शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

औरंगाबादचे रेल्वे स्टेशन, बस स्थानक इज्तेमासाठी आलेल्या साथींच्या अलोट गर्दीने फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:46 IST

राज्यस्तरीय इज्तेमानिमित्त रेल्वेस्टेशन आणि शहरातील बसस्थानक ‘साथी’ बांधवांच्या गर्दीने फुलून गेले.

औरंगाबाद : राज्यस्तरीय इज्तेमानिमित्त रेल्वेस्टेशन आणि शहरातील बसस्थानक ‘साथी’ बांधवांच्या गर्दीने फुलून गेले. त्यांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी रेल्वे अधिकारी आणि एसटी महामंडळाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. 

रेल्वेस्टेशनवर गेल्या दोन दिवसांत पाच विशेष रेल्वेंसह नियमित रेल्वेतून दीड लाखांवर ‘साथी’ बांधव दाखल झाल्याचा अंदाज रेल्वे सुरक्षा बलाकडून वर्तविण्यात आला आहे. रेल्वेस्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि मालधक्का परिसरात तात्पुरत्या स्वरूपात ५ तिकीट कक्ष, एक चौकशी कक्ष, आरपीएफ बुथ, जीआरपी बुथ स्थापन करण्यात आले आहे. रेल्वेने येणारे साथी मालधक्का परिसरातून इज्तेमा परिसराकडे रवाना होतात. शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण नियोजन करण्यात आल्याचे पाहायला मिळते.

एसटी महामंडळातर्फे जिल्हाभरात ठिकठिकाणाहून जादा बस सोडण्यात येत आहेत. याबरोबर पुणे मार्गावरील बसेसमधून वाहतूक करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानक, कर्णपुरा मैदान या ठिकाणी रविवारी साथींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गर्दीनुसार बसेस सोडण्यावर भर देण्यात आला. साथींसाठी रेल्वेस्टेशन, बसस्थानकात पाणीवाटप करण्यासह आवश्यक मदतीसाठी खिदमतगार कार्यरत आहेत.

प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ

रेल्वे प्रशासनाने २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट दर १० रुपयाने वाढवून २० रुपये केले आहे. रेल्वेस्टेशनवर गर्दी वाढत आहे. प्लॅटफॉर्मवर ये-जा करणे सोयीचे राहावे, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ही वाढ केल्याचे ‘दमरे’ने कळविले.

विमानसेवा फूलदिल्ली, मुंबईहून येणारे विमान काही दिवसांपासून ९० टक्क्यांवर भरून येत आहे. परदेशातून मुंबई, दिल्लीत दाखल झाल्यानंतर  तेथून औरंगाबादपर्यंतचा प्रवास विमानाने करण्यास प्राधान्य देण्यात आला. यामध्ये देश-विदेशातून अनेक जण खास इज्तेमासाठी शहरात दाखल झाले. आगामी दोन दिवसांतील विमानांचे बुकिंगही जवळपास फूल आहे. एअर  इंडियाच्या अधिकार्‍यांनी यास दुजोरा दिला.

आज धावणार्‍या विशेष रेल्वे

२६ फेब्रुवारीला औरंगाबाद-आदिलाबाद ही विशेष रेल्वे औरंगाबादहून दुपारी १.५५ वाजता सुटेल. औरंगाबाद-गुलबर्गा रेल्वे  सायंकाळी ६.३० वाजता सुटेल. औरंगाबाद-परळी रेल्वे सायंकाळी ६.३० वाजता सुटेल. औरंगाबाद-मनमाड रेल्वे सायंकाळी ६.५० वाजता सुटेल, तसेच औरंगाबाद-सीएसटी मुंबई विशेष रेल्वे सायंकाळी ७.५० वाजता सुटेल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली.

आरोग्य यंत्रणा दक्ष; प्रथमोपचार केंद्र, अतिदक्षता विभागाद्वारे रुग्णसेवाराज्यस्तरीय इज्तेमासाठी देश-विदेशातून आलेल्या ‘साथी’ बांधवांसाठी आरोग्य यंत्रणा २४ तास दक्ष आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आणि खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर्स रुग्णसेवा देत आहेत. जिल्हा परिषदेचे ३८ डॉक्टर, १२ औषध निर्माण अधिकारी, १० आरोग्य सहायक, ३० आरोग्य सेवक देण्यात आलेले आहेत. इज्तेमा परिसरात जवळपास २२ प्रथमोपचार केंद्रे, ६ अतिदक्षता विभाग स्थापन करण्यात आले आहेत. याबरोबरच घाटी रुग्णालयातर्फे ५ फिजिशियन, ३ सर्जन, २ आॅर्थोपेडिक सर्जन रुग्णसेवा देत आहेत. समन्वयक म्हणून डॉ. सय्यद अश्फाक काम पाहत आहेत. या ठिकाणी आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी भेट देऊन रुग्णसेवेचा आढावा घेतला. इज्तेमाच्या पार्श्वभूमीवर घाटी रुग्णालयातही ४० खाटांचा विशेष वॉर्ड दक्ष ठेवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत इज्तेमासाठी आलेल्या २७ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती डॉ. भारत सोनवणे यांनी दिली.

रुग्णवाहिकांचा मोठा ताफा इज्तेमा परिसरात रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत. १०८ क्रमांकाच्या १० रुग्णवाहिका आहेत, तसेच २५ डॉक्टरांसह कर्मचार्‍यांचे पथक कर्तव्य पार पाडत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी दिली. 

टॅग्स :Ijtema Aurangabad 2018इज्तेमा औरंगाबाद २०१८state transportएसटीRailway Passengerरेल्वे प्रवासी