शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

पावसाने तारले; किडींनी मारले

By admin | Updated: July 24, 2016 00:50 IST

राजेश खराडे , बीड बीड : जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला आहे. अद्यापपर्यंत झालेला रिमझिम पाऊस पिकांना लाभदायक ठरत असला

राजेश खराडे , बीडबीड : जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला आहे. अद्यापपर्यंत झालेला रिमझिम पाऊस पिकांना लाभदायक ठरत असला तरी सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. पारंपरिक पिकांना बाजूला सारत शेतकऱ्यांनी कडधान्यावर भर दिला आहे. त्यामुळे तूर, उडीद, मुगाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. १५ जुलैपर्यंत खरीपाची पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. त्यादृष्टीने कमी प्रमाणात का होईना गरजेच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने ६ लाख ५८ हजार २०४ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना ७ लाख ८७ हजार ८६० हेक्टरावर पेरणी झाली आहे. सध्या मशागतीची कामे पूर्ण झाली असतानाच पावसाच्या हजेरीमुळे पिके फोफावली आहेत. कापूस पाने लागण्याच्या अवस्थेत आहे तर बाजरी, तूर, उडीद, मूगही वाढीला लागली असून, फुलांच्या अवस्थेत आहेत. असे असताना मात्र या पिकांना मावा, तुडतुड्या, करप्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. ढगाळ वातावरणामुळे रोगराईत वाढ होत आहे. पिके बहरात असतानाच रोगराईने घेरल्याने शेतकरी चिंतेत आहे. विद्यापीठाने ठरवून शिफारशीनुसार औषध फवारणी गरजेची आहे. त्याकरिता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन महत्वाचे आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे गेल्या तीन वर्षापासून खरिपातील एकही उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. यंदा पावसाच्या हजेरीने पिके सुस्थितीत असली तरी रोगांपासून बचावासाठी योग्य मार्गदर्शन मिळने गरजेचे आहे. वेगवेगळ्या खतांचा वापर महत्त्वाचापाणी साठलेल्या अवस्थेत रासायनिक खताचा वापर केल्यास वाहत्या पाण्याबरोबरच खत वाया जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मशागत झालेल्या पिकांना खत घातल्यास पिके वाढीस उपयोग होणार असून, खतांमध्ये बदल केल्यास उत्पादनातही वाढ होईल, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांनी सांगितले.