शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

मराठवाड्यात दीड लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 05:21 IST

परतीच्या जोरदार पावसाने शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले.

प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : परतीच्या जोरदार पावसाने शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, दु:ख विसरत आता पुन्हा नव्या जोमाने बळीराजाने रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. मराठवाड्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ८ लाख १६ हजार ४२९ हेक्टर इतके आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४५ हजार ३३१ हेक्टरवर म्हणजेच १७.१८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता वाढल्याने सरासरीपेक्षा १ लाख हेक्टर पेरणी क्षेत्र वाढू शकते, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.यंदा मराठवाड्याने पावसाळ्यात सुरुवातीला कोरडा दुष्काळ आणि उत्तरार्धात ओला दुष्काळ अनुभवला. पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहावयास मिळाली. आॅक्टोबर महिन्यात पडलेल्या परतीच्या पावसाने यंदा रब्बी हंगामातील पेरणीला उशिरा सुरुवात झाली. सरासरी ४ लाख ९२ हजार ७८९ हेक्टरपैकी १ लाख १७ हजार ३९३ हेक्टर म्हणजेच अवघी २३.८२ टक्के पेरणी झाली आहे. यामुळे ज्वारीचे क्षेत्र यंदा घटणार हे निश्चित झाले आहे. बीड जिल्ह्यात ३० टक्के ज्वारी पेरणी पूर्ण झाली आहे. खरिपात मक्याला आधी लष्करी अळीचा व नंतर परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे मका पेरणी कमी होऊ शकते. ३ लाख १८४ हेक्टर पैकी ३,६५७ हेक्टर (१२.१३ टक्के) क्षेत्रावर मका पेरणी झाली. यातही औरंगाबाद, जालना व बीड मिळून १२.३६ टक्के, तर लातूर, उस्मानाबाद व हिंगोली मिळून ३.२२ टक्के पेरणी झाली. हरभऱ्याच्या पेरणीचा काळ चालू महिना अखेरपर्यंत असून, १ लाख ६३ हजार ३६० हेक्टर पैकी २० हजार ४०६ हेक्टरवर (१२.४९ टक्के) पेरणी झाली आहे.।भूजलपातळी वाढलीयंदा मराठवाड्यातील भूजलपातळी वाढली आहे. विहिरी, तलाव, धरणात पाणीसाठा मुबलक आहे. यामुळे गव्हाची पेरणी वाढू शकते. शेतकरी डिसेंबरअखेरपर्यंत गव्हाची पेरणी करू शकतात. सरासरी १ लाख १९ हजार ७७ हेक्टरवर गव्हाची पेरणी होते. आतापर्यंत ३ हजार ७५६ हेक्टरवर (३.१६ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्याची पेरणी ३३ टक्क्यांपर्यंत झाली.मागील वर्षी दुष्काळ होता. परिणामी, मराठवाड्यात सरासरी ८ लाख १६ हजार ४२९ हेक्टरपैकी अवघ्या २ लाख ८४ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. मात्र, यंदा परतीच्या पावसाने परिस्थिती बदलली आहे. सरासरीपेक्षा १ लाख हेक्टर म्हणजे ९ लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज आहे.- एस. के. देवकर, विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद