शहरं
Join us  
Trending Stories
1
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
2
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
3
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
4
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
5
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
6
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
7
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
8
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
9
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
10
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
11
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
12
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
13
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
14
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
15
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
16
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
17
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
18
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
19
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
20
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका

सलग दुसऱ्या वर्षीही आठवलेंच्या सभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 07:15 IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंची सभा सुरु असताना सुत्रसंचालन करणारे मिलिंद शेळके यांनी बाबासाहेबांचा नातू म्हणून घेणारा चोर आहे, असे उद्गार काढताच समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय संतप्त झाला आणि खुर्च्यांची मोडतोड करू लागला.

औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंची सभा सुरु असताना सूत्रसंचालन करणारे मिलिंद शेळके यांनी बाबासाहेबांचा नातू म्हणून घेणारा चोर आहे, असे उद्गार काढताच समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय संतप्त झाला आणि खुर्च्यांची मोडतोड करू लागला.

या सभेला पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. हा गोंधळ सुरु झाला तेव्हा प्रसंगावधान राखून जमावाला शांत करण्यासाठी पोलीस धावले. लाठीचार्ज न करता जमावाला शांत करीत जागेवर बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त तरुणांनी खुर्च्यांची प्रचंड मोडतोड करीत घोषणाबाजी केली. तेव्हा हजारोंच्या संख्येने सभेसाठी जमलेला जमाव हा प्रकार पाहून सैरावैरा धावत सुटला.

यावेळी व्यापीठावर आठवले यांच्या भोवती त्यांच्या बॉडीगार्डने कडे केले. व्यासपीठावर बसलेले कार्यकर्ते खाली उतरले व जमावाला शांत करीत जागेवर बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार पाहून जवळपास अर्ध्यावर जमाव निघून गेला होता. त्यानंतर पुन्हा सभा सुरु झाली. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ प्रास्ताविकात म्हणाले, नामांतरचा हा लढा रामदास आठवले यांनी सलग १७ वर्षे लढला आणि तो यशस्वीही केला. या लढ्यात हजारो दलितांच्या घराची राखरांगोळी झाली. शेकडो भिमसैनिकांचे बळी गेले. बाळासाहेबांचा आाम्हाला आदर आहे. परंतु बाळासाहेब आपण या लढ्याला ‘ आऊट डेटेड इशू’ म्हणालात. माझे तुम्हाला पाच प्रश्न आहे. नामांतराच्या या लढ्यात तुम्ही कुठे होतात. खैरलांजी हत्याकांड झाल्यानंतर भोतमांगेला न्याय देण्याच्या लढ्यात आपण कुठे होता.

संयज ठोकळ यांचे प्रास्ताविक संपल्यानंतर सूत्रसंचालनासाठी मिलिंद शेळके यांनी माईक हातात घेतला व ते म्हणाले, तुम्ही त्यांना हेही विचारा बाबासाहेबांच्या पत्नी माईसाहेबांना अखेरच्या वेळी संभाळताना तुम्ही कुठे होता. पीईएसच्या जागेवर कार्यक्रम घेण्यासाठी २५-२५ हजार रुपये घेतले जातात. बाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे उद््गार ऐकताच व्यासपीठासमोर सभेसाठी बसलेला जमाव संतप्त झाला. त्यातील तरुणांच्या टोळक्याने खुर्च्यावर फेकत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. जमाव सैरावैर पळू लागला.

बाबूराव कदम, नागराज गायकवाड, अ‍ॅड. गौतम भालेराव, टीपू सुलतानचे वंशज मन्सूरअली खान, खा. चंद्रकांत खैरे यांची भाषणे झाल्यानंतर रामदास आठवले यांच्या भाषणाने आजच्या या सभेचा शेवट झाला. आठवले आपल्या भाषणात म्हणाले, आजचा हा दिवस कोणावरही टिका टिप्पणी करण्याचा नाही. पक्ष वेगवेगळे असतील. पण ‘जय भिम’च्या नावाखाली आपण सर्व एकच आहोत. आपल्या समाजाच्या नेत्यांवर टिका करू नये. याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे. आजही आपले सर्व नेते व सगळा समाज एकत्र येत असेल तर मी मंत्रीपदाला लाथ मारायला तयार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. ऐक्य होत असेल तर मंत्रीपद साडायाला आजही तयार आहे. मंत्रीपदे अशी येत असतात आणि जात असतात. एक कार्यकर्ता म्हणून मी सैदेव तुमच्या सोबत राहीन.

दगडफेकही झालीसंतप्त जमावाने खुर्च्यांची मोडतोड तर केलीच, पण समोर व्यासपीठाच्या दिशेने दगडफेक केली. यावेळी राजनंदीनी साऊंड सर्व्हिसचे संचालक किशोर बाबर यांच्या डोक्यात मोठी इजा झाली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

 

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणNamantar Andolanनामांतर आंदोलन