शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

कचऱ्यामुळे अर्धातास थांबली रेल्वे

By admin | Updated: August 3, 2016 00:18 IST

औरंगाबाद : रेल्वेगाडीतील अस्वच्छतेमुळे मंगळवारी रेल्वे अधिकाऱ्यांची साखरझोप उडाली. नगरसोल-नांदेड पॅसेंजरमधील बोगींतील अस्वच्छतेने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

औरंगाबाद : रेल्वेगाडीतील अस्वच्छतेमुळे मंगळवारी रेल्वे अधिकाऱ्यांची साखरझोप उडाली. नगरसोल-नांदेड पॅसेंजरमधील बोगींतील अस्वच्छतेने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्वच्छता झाल्याशिवाय रेल्वे पुढे रवाना होणार नाही, असा पवित्रा काहींनी घेतला. याविषयी प्रवाशांनी थेट दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापकांना मोबाईलवर संपर्क साधून तक्रार केली. अखेर बोगींची स्वच्छता झाल्यानंतरच ही रेल्वे पुढे रवाना झाली.रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छता अभियानावर भर दिला जात असल्याचे दिसते. परंतु त्याच वेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातही पॅसेंजर रेल्वेगाड्यांमध्ये कायम कचऱ्याचे साम्राज्य असते. रोटेगाव,परसोडा, लासूर, पोटूळ आदी ठिकाणांहून शिक्षण,नोकरी,व्यवसायानिमित्त दररोज औरंगाबाद आणि जालना येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अशा प्रवाशांना सकाळी ७ वाजता येणारी नगरसोल-नांदेड पॅसेंजर सोयीची ठरते. रेल्वे रवाना करण्याआधी प्रत्येक बोगीची स्वच्छता करणे आवश्यक आहे. त्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून या रेल्वेची नियमित साफसफाई करण्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीमुळे प्रत्येक बोगीमध्ये कचऱ्याचे ढीग जमा झाले. त्यामुळे प्रवास करताना दुर्गंधीचा त्रास सहन करण्याची वेळ प्रवाशांवर येत होती. आज ना उद्या स्वच्छता होईल, असे प्रवाशांना वाटत होते. मात्र, या रेल्वेत कचऱ्याचे ढीग पाहून मंगळवारी सकाळी प्रवाशांचा संयम सुटला. ही रेल्वे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर आल्यावर प्रवाशांनी थेट विभागीय रेल्वे व्यवस्थापक ए.के.सिन्हा यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. तसेच काहींनी बोगींमधील कचऱ्याचे छायाचित्रही त्यांना व्हॉटस् अ‍ॅपद्वारे पाठविले. रेल्वेची ही (पान ५ वर)