शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पावसाने तारले; किडींनी मारले

By admin | Updated: July 24, 2016 00:50 IST

राजेश खराडे , बीड बीड : जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला आहे. अद्यापपर्यंत झालेला रिमझिम पाऊस पिकांना लाभदायक ठरत असला

राजेश खराडे , बीडबीड : जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला आहे. अद्यापपर्यंत झालेला रिमझिम पाऊस पिकांना लाभदायक ठरत असला तरी सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. पारंपरिक पिकांना बाजूला सारत शेतकऱ्यांनी कडधान्यावर भर दिला आहे. त्यामुळे तूर, उडीद, मुगाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. १५ जुलैपर्यंत खरीपाची पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. त्यादृष्टीने कमी प्रमाणात का होईना गरजेच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने ६ लाख ५८ हजार २०४ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना ७ लाख ८७ हजार ८६० हेक्टरावर पेरणी झाली आहे. सध्या मशागतीची कामे पूर्ण झाली असतानाच पावसाच्या हजेरीमुळे पिके फोफावली आहेत. कापूस पाने लागण्याच्या अवस्थेत आहे तर बाजरी, तूर, उडीद, मूगही वाढीला लागली असून, फुलांच्या अवस्थेत आहेत. असे असताना मात्र या पिकांना मावा, तुडतुड्या, करप्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे रोगराईत वाढ होत आहे. पिके बहरात असतानाच रोगराईने घेरल्याने शेतकरी चिंतेत आहे. विद्यापीठाने ठरवून शिफारशीनुसार औषध फवारणी गरजेची आहे. त्याकरिता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन महत्वाचे आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे गेल्या तीन वर्षापासून खरिपातील एकही उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. यंदा पावसाच्या हजेरीने पिके सुस्थितीत असली तरी रोगांपासून बचावासाठी योग्य मार्गदर्शन मिळने गरजेचे आहे. वेगवेगळ्या खतांचा वापर महत्त्वाचापाणी साठलेल्या अवस्थेत रासायनिक खताचा वापर केल्यास वाहत्या पाण्याबरोबरच खत वाया जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मशागत झालेल्या पिकांना खत घातल्यास पिके वाढीस उपयोग होणार असून, खतांमध्ये बदल केल्यास उत्पादनातही वाढ होईल, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांनी सांगितले.