शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर, कन्नड, वैजापूर तालुक्यातही पाऊस

By admin | Updated: July 10, 2014 01:15 IST

औरंगाबाद : गेल्या दोन-तीन दिवसांपासून फुलंब्री व सिल्लोड तालुका वगळता इतर तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरविली होती.

औरंगाबाद : गेल्या दोन-तीन दिवसांपासून फुलंब्री व सिल्लोड तालुका वगळता इतर तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरविली होती. बुधवारी या तालुक्यातही पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत. जिल्ह्यात सर्वदूर पेरण्यांना वेग येणार आहे.गंगापूर : गंगापूर शहर व परिसरात बुधवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी ३ वाजता हलक्या स्वरूपात सरी पडायला सुरुवात झाली. ४ वाजेनंतर जोराचा पाऊस सुरू झाला. तालुक्यातील जामगाव, कायगाव, बगडी, ममदापूर, मांजरी, ढोरेगाव, अगरवाडगाव, लिंबेजळगाव, कानडगाव, वाडगाव, शेंदुरवादा, सावखेडा आदी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.वैजापूर : वैजापूर शहरासह तालुक्याच्या बहुतांश ग्रामीण भागात पावसाने बुधवारी दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. यंदाच्या हंगामात पावसाने पहिल्यांदाच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, या पावसाने खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला; परंतु तालुक्यात पाऊस न पडल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या. याशिवाय तालुक्यातील नारंगी मध्यम प्रकल्पासह भटाणा, बोर दहेगाव, कोल्ही, गाढेपिंपळगाव व सटाणा हे लघु व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरींसह खाजगी विहिरींचे जलस्रोत कमी झाल्याने गावागावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. जून महिना पूर्णपणे कोरडा गेला. जुलै उजाडला तरी पावसाची चिन्हे दिसत नसल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत होती; परंतु गेल्या दोन दिवसांपूर्वी व आज तालुक्याच्या काही भागांत धो-धो पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला.बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वैजापूर शहरासह घायगाव, जांबरगाव, म्हस्की, नांदगाव, चांडगाव, रोटेगाव, आघूर व परिसरात मध्यम पावसाला सुरुवात झाली. नंतर पावसाचा वेग वाढला. साधारणत: कमी-जास्त विश्रांती घेत दोन तास पाऊस सुरू होता.रात्री ८ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या सर्वांनाच दिलासा मिळाला. खरीप लागवडीसाठी हा पाऊस पुरेसा असल्याने लागवडीला आता वेग येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)आषाढी एकादशी पावलीकन्नड : तालुक्यातील काही भागांत समाधानकारक, तर काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. आषाढी एकादशीला पाऊस पडतो, असे वृद्ध मंडळी सांगतात, त्याचा प्रत्यय आला. थोडक्यात, एकादशी पावली असेच म्हणावे लागेल. तालुक्यातील चिकलठाण, चापानेर, वासडी या परिसरात समाधानकारक पाऊस पडला. या पावसामुळे या भागात पेरण्यांना सुरुवात होईल, तर विहिरीतील पाण्यावर लावलेल्या कापसाला पावसामुळे आधार झाला आहे.