शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
3
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
4
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
5
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
9
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
11
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
12
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
13
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
14
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
15
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
16
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
17
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
18
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
19
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!

औरंगाबादचे रेल्वे स्टेशन, बस स्थानक इज्तेमासाठी आलेल्या साथींच्या अलोट गर्दीने फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:46 IST

राज्यस्तरीय इज्तेमानिमित्त रेल्वेस्टेशन आणि शहरातील बसस्थानक ‘साथी’ बांधवांच्या गर्दीने फुलून गेले.

औरंगाबाद : राज्यस्तरीय इज्तेमानिमित्त रेल्वेस्टेशन आणि शहरातील बसस्थानक ‘साथी’ बांधवांच्या गर्दीने फुलून गेले. त्यांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी रेल्वे अधिकारी आणि एसटी महामंडळाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. 

रेल्वेस्टेशनवर गेल्या दोन दिवसांत पाच विशेष रेल्वेंसह नियमित रेल्वेतून दीड लाखांवर ‘साथी’ बांधव दाखल झाल्याचा अंदाज रेल्वे सुरक्षा बलाकडून वर्तविण्यात आला आहे. रेल्वेस्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक चार आणि मालधक्का परिसरात तात्पुरत्या स्वरूपात ५ तिकीट कक्ष, एक चौकशी कक्ष, आरपीएफ बुथ, जीआरपी बुथ स्थापन करण्यात आले आहे. रेल्वेने येणारे साथी मालधक्का परिसरातून इज्तेमा परिसराकडे रवाना होतात. शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण नियोजन करण्यात आल्याचे पाहायला मिळते.

एसटी महामंडळातर्फे जिल्हाभरात ठिकठिकाणाहून जादा बस सोडण्यात येत आहेत. याबरोबर पुणे मार्गावरील बसेसमधून वाहतूक करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानक, कर्णपुरा मैदान या ठिकाणी रविवारी साथींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गर्दीनुसार बसेस सोडण्यावर भर देण्यात आला. साथींसाठी रेल्वेस्टेशन, बसस्थानकात पाणीवाटप करण्यासह आवश्यक मदतीसाठी खिदमतगार कार्यरत आहेत.

प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ

रेल्वे प्रशासनाने २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट दर १० रुपयाने वाढवून २० रुपये केले आहे. रेल्वेस्टेशनवर गर्दी वाढत आहे. प्लॅटफॉर्मवर ये-जा करणे सोयीचे राहावे, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात ही वाढ केल्याचे ‘दमरे’ने कळविले.

विमानसेवा फूलदिल्ली, मुंबईहून येणारे विमान काही दिवसांपासून ९० टक्क्यांवर भरून येत आहे. परदेशातून मुंबई, दिल्लीत दाखल झाल्यानंतर  तेथून औरंगाबादपर्यंतचा प्रवास विमानाने करण्यास प्राधान्य देण्यात आला. यामध्ये देश-विदेशातून अनेक जण खास इज्तेमासाठी शहरात दाखल झाले. आगामी दोन दिवसांतील विमानांचे बुकिंगही जवळपास फूल आहे. एअर  इंडियाच्या अधिकार्‍यांनी यास दुजोरा दिला.

आज धावणार्‍या विशेष रेल्वे

२६ फेब्रुवारीला औरंगाबाद-आदिलाबाद ही विशेष रेल्वे औरंगाबादहून दुपारी १.५५ वाजता सुटेल. औरंगाबाद-गुलबर्गा रेल्वे  सायंकाळी ६.३० वाजता सुटेल. औरंगाबाद-परळी रेल्वे सायंकाळी ६.३० वाजता सुटेल. औरंगाबाद-मनमाड रेल्वे सायंकाळी ६.५० वाजता सुटेल, तसेच औरंगाबाद-सीएसटी मुंबई विशेष रेल्वे सायंकाळी ७.५० वाजता सुटेल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली.

आरोग्य यंत्रणा दक्ष; प्रथमोपचार केंद्र, अतिदक्षता विभागाद्वारे रुग्णसेवाराज्यस्तरीय इज्तेमासाठी देश-विदेशातून आलेल्या ‘साथी’ बांधवांसाठी आरोग्य यंत्रणा २४ तास दक्ष आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) आणि खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर्स रुग्णसेवा देत आहेत. जिल्हा परिषदेचे ३८ डॉक्टर, १२ औषध निर्माण अधिकारी, १० आरोग्य सहायक, ३० आरोग्य सेवक देण्यात आलेले आहेत. इज्तेमा परिसरात जवळपास २२ प्रथमोपचार केंद्रे, ६ अतिदक्षता विभाग स्थापन करण्यात आले आहेत. याबरोबरच घाटी रुग्णालयातर्फे ५ फिजिशियन, ३ सर्जन, २ आॅर्थोपेडिक सर्जन रुग्णसेवा देत आहेत. समन्वयक म्हणून डॉ. सय्यद अश्फाक काम पाहत आहेत. या ठिकाणी आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी भेट देऊन रुग्णसेवेचा आढावा घेतला. इज्तेमाच्या पार्श्वभूमीवर घाटी रुग्णालयातही ४० खाटांचा विशेष वॉर्ड दक्ष ठेवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत इज्तेमासाठी आलेल्या २७ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती डॉ. भारत सोनवणे यांनी दिली.

रुग्णवाहिकांचा मोठा ताफा इज्तेमा परिसरात रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत. १०८ क्रमांकाच्या १० रुग्णवाहिका आहेत, तसेच २५ डॉक्टरांसह कर्मचार्‍यांचे पथक कर्तव्य पार पाडत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी दिली. 

टॅग्स :Ijtema Aurangabad 2018इज्तेमा औरंगाबाद २०१८state transportएसटीRailway Passengerरेल्वे प्रवासी