी-कमी होत गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विंधन विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. भर पावसाळ्यात लातूर शहरासह ग्रामीण भागांतही टंचाईच्या झळा कायम आहेत. ढग भरून येत असले, तरी ते पडत नसल्याने कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ४गतवर्षी लातूर जिल्ह्यात सहा वेळा कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. गतवर्षीपेक्षा यावर्षी अधिक ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे यावर्षी हा प्रयोग राबविल्यास नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे लातुरात विमानतळ, गोडावून व कृत्रिम पावसासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.