शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

सलग तिसºया दिवशीही पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:33 AM

जिल्ह्यात गेल्या महिनाभराच्या काळात पहिल्यांदाच जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यातही हिंगोली तालुक्यात काल आणि आजही त्या तुलनेत चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र असून इतर तालुक्यांत मात्र नदी-नाले वाहते झाल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतकºयांचा पोळा हा सण मात्र आनंदात गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात गेल्या महिनाभराच्या काळात पहिल्यांदाच जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यातही हिंगोली तालुक्यात काल आणि आजही त्या तुलनेत चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र असून इतर तालुक्यांत मात्र नदी-नाले वाहते झाल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतकºयांचा पोळा हा सण मात्र आनंदात गेला आहे.हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. पावसाची भुरभुर तर तीन दिवसांपासून होत आहे. त्यात दोन दिवस अधून-मधून जोरदार पर्जन्यवृष्टीही झाली. विशेषत: रात्रीच्या वेळी पावसाने दोन दिवसही झोपडून काढले. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी ४६ व ३४ मिमी असा दोन दिवस पाऊस झाला. यामुळे सोयाबीनला फारसा फायदा होणार नाही. उडीद तर आधीच काढणीला आले आहेत. बºयाच ठिकाणी तर काढलेही आहेत. मूगही आता काही दिवसांतच काढणीत येणार आहेत. हलक्या जमिनीतील सोयाबीनची तर वाढ खुंटली होती. शिवाय झाडाची खालच्या भागातील पानेही वाळून जात होती. त्याचबरोबर शेंगाही कमीच लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेरणी झालेल्या या पिकाला कितपत फायदा होईल, हे सांगणे अवघड आहे.कोरडेठाक असलेले नदी-नाले एकदाचे वाहते झाले, एवढेच समाधान. तर भिज पावसामुळे जमिनीत पाणी मुरल्याने भूगर्भातील पाणीपातळी काही प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे. मात्र एक-दोन वगळता इतर कोणत्याच ठिकाणचे लघुप्रकल्पही भरले नाहीत. त्यामुळे यंदा टंचाईचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी आणखी पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. खरिपातील काही पिके तर आधीच हातची गेली आहेत. निदान रबीला तरी फायदा व्हावा, यासाठी आणखीही पावसाची गरज आहे.पोळा आनंदातचांगले पर्जन्य झाल्यामुळे पोळा मात्र आनंदात गेला आहे. दुष्काळी सावटामुळे चिंतेत असलेल्या शेतकºयांनी पावसाचे आगमन होताच पोळा धूमधडाक्यात साजरा केला. या पोळ्यात पावसासोबतच उत्साहही आल्याचे चित्र होते.मंडळनिहाय पाऊसहिंगोली-११, खांबाळा-१0, माळहिवरा-१२, सिरसम बु.-७, बासंबा-१८, नर्सी ना.-२६, डिग्रस-२९, कळमनुरी-५0, नांदापूर-२४, आखाडा बाळापूर-३४, डोंगरकडा-३३, वारंगा फाटा-३४, वाकोडी-१७, सेनगाव-७0, गोरेगाव-४0, आजेगाव-१२, साखरा-३३, पानकनेरगाव-१८, हत्त्ता-६६, वसमत-१५, हट्टा-४५, गिरगाव-२१, कुरुंदा-६९, टेंभूर्णी-१४, आंबा-६0, हयातनगर-१७, औंढा नागनाथ-६0, जवळा बाजार-४८, येहळेगाव-४६, साळणा-४५ मिमी असे मंडळनिहाय पर्जन्यमान आहे. तर जिल्ह्याची एकूण सरासरी ३४.४३ एवढी आहे.