शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

एक चतुर्थांशच पाऊस

By admin | Updated: July 21, 2014 00:25 IST

जालना : जिल्ह्यात २० जुलैपर्यंत अपेक्षित सरासरीच्या केवळ एक चतुर्थांश इतकाच पाऊस झाल्याने दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली

जालना : जिल्ह्यात २० जुलैपर्यंत अपेक्षित सरासरीच्या केवळ एक चतुर्थांश इतकाच पाऊस झाल्याने दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली असून पाणीटंचाईबरोबरच खरिपाची आतापर्यंत झालेली पेरणी वाया जाते की, काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे. गतवर्षी या तारखेपर्यंत २४४ मि.मी. पाऊस झाला होता. मात्र यावर्षी केवळ ६६.५३ मि.मी. पावसाची नोंद आहे. पाऊस लांबल्यामुळेच खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या आहेत. तसेच सर्वदूर चिंतेचे वातावरण पसरले आहे. या परिस्थितीत शासनाच्या सुचनेनुसार पिण्याच्या पाण्यासह चाराटंचाईसंदर्भात सर्वतोपरी उपाययोजना अवलंबिण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील पाणीसाठा आरक्षित करण्यात आला असून पाण्याचा अत्यंत काटेकोरपणे वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सर्व संबंधितांना दिल्या आहेत. पाणीपुरवठा योजनांचेही स्त्रोत तपासून, त्यातून पुढील नियोजन करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १३ गावे आणि १४ वाड्यांना ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १२८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ७८ हजार २५३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यापैकी ५२ हजार हेक्टर क्षेत्र केवळ कपाशीचे आहे. मूग, उडीद या पिकांचे क्षेत्र कमी होणार आहे. आतापर्यंत सुमारे ५० टक्के खरीप पीक कर्जाचे वाटप झाले आहे. सप्टेंबर २०१४ पर्यंत पुरेल एवढा चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सतर्क झाले असून टंचाईसंदर्भातील बैठका घेण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जलसाठा असलेल्या ठिकाणाहून पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी तहसीलदारांना कडक निर्देश दिलेले आहेत. शेतकरी मात्र आभाळाकडे डोळे लावून मोठ्या अपेक्षेने पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)सर्व प्रकल्पांतील जलसाठा आरक्षितग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करणे तसेच टँकरची संख्या वाढविण्याचे काम होत आहे. मात्र त्याचबरोबर पाण्याचे स्त्रोत शोधून त्याद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजनही करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत ज्या धरणांमध्ये पाणी आहे, ते आरक्षित ठेवण्यात आले आहे. जालना शहराला जायकवाडी, घाणेवाडीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या सहा दिवसांमध्ये शहराच्या काही भागात पाणीपुरवठा झालेला नाही.तालुकावार्षिक सरासरी अपेक्षित सरासरी झालेला पाऊसजालना६८६.२०२६१.४४८६.३८बदनापूर६८५.४०२८८.०६३८.८०भोकरदन६६२.८०२६०.११७७.५१जाफराबाद६४०.२०२३४.२०४५.००परतूर७४६.६०२३८.८५११८.८०मंठा७१२.९०२३३.८१३५.५०अंबड६६३.९०२१९.१९६९.८६घनसावंगी७०७.७०२४०.२३५४.४६एकूण६८८.२९२४४.२३६६.५३