शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

पाकिस्तानसोबतचा प्रश्न चर्चेतूनच मिटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:27 IST

सीमेवर युद्धाच्या तयारीनिशी आलेल्या चीनसोबत चर्चा होऊ श्कते तर पाकिस्तानशी चर्चा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत भारत-पाकिस्तानमधील संबंध हे चर्चेद्वारेच सुधारतील असा विश्वास जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: सीमेवर युद्धाच्या तयारीनिशी आलेल्या चीनसोबत चर्चा होऊ श्कते तर पाकिस्तानशी चर्चा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत भारत-पाकिस्तानमधील संबंध हे चर्चेद्वारेच सुधारतील असा विश्वास जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केला.फारुख अब्दुल्ला हे बुधवारी नांदेडमध्ये श्री सचखंडगुरुद्वारा येथे दर्शनासाठी आले होते. नांदेडमध्ये श्री सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्याची आपली अनेक दिवसांपूर्वीची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. येथे आल्यानंतर मोठे समाधान झाल्याचे ते म्हणाले.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत-पाकिस्तानमधील संबंधांमुळे आज काश्मीर घाटीत अशांतता आहे. परिणामी काश्मीरचा विकास रखडला आहे. भारत-पाकिस्तानचे संबंध चर्चेतूनच सुटतील. दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत. जगात सर्व काही बदल होऊ शकतो मात्र शेजारी बदलता येत नाही, असेही ते म्हणाले. सीमेवर उभ्या असलेल्या चीनसोबत भारत चर्चा करत आहे. मग पाकिस्तानशी चर्चा नको? असा सवालही त्यांनी व्यक्त केला.देशातील आजच्या परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त करताना देशात आज लोकांना जोडण्याऐवजी तोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी धर्माचा वापर होत आहे. ही बाबही अत्यंत गंभीर असल्याचे ते म्हणाले. धर्माचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यात कुणीही हस्तक्षेप करु नये असेही ते म्हणाले. देशात झालेल्या नोटाबंदीमुळे आतंकवाद्यांना मिळणारी मदत बंद होईल, अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र आजही आतंकवादी देशात सर्वसामान्यांचा बळी घेत आहेत. नोटाबंदीच्या माध्यमातून किती काळा पैसा बाहेर आला हे सरकारने घोषित करावे, असे सांगताना अब्दुल्ला यांनी नोटाबंदीतून सामान्यांचेच मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. काश्मीर हा भारतातच भाग असून या भागात भारतातीलच नागरिक येण्यास धजत नाहीत. देशातील नागरिकांनी येथे ये-जा केल्यास काश्मिरींमध्येही विश्वासाची भावना बळावेल. काश्मीरमध्ये भारतीयांनी येण्याचे आवाहनही त्यांनी केले.