शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

३०० मेट्रिक टन कचरा प्रक्रियेचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 22:57 IST

महापालिकेतर्फे चिकलठाण्यात उभारण्यात येत असलेल्या १५० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास महावितरणने वेळेवर वीजपुरवठा केल्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, पडेगाव आणि हर्सूल येथील प्रकल्पाची कूर्मगती पाहता हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की मनपावर ओढावल्यास शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.

ठळक मुद्देचिकलठाण्यात एकच प्लांट : १५० मेट्रिक टनची क्षमता

औरंगाबाद : महापालिकेतर्फे चिकलठाण्यात उभारण्यात येत असलेल्या १५० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास महावितरणने वेळेवर वीजपुरवठा केल्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, पडेगाव आणि हर्सूल येथील प्रकल्पाची कूर्मगती पाहता हे दोन्ही प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की मनपावर ओढावल्यास शहरातील ३०० मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.शहराच्या कचराकोंडीला येत्या १६ फेब्रुवारीस एक वर्षे पूर्ण होणार आहे. मागील वर्षभरात महापालिकेने नेमके काय केले, असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेला महाराष्टÑ शासनाने तब्बल ९० कोटी रुपये दिले. खिशात पैैसा असूनही महापालिकेला वर्षभरात एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करता आला नाही. चिकलठाण्यात एकमेव प्रकल्प उभा राहत आहे. त्याची क्षमता १५० मेट्रिक टन आहे. याच ठिकाणी १६ टन क्षमतेच्या दोन छोट्या मशीनही बसविण्यात आलेल्या आहेत. त्यातून दररोज ३२ मेट्रिक टन, असे एकूण १८२ मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया होईल.पडेगाव येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा होता; परंतु तेथे काम करू नये, असा निर्णय सामाजिक न्याय विभागाने दिला. स्थानिक नागरिकांचा या कचरा प्रक्रिया प्रकल्पास विरोध आहे.हर्सूल येथे अत्याधुनिक पद्धतीने कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम नागपूरच्या हायक्यूब कंपनीला देण्यात आले. दरावरून निर्माण झालेल्या वादामुळे हा प्रकल्पही आता रद्द झाल्यात जमा आहे. अशा परिस्थितीत महापालिका उर्वरित ३०० मेट्रिक टन कचºयाचे काय करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पडेगाव येथे ३२ टन क्षमतेच्या छोट्या मशीन उभारणे, कांचनवाडीत ३० मेट्रिक टन क्षमतेचा बायोमिथेन प्रकल्प उभारण्यात येईल. १५० मेट्रिक टन सुका कचरा तयार होतो. त्याचे बेलिंग करण्यात येईल.मायोवेसल्सकडून प्रक्रिया नाहीचिकलठाणा येथे सुक्या कचºयापासून बेलिंग तयार करणारी यंत्रणा उभारण्यात यावी, असे आदेश मागील महिन्यात मनपाने मायोवेसल्स या कंत्राटदार कंपनीला दिले होते. कंपनीने आजपर्यंत कोणतीच यंत्रणा उभारली नाही. कंपनीचे लाड न करता नोटीस बजावण्याचे आदेशही पदाधिकाºयांनी दिले होते.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न