शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

सलग तिसºया दिवशीही पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:33 IST

जिल्ह्यात गेल्या महिनाभराच्या काळात पहिल्यांदाच जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यातही हिंगोली तालुक्यात काल आणि आजही त्या तुलनेत चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र असून इतर तालुक्यांत मात्र नदी-नाले वाहते झाल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतकºयांचा पोळा हा सण मात्र आनंदात गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात गेल्या महिनाभराच्या काळात पहिल्यांदाच जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यातही हिंगोली तालुक्यात काल आणि आजही त्या तुलनेत चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र असून इतर तालुक्यांत मात्र नदी-नाले वाहते झाल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतकºयांचा पोळा हा सण मात्र आनंदात गेला आहे.हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. पावसाची भुरभुर तर तीन दिवसांपासून होत आहे. त्यात दोन दिवस अधून-मधून जोरदार पर्जन्यवृष्टीही झाली. विशेषत: रात्रीच्या वेळी पावसाने दोन दिवसही झोपडून काढले. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी ४६ व ३४ मिमी असा दोन दिवस पाऊस झाला. यामुळे सोयाबीनला फारसा फायदा होणार नाही. उडीद तर आधीच काढणीला आले आहेत. बºयाच ठिकाणी तर काढलेही आहेत. मूगही आता काही दिवसांतच काढणीत येणार आहेत. हलक्या जमिनीतील सोयाबीनची तर वाढ खुंटली होती. शिवाय झाडाची खालच्या भागातील पानेही वाळून जात होती. त्याचबरोबर शेंगाही कमीच लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेरणी झालेल्या या पिकाला कितपत फायदा होईल, हे सांगणे अवघड आहे.कोरडेठाक असलेले नदी-नाले एकदाचे वाहते झाले, एवढेच समाधान. तर भिज पावसामुळे जमिनीत पाणी मुरल्याने भूगर्भातील पाणीपातळी काही प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे. मात्र एक-दोन वगळता इतर कोणत्याच ठिकाणचे लघुप्रकल्पही भरले नाहीत. त्यामुळे यंदा टंचाईचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी आणखी पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. खरिपातील काही पिके तर आधीच हातची गेली आहेत. निदान रबीला तरी फायदा व्हावा, यासाठी आणखीही पावसाची गरज आहे.पोळा आनंदातचांगले पर्जन्य झाल्यामुळे पोळा मात्र आनंदात गेला आहे. दुष्काळी सावटामुळे चिंतेत असलेल्या शेतकºयांनी पावसाचे आगमन होताच पोळा धूमधडाक्यात साजरा केला. या पोळ्यात पावसासोबतच उत्साहही आल्याचे चित्र होते.मंडळनिहाय पाऊसहिंगोली-११, खांबाळा-१0, माळहिवरा-१२, सिरसम बु.-७, बासंबा-१८, नर्सी ना.-२६, डिग्रस-२९, कळमनुरी-५0, नांदापूर-२४, आखाडा बाळापूर-३४, डोंगरकडा-३३, वारंगा फाटा-३४, वाकोडी-१७, सेनगाव-७0, गोरेगाव-४0, आजेगाव-१२, साखरा-३३, पानकनेरगाव-१८, हत्त्ता-६६, वसमत-१५, हट्टा-४५, गिरगाव-२१, कुरुंदा-६९, टेंभूर्णी-१४, आंबा-६0, हयातनगर-१७, औंढा नागनाथ-६0, जवळा बाजार-४८, येहळेगाव-४६, साळणा-४५ मिमी असे मंडळनिहाय पर्जन्यमान आहे. तर जिल्ह्याची एकूण सरासरी ३४.४३ एवढी आहे.