शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस गायब; पिकांची वाढ खुंटली

By admin | Updated: July 12, 2015 00:17 IST

बीड : दिवसभर निरभ्र आभाळ अन रात्री टपुरं चांदण यामुळे शेतऱ्यांची झोप उडाली आहे. उन्हाळ्यातही पावसळ्याचे दिवस अनुभवयास मिळत आहे.

बीड : दिवसभर निरभ्र आभाळ अन रात्री टपुरं चांदण यामुळे शेतऱ्यांची झोप उडाली आहे. उन्हाळ्यातही पावसळ्याचे दिवस अनुभवयास मिळत आहे. पावसाने तर दगाबाजी केलीच आहे शिवाय उभं वारं सुटल्याने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं जातयं. निसर्गाने शेतकऱ्यांची जणू काही थट्टाच चालवली आहे. जिल्ह्यात सध्या दुबाराचा पेरा अनिवार्यंच झाला आहे. मात्र त्याकरिता तरी पावसाने हजेरी लावणे गरजेचे आहे. दिवस उगवताच स्वच्छ आभाळ व रखरखते ऊन पडत आहे. जमिनीतील ओल तर उडालीच आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी केविलवाणी कृत्रिम प्रयोग करू लागला आहे. काही भागात ओल टिकवून ठेवण्यासाठी ठिबकसिंचनचा वापर केला जात आहे. तर काही ठिकाणी चक्क टँकरद्वारे पिकांना पाणीपुरवठा केला जात आहे तर काही ठिकाणी उन्हापासून बचावासाठी कांद्याच्या रोपांवर कपड्याचे आच्छादन केले आहे. महिन्याभरापासून पावसाने दडी दिली आहे. आकाशात ढग भरून येताच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होत आहेत. मात्र त्यांच्या नशिबी केवळ निराशाच पडली आहे. गुरूवारी रात्री व शुक्रवारी सकाळी केज, अंबाजोगाई तालुक्यातील काही मंडळात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्याही काही मिनीटांपुरत्या तर शुक्रवारी सकाळी बीड शहर व परिसरात दिवसाची सुरवात पावसाने केली खरी मात्र, ती पिकांकरीता उपायकारक न ठरता अपायकारक ठरली आहे. झालेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांनी फवारणी सुरू केली आहे. त्यामुळे हा अतिरिक्त खर्च देखील वाढला आहे. (प्रतिनिधी)