शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

रबीच्या पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST

जालना : संपूर्ण जिल्ह्यात रबीच्या पेरण्या पूर्णत: खोळंबल्याने सर्व सामान्य शेतकरी चिंतातूर झाले आहेत. या जिल्ह्यात या वर्षी अल्पसा पाऊस झाला.

जालना : संपूर्ण जिल्ह्यात रबीच्या पेरण्या पूर्णत: खोळंबल्याने सर्व सामान्य शेतकरी चिंतातूर झाले आहेत. या जिल्ह्यात या वर्षी अल्पसा पाऊस झाला. त्या पावसावरच खरिपाच्या पेरण्या झाल्या. अधूनमधून पडलेल्या पावसावरच खरीप पिके तरली. जगली. मात्र आता परतीच्या पावसाअभावी रबी पेरण्या पूर्णत: धोक्यात आल्या आहेत. दिवाळीचा सण आणि रबीची पेरणीची धावपळ असे चित्र दिसायला हवे होते. परंतु यावर्षी पाऊस खोळंबल्याने खरीप पेरण्या लांबल्या आहेत. मुळात यावर्षी पडलेल्या अल्पशा पावसामुळे जमिनीत ओल नाही. परिणामी रबीची पेरणी करावी तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. या आठवड्यात पाऊस अपेक्षित होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी रिमझिम पाऊस झाला. काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. चार दिवसांपासून ढगाळ वातावरण पसरल्यामुळेच पाऊस हजेरी लावेल व खोळंबलेल्या रबी पेरण्यांना वेग येईल असे अपेक्षित होते. दुर्दैवाने वातावरण बदलून सुद्धा पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. येत्या चार आठ दिवसात पाऊस पडला तर रबीची पेरणी होऊ शकेल, अन्यथा रबी हंगाम सुद्धा संकटात येईल अशी भीती ग्रामीण भागात व्यक्त केली जात आहे. गहू व ज्वारी ही दोन पिके महत्वपूर्ण आहेत. पेरा घसरल्यास शेतकऱ्यांच्या पदरात फारसे काही पडणार नाही.विशेषत: जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होईल असे चित्र दिसत असून, शेतकरी बदललेल्या या वातावरणात आकाशाकडे मोठ्या अपेक्षेने डोळे लावून बसला आहे. ग्रामीण भागात यावर्षी दिवाळी जेमतेम झाली. आपापल्या कुटुंबियांबरोबर शेतकऱ्यांसह शेत मजुरांनी पदरमोड करीत दिवाळीचा आनंद साजरा केला. आता शेतमजूर वर्ग कामाच्या शोधार्थ नाशिकपासून पुणे मुंबईपर्यंत धाव घेईल अशी चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)