शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

रेल्वे भाडेवाढ : ‘उलटे दिन आ गये’

By admin | Updated: June 21, 2014 01:00 IST

औरंगाबाद : केंद्रातील भाजपा सरकारने आज रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्के व मालवाहतूक भाड्यात ६.५ टक्के एवढी मोठी वाढ केली.

औरंगाबाद : केंद्रातील भाजपा सरकारने आज रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्के व मालवाहतूक भाड्यात ६.५ टक्के एवढी मोठी वाढ केली. याविषयी शहरातील उद्योजक, व्यापारी वर्गात संमिश्र प्रतिक्रिया उमटली. काहींचे मत मालवाहतूक वाढल्याने महागाईत वाढ होईल, असे होते तर काहींनी पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी भाडेवाढ आवश्यक होती, असे मत व्यक्त केले. भाडेवाढ केली आता सुविधा वाढवाकेंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवास व मालवाहतूक भाड्यात वाढ केली. ही भाडेवाढ आवश्यक होती. कारण, मागील १० वर्षांपासून भाडेवाढ झाली नव्हती. मात्र, आता रेल्वेने आपल्या सेवेची गुणवत्ता वाढविणे आवश्यक आहे. रेल्वेने माल वेळेवर पोहोचविणे, ग्राहकांना चांगल्या सुविधा देणे व रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी चांगले वागावे हीच अपेक्षा आहे. -मानसिंग पवार, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर‘उलटे दिन आ गये’रेल्वे प्रवास भाडे व मालवाहतूक भाड्यात वाढ झाल्याने ‘अच्छे दिन नव्हे, तर उलटे दिन आ गये’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. मालवाहतूक भाडेवाढीने कच्च्या मालाचा भाव वाढून उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. आधीच मंदीचे वातावरण आहे. उत्पादन खर्च कमी करून वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न होत असताना त्यात मालवाहतूक भाडेवाढीने उद्योजकांना उत्पादन खर्च व उत्पादनाची किंमत यात ताळमेळ बसविणे कठीण जाणार आहे.-भारत मोतिंगे, अध्यक्ष, मासिआरेल्वेचा नियोजनशून्य कारभार रेल्वेचा कारभार नियोजनशून्य बनला आहे. वेळेवर मालगाडी येत नाही. माल उतरून घेण्यासाठी सुविधा नाही. मोठे गोदाम नाहीत. एवढेच नव्हे तर संपूर्ण मालगाडीतून माल उतरून घेण्यासाठी ६ तासांची वेळ दिली आहे. ही वेळ ८ तासांपर्यंत वाढविण्यात यावी. केंद्र सरकारने मालवाहतुकीत भाडेवाढ केली तेव्हा याचा विचारही करणे आवश्यक आहे. भाडेवाढ केली तर चांगली सुविधा पुरवणे आता रेल्वे विभागाचे काम आहे. -फय्याजखान, अध्यक्ष, मालवाहतूकदार संघटनापायाभूत सुविधेवर खर्च होणार असेल तर ठीककेंद्र सरकारने रेल्वे प्रवास व मालवाहतूक भाड्यात वाढ केली आहे. यामुळे रेल्वेच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे. मिळणारी रक्कम पायाभूत सुविधेवर खर्च करण्यात येणार असेल तर भाडेवाढ ठीक आहे. कारण, रेल्वेची सेवा चांगली होण्यासाठी पायाभूत सुविधा वाढणे आवश्यक आहे. चांगल्या सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील.-अजय शहा, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघउत्पादन खर्च वाढणार रेल्वेच्या मालवाहतूक भाड्यात तब्बल ६.५ टक्क्यांनी वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम, उत्पादन खर्च वाढीत होणार आहे. कारण, उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल रेल्वेनेसुद्धा आणला जातो. या भाडेवाढीने कच्च्या मालाचे भाव वाढतील तसेच उत्पादन खर्च वाढेल. शहरातील आॅटोमोबाईल हबमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन निर्यात होते. यामुळे निर्यात खर्चातही वाढ होईल. मंदीच्या काळात उद्योगांना याचा मोठा फटका बसेल.-मुनीष शर्मा, उपाध्यक्ष, सीएमआयएमहागाई वाढणार लालूप्रसाद यादव यांनी प्रवासी व मालवाहतूक भाडेवाढ न करता रेल्वेला नफ्यात आणले होते. आताही नवीन केंद्र सरकारकडून हीच अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अचानक दुहेरी भाडेवाढ करून भारतीय जनतेला मोठा धक्काच दिला आहे. यामुळे महागाई वाढेल. स्पर्धेच्या व मंदीच्या काळात अशी भाडेवाढ करणे चुकीचे आहे. -सुनील किर्देक सचिव, मासिआजनतेची फसवणूक‘अच्छे दिन आनेवाले हैं’ म्हणत जनतेची मते घेतलेल्या भाजपा सरकारने रेल्वेच्या प्रवास व मालवाहतूक दरात वाढ करून जनतेची मोठी फसवूणक केली आहे. या दुहेरी भाडेवाढीने जनतेचे कंबरडे मोडेल. या भाडेवाढीचा केंद्र सरकारने फेरविचार करणे आवश्यक आहे. नसता जनता येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानातून आपल्या संतप्त भावना व्यक्त करील. -शिवनाथ राठी, ज्येष्ठ समाजसेवकरेल्वे भाडेवाढप्रकरणी युतीचे तोंड बंदकेंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे भाड्यात दरवाढ केल्यानंतर प्रतिक्रियेसाठी शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता अनेकांचे फोन बंद होते, तर काहींना काय प्रतिक्रिया द्यावी, असा प्रश्न पडला. यापूर्वी १ रुपयाने दरवाढ झाली तर आंदोलनाने निषेध केला जायचा आणि आता एवढी जबर दरवाढ केल्यावर काय बोलावे हे कळत नसल्याचे मतही काहींनी व्यक्त केले. खा. चंद्रकांत खैरे यांच्याशी संंपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, भाजपा शहराध्यक्ष भगवान घडामोडे हे प्रतिक्रि येसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.केंद्रीय अर्थसंकल्प कसा असेल, त्याचे संकेत केंद्र सरकारने एकदाच मोठ्या प्रमाणात रेल्वे भाडेवाढ करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण, नवीन सरकारकडून सर्वांना मोठी अपेक्षा होती. भाडेवाढ होणे अपेक्षित होते; पण एकदम मोठी वाढ सर्वसामान्यांना न परवडण्यासारखी आहे. या भाडेवाढीने आगामी केंद्रीय अर्थसंकल्प कसा असेल, याचे संकेत मिळाले आहेत. -आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ