शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
4
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
5
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
6
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
7
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
8
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
9
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानसोबतचा प्रश्न चर्चेतूनच मिटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:27 IST

सीमेवर युद्धाच्या तयारीनिशी आलेल्या चीनसोबत चर्चा होऊ श्कते तर पाकिस्तानशी चर्चा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत भारत-पाकिस्तानमधील संबंध हे चर्चेद्वारेच सुधारतील असा विश्वास जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: सीमेवर युद्धाच्या तयारीनिशी आलेल्या चीनसोबत चर्चा होऊ श्कते तर पाकिस्तानशी चर्चा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत भारत-पाकिस्तानमधील संबंध हे चर्चेद्वारेच सुधारतील असा विश्वास जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.फारुख अब्दुल्ला हे बुधवारी नांदेडमध्ये श्री सचखंडगुरुद्वारा येथे दर्शनासाठी आले होते. नांदेडमध्ये श्री सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्याची आपली अनेक दिवसांपूर्वीची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. येथे आल्यानंतर मोठे समाधान झाल्याचे ते म्हणाले.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत-पाकिस्तानमधील संबंधांमुळे आज काश्मीर घाटीत अशांतता आहे. परिणामी काश्मीरचा विकास रखडला आहे. भारत-पाकिस्तानचे संबंध चर्चेतूनच सुटतील. दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत. जगात सर्व काही बदल होऊ शकतो मात्र शेजारी बदलता येत नाही, असेही ते म्हणाले. सीमेवर उभ्या असलेल्या चीनसोबत भारत चर्चा करत आहे. मग पाकिस्तानशी चर्चा नको? असा सवालही त्यांनी व्यक्त केला.देशातील आजच्या परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त करताना देशात आज लोकांना जोडण्याऐवजी तोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी धर्माचा वापर होत आहे. ही बाबही अत्यंत गंभीर असल्याचे ते म्हणाले. धर्माचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यात कुणीही हस्तक्षेप करु नये असेही ते म्हणाले. देशात झालेल्या नोटाबंदीमुळे आतंकवाद्यांना मिळणारी मदत बंद होईल, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र आजही आतंकवादी देशात सर्वसामान्यांचा बळी घेत आहेत. नोटाबंदीच्या माध्यमातून किती काळा पैसा बाहेर आला हे सरकारने घोषित करावे, असे सांगताना अब्दुल्ला यांनी नोटाबंदीतून सामान्यांचेच मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. काश्मीर हा भारतातच भाग असून या भागात भारतातीलच नागरिक येण्यास धजत नाहीत. देशातील नागरिकांनी येथे ये-जा केल्यास काश्मिरींमध्येही विश्वासाची भावना बळावेल. काश्मीरमध्ये भारतीयांनी येण्याचे आवाहनही त्यांनी केले.