शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मराठवाड्यात दीड लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 05:21 IST

परतीच्या जोरदार पावसाने शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले.

प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : परतीच्या जोरदार पावसाने शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, दु:ख विसरत आता पुन्हा नव्या जोमाने बळीराजाने रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. मराठवाड्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ८ लाख १६ हजार ४२९ हेक्टर इतके आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४५ हजार ३३१ हेक्टरवर म्हणजेच १७.१८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता वाढल्याने सरासरीपेक्षा १ लाख हेक्टर पेरणी क्षेत्र वाढू शकते, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.यंदा मराठवाड्याने पावसाळ्यात सुरुवातीला कोरडा दुष्काळ आणि उत्तरार्धात ओला दुष्काळ अनुभवला. पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहावयास मिळाली. आॅक्टोबर महिन्यात पडलेल्या परतीच्या पावसाने यंदा रब्बी हंगामातील पेरणीला उशिरा सुरुवात झाली. सरासरी ४ लाख ९२ हजार ७८९ हेक्टरपैकी १ लाख १७ हजार ३९३ हेक्टर म्हणजेच अवघी २३.८२ टक्के पेरणी झाली आहे. यामुळे ज्वारीचे क्षेत्र यंदा घटणार हे निश्चित झाले आहे. बीड जिल्ह्यात ३० टक्के ज्वारी पेरणी पूर्ण झाली आहे. खरिपात मक्याला आधी लष्करी अळीचा व नंतर परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे मका पेरणी कमी होऊ शकते. ३ लाख १८४ हेक्टर पैकी ३,६५७ हेक्टर (१२.१३ टक्के) क्षेत्रावर मका पेरणी झाली. यातही औरंगाबाद, जालना व बीड मिळून १२.३६ टक्के, तर लातूर, उस्मानाबाद व हिंगोली मिळून ३.२२ टक्के पेरणी झाली. हरभऱ्याच्या पेरणीचा काळ चालू महिना अखेरपर्यंत असून, १ लाख ६३ हजार ३६० हेक्टर पैकी २० हजार ४०६ हेक्टरवर (१२.४९ टक्के) पेरणी झाली आहे.।भूजलपातळी वाढलीयंदा मराठवाड्यातील भूजलपातळी वाढली आहे. विहिरी, तलाव, धरणात पाणीसाठा मुबलक आहे. यामुळे गव्हाची पेरणी वाढू शकते. शेतकरी डिसेंबरअखेरपर्यंत गव्हाची पेरणी करू शकतात. सरासरी १ लाख १९ हजार ७७ हेक्टरवर गव्हाची पेरणी होते. आतापर्यंत ३ हजार ७५६ हेक्टरवर (३.१६ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्याची पेरणी ३३ टक्क्यांपर्यंत झाली.मागील वर्षी दुष्काळ होता. परिणामी, मराठवाड्यात सरासरी ८ लाख १६ हजार ४२९ हेक्टरपैकी अवघ्या २ लाख ८४ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. मात्र, यंदा परतीच्या पावसाने परिस्थिती बदलली आहे. सरासरीपेक्षा १ लाख हेक्टर म्हणजे ९ लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज आहे.- एस. के. देवकर, विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद