शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

पावसाने तारले; किडींनी मारले

By admin | Updated: July 24, 2016 00:50 IST

राजेश खराडे , बीड बीड : जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला आहे. अद्यापपर्यंत झालेला रिमझिम पाऊस पिकांना लाभदायक ठरत असला

राजेश खराडे , बीडबीड : जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला आहे. अद्यापपर्यंत झालेला रिमझिम पाऊस पिकांना लाभदायक ठरत असला तरी सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. पारंपरिक पिकांना बाजूला सारत शेतकऱ्यांनी कडधान्यावर भर दिला आहे. त्यामुळे तूर, उडीद, मुगाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. १५ जुलैपर्यंत खरीपाची पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. त्यादृष्टीने कमी प्रमाणात का होईना गरजेच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने ६ लाख ५८ हजार २०४ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना ७ लाख ८७ हजार ८६० हेक्टरावर पेरणी झाली आहे. सध्या मशागतीची कामे पूर्ण झाली असतानाच पावसाच्या हजेरीमुळे पिके फोफावली आहेत. कापूस पाने लागण्याच्या अवस्थेत आहे तर बाजरी, तूर, उडीद, मूगही वाढीला लागली असून, फुलांच्या अवस्थेत आहेत. असे असताना मात्र या पिकांना मावा, तुडतुड्या, करप्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे रोगराईत वाढ होत आहे. पिके बहरात असतानाच रोगराईने घेरल्याने शेतकरी चिंतेत आहे. विद्यापीठाने ठरवून शिफारशीनुसार औषध फवारणी गरजेची आहे. त्याकरिता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन महत्वाचे आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे गेल्या तीन वर्षापासून खरिपातील एकही उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. यंदा पावसाच्या हजेरीने पिके सुस्थितीत असली तरी रोगांपासून बचावासाठी योग्य मार्गदर्शन मिळने गरजेचे आहे. वेगवेगळ्या खतांचा वापर महत्त्वाचापाणी साठलेल्या अवस्थेत रासायनिक खताचा वापर केल्यास वाहत्या पाण्याबरोबरच खत वाया जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मशागत झालेल्या पिकांना खत घातल्यास पिके वाढीस उपयोग होणार असून, खतांमध्ये बदल केल्यास उत्पादनातही वाढ होईल, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांनी सांगितले.