शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शहरासह जिल्हाभरात गारांचा अवकाळी पाऊस

By admin | Updated: April 29, 2017 23:33 IST

लातूर : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी दुपारी ४ पासून वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाला सुरूवात झाली़

लातूर : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी दुपारी ४ पासून वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाला सुरूवात झाली़ या पावसामुळे ग्रामीण भागात आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ तर अनेकांच्या घरावरील पत्रेही उडून गेल्याची घटना घडली आहे़ जिल्ह्यातील रेणापूर, चाकूर, उदगीर, औसा, निलंगा, शिरूरअनंतपाळ, देवणी, अहमदपूर, जळकोट आदी तालुक्यातही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला़ रेणापूर तालुक्यात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घरासह पावसाला सुरूवात झाली़ हा पाऊस तालुक्यातील खरोळा, पानगाव, तळणी, मोहगाव, कारेपूर, अंदलगाव, निवाडा, पळशी, भोकरंबा आदी गावात पाऊस झाला़ यावेळी अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले़ तर शिरूरअनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथे हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या़ येरोळसह शिरूरअनंतपाळ तालुक्यात ढगाळ वातावरण आणि थंड गारवा होता़ चाकूर तालुक्यातील जानवळ, वडवळ, रायवाडी, चापोली, शेळगाव, कलकोटी, उजळंब, कबनसांगवी, नळेगाव, घरणी, आष्टामोड आदी गावच्या परिसरातही हा पाऊस झाला़ या पावसामुळे चाकूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली तूर भिजली़ तर उदगीर तालुक्यातील एकूर्गा रोड, वाढवणा (बु), हाळी हंडरगुळी, गुडसूर, डोंगरशेळकी आदी परिसरातही पाऊस झाला़ हाळी हंडरगुळी परिसरात वादळी वारा आणि पाऊस झाल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली़ वीजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला़ यावेळी जवळपास एक तास वीज गायब होती़ तर औसा तालुक्यातील आलमला, किल्लारी, उत्का, भादा, लामजना, भेटा, उजनी, आदी गावच्या परिसरात शनिवारी दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरूवात झाली़ किल्लारी येथे वादळी वाऱ्यासह हा पाऊस झाला़