शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या वर्षीही आठवलेंच्या सभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 07:15 IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंची सभा सुरु असताना सुत्रसंचालन करणारे मिलिंद शेळके यांनी बाबासाहेबांचा नातू म्हणून घेणारा चोर आहे, असे उद्गार काढताच समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय संतप्त झाला आणि खुर्च्यांची मोडतोड करू लागला.

औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंची सभा सुरु असताना सूत्रसंचालन करणारे मिलिंद शेळके यांनी बाबासाहेबांचा नातू म्हणून घेणारा चोर आहे, असे उद्गार काढताच समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय संतप्त झाला आणि खुर्च्यांची मोडतोड करू लागला.

या सभेला पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. हा गोंधळ सुरु झाला तेव्हा प्रसंगावधान राखून जमावाला शांत करण्यासाठी पोलीस धावले. लाठीचार्ज न करता जमावाला शांत करीत जागेवर बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त तरुणांनी खुर्च्यांची प्रचंड मोडतोड करीत घोषणाबाजी केली. तेव्हा हजारोंच्या संख्येने सभेसाठी जमलेला जमाव हा प्रकार पाहून सैरावैरा धावत सुटला.

यावेळी व्यापीठावर आठवले यांच्या भोवती त्यांच्या बॉडीगार्डने कडे केले. व्यासपीठावर बसलेले कार्यकर्ते खाली उतरले व जमावाला शांत करीत जागेवर बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार पाहून जवळपास अर्ध्यावर जमाव निघून गेला होता. त्यानंतर पुन्हा सभा सुरु झाली. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ प्रास्ताविकात म्हणाले, नामांतरचा हा लढा रामदास आठवले यांनी सलग १७ वर्षे लढला आणि तो यशस्वीही केला. या लढ्यात हजारो दलितांच्या घराची राखरांगोळी झाली. शेकडो भिमसैनिकांचे बळी गेले. बाळासाहेबांचा आाम्हाला आदर आहे. परंतु बाळासाहेब आपण या लढ्याला ‘ आऊट डेटेड इशू’ म्हणालात. माझे तुम्हाला पाच प्रश्न आहे. नामांतराच्या या लढ्यात तुम्ही कुठे होतात. खैरलांजी हत्याकांड झाल्यानंतर भोतमांगेला न्याय देण्याच्या लढ्यात आपण कुठे होता.

संयज ठोकळ यांचे प्रास्ताविक संपल्यानंतर सूत्रसंचालनासाठी मिलिंद शेळके यांनी माईक हातात घेतला व ते म्हणाले, तुम्ही त्यांना हेही विचारा बाबासाहेबांच्या पत्नी माईसाहेबांना अखेरच्या वेळी संभाळताना तुम्ही कुठे होता. पीईएसच्या जागेवर कार्यक्रम घेण्यासाठी २५-२५ हजार रुपये घेतले जातात. बाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे उद््गार ऐकताच व्यासपीठासमोर सभेसाठी बसलेला जमाव संतप्त झाला. त्यातील तरुणांच्या टोळक्याने खुर्च्यावर फेकत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. जमाव सैरावैर पळू लागला.

बाबूराव कदम, नागराज गायकवाड, अ‍ॅड. गौतम भालेराव, टीपू सुलतानचे वंशज मन्सूरअली खान, खा. चंद्रकांत खैरे यांची भाषणे झाल्यानंतर रामदास आठवले यांच्या भाषणाने आजच्या या सभेचा शेवट झाला. आठवले आपल्या भाषणात म्हणाले, आजचा हा दिवस कोणावरही टिका टिप्पणी करण्याचा नाही. पक्ष वेगवेगळे असतील. पण ‘जय भिम’च्या नावाखाली आपण सर्व एकच आहोत. आपल्या समाजाच्या नेत्यांवर टिका करू नये. याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे. आजही आपले सर्व नेते व सगळा समाज एकत्र येत असेल तर मी मंत्रीपदाला लाथ मारायला तयार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. ऐक्य होत असेल तर मंत्रीपद साडायाला आजही तयार आहे. मंत्रीपदे अशी येत असतात आणि जात असतात. एक कार्यकर्ता म्हणून मी सैदेव तुमच्या सोबत राहीन.

दगडफेकही झालीसंतप्त जमावाने खुर्च्यांची मोडतोड तर केलीच, पण समोर व्यासपीठाच्या दिशेने दगडफेक केली. यावेळी राजनंदीनी साऊंड सर्व्हिसचे संचालक किशोर बाबर यांच्या डोक्यात मोठी इजा झाली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

 

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणNamantar Andolanनामांतर आंदोलन