शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

३०० मेट्रिक टन कचरा प्रक्रियेचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 22:57 IST

महापालिकेतर्फे चिकलठाण्यात उभारण्यात येत असलेल्या १५० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास महावितरणने वेळेवर वीजपुरवठा केल्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, पडेगाव आणि हर्सूल येथील प्रकल्पाची कूर्मगती पाहता हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की मनपावर ओढावल्यास शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.

ठळक मुद्देचिकलठाण्यात एकच प्लांट : १५० मेट्रिक टनची क्षमता

औरंगाबाद : महापालिकेतर्फे चिकलठाण्यात उभारण्यात येत असलेल्या १५० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास महावितरणने वेळेवर वीजपुरवठा केल्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, पडेगाव आणि हर्सूल येथील प्रकल्पाची कूर्मगती पाहता हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की मनपावर ओढावल्यास शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.शहराच्या कचराकोंडीला येत्या १६ फेब्रुवारीस एक वर्षे पूर्ण होणार आहे. मागील वर्षभरात महापालिकेने नेमके काय केले, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेला महाराष्टÑ शासनाने तब्बल ९० कोटी रुपये दिले. खिशात पैैसा असूनही महापालिकेला वर्षभरात एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करता आला नाही. चिकलठाण्यात एकमेव प्रकल्प उभा राहत आहे. त्याची क्षमता १५० मेट्रिक टन आहे. याच ठिकाणी १६ टन क्षमतेच्या दोन छोट्या मशीनही बसविण्यात आलेल्या आहेत. त्यातून दररोज ३२ मेट्रिक टन, असे एकूण १८२ मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया होईल.पडेगाव येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा होता; परंतु तेथे काम करू नये, असा निर्णय सामाजिक न्याय विभागाने दिला. स्थानिक नागरिकांचा या कचरा प्रक्रिया प्रकल्पास विरोध आहे.हर्सूल येथे अत्याधुनिक पद्धतीने कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम नागपूरच्या हायक्यूब कंपनीला देण्यात आले. दरावरून निर्माण झालेल्या वादामुळे हा प्रकल्पही आता रद्द झाल्यात जमा आहे. अशा परिस्थितीत महापालिका उर्वरित ३०० मेट्रिक टन कचºयाचे काय करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पडेगाव येथे ३२ टन क्षमतेच्या छोट्या मशीन उभारणे, कांचनवाडीत ३० मेट्रिक टन क्षमतेचा बायोमिथेन प्रकल्प उभारण्यात येईल. १५० मेट्रिक टन सुका कचरा तयार होतो. त्याचे बेलिंग करण्यात येईल.मायोवेसल्सकडून प्रक्रिया नाहीचिकलठाणा येथे सुक्या कचºयापासून बेलिंग तयार करणारी यंत्रणा उभारण्यात यावी, असे आदेश मागील महिन्यात मनपाने मायोवेसल्स या कंत्राटदार कंपनीला दिले होते. कंपनीने आजपर्यंत कोणतीच यंत्रणा उभारली नाही. कंपनीचे लाड न करता नोटीस बजावण्याचे आदेशही पदाधिकाºयांनी दिले होते.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न