शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दौलताबादला रेल्वे मालधक्का; २४ बोगीच्या पीटलाइनचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 08:01 IST

रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येत असून, यात साताऱ्याच्या दिशेनेही रेल्वे स्टेशनची इमारत उभारण्यात येत आहे. शिवाय मालधक्क्याला लागूनच १६ बोगींची पीटलाइन करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रेल्वे स्टेशन येथील मालधक्का दौलताबाद येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. दौलताबाद येथे मालधक्का साकारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली. मालधक्का स्थलांतरित होणार असल्याने छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर २४ बोगींच्या पीटलाइनचा मार्ग मोकळा झाला आहे.

रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येत असून, यात साताऱ्याच्या दिशेनेही रेल्वे स्टेशनची इमारत उभारण्यात येत आहे. शिवाय मालधक्क्याला लागूनच १६ बोगींची पीटलाइन करण्यात आली आहे.

२४ बोगींच्या पीटलाइनसाठी मालधक्का स्थलांतरित करण्याची सूचना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील मालधक्का इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी अनेक दिवस जागेचा शोध घेण्यात आला होता.

येथे काय येते, जाते?

येथे देशभरातून सिमेंट, तांदूळ, गहू यासह युरिया आणि इतर मालाची आवक होत असते.

ट्रॅक्टरही मालधक्क्यावर उतरविण्यात येतात.

विविध ठिकाणांहून माल येथून देशातील विविध भागांत पाठविण्यात येतो.

दौलताबाद स्टेशन येथे काय काय होणार?

गुड्स साइडिंग लाइन.

प्लॅटफाॅर्मचे बांधकाम.

हमाल आणि व्यापारी खोल्या.

ट्रॅक टाकणे आणि जोडणे.

कामाचा कालावधी  - १८ महिने.