शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

स्मशानभूमीच्या हद्दीचा प्रश्न पेटला; संतप्त नातेवाईकांचा मृतदेहासह ग्रामपंचायतीसमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 12:23 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील पिशोर येथील प्रकार : स्मशानभूमीची कायमस्वरूपी हद्द काढून देण्याची मागणी

पिशोर ( औरंगाबाद ) : गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीच्या जागेवरून वाद होत असल्याने जागेची हद्द कायम करून द्यावी, या मागणीसाठी संतप्त होत नातेवाईकांसह समाजबांधवांनी पिशोर ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्ययात्रा रोखून ठिय्या दिला. जोपर्यंत स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत अंत्ययात्रा येथून हलणारच नाही, असा पवित्रा घेतल्याने पिशोरमध्ये काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पिशोरमधील दिगर भागातील शांताबाई सूर्यभान खडके (७२) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी रात्री निधन झाले. महानुभवपंथाच्या परंपरेनुसार भुईडाग दिला जातो पण भुईडाग देण्याच्या जागेच्या हद्दीवरून गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी वाद सुरू आहे. त्यामुळे शांताबाई यांचे अंत्यसंस्कार कसे करायचे यावरून समाजबांधवांमध्ये चर्चा झाली. विशेष म्हणजे या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा मागणीदेखील केलेली होती. रविवारी सकाळी शांताबाई खडके यांची अंत्ययात्रा घरापासून निघाली ती थेट पिशोर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच रोखली गेली.

संतापलेल्या नातेवाईकांसह समाजबांधवांनी मृतदेह ग्रामपंचायतीच्या आवारात ठेवला. अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेल्या जागेवरून नेहमी वाद होत आहे. आम्हाला हद्द कायम करून दिली जात नाही. जोपर्यंत हद्दीचा प्रश्न सोडविला जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे ग्रामपंचायतीसमोर काही काळ तणाव निर्माण झाला होता. ग्रामपंचायत पदाधिकारीही समोर येईनात. काही लोक प्रश्न मार्गी लागेल, अशी समजूत घालून अंत्यसंस्कार उरकून घ्यावा, अशी विनंती करत होते. परंतु संतप्त समाजबांधवांसह नातेवाईकांनी कोणाचेही एक ऐकले नाही.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली मध्यस्थीग्रामपंचायतीसमोरच मृतदेह ठेवल्याने ग्रामस्थांनी गर्दी जमली होती. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने काही लोकांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना फोनवरून माहिती दिली. जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला आहे. कायम वाद होत असल्याने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी विनंतीवजा सूचना केली. त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी अंत्यविधी आटोपून घ्यावा, अशी विनंती नातेवाईकांना केली. त्यानंतर नातेवाईकांनी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी पार पाडला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूgram panchayatग्राम पंचायत