शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

गुणवत्तेचा आलेख घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 00:33 IST

नांदेड : शिक्षण विभागाला जिल्हा परिषद शाळेसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचा विसर पडल्याने यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मोठी घसरण झाली आहे़

भारत दाढेल । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शिक्षण विभागाला जिल्हा परिषद शाळेसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचा विसर पडल्याने यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मोठी घसरण झाली आहे़ जिल्हा परिषद शाळेतील आठवीतील शिष्यवृत्तीधारकांची संख्या केवळ २५ असून पाचवीचे ७५ विद्यार्थी आहेत़ जिल्ह्यातील पाचवीच्या २६ हजार ३७८ विद्यार्थ्यांपैकी ४८५ तर आठवीच्या १९ हजार २ पैकी ४६६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत़ या आकडेवारीमुळे नांदेड जिल्हा राज्यात २४ व्या क्रमांकावर आला आहे़ तीन वर्षापूर्वी जिल्ह्यात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियानाचा प्रारंभ झाला़ जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुले गुणवंत झाली पाहिजे़, या बांधिलकीच्या भूमिकेतून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या पुढाकारातून हे अभियान यशस्वीपणे पूर्ण झाले होते़ वर्षभर मुलांच्या चाचण्या घेण्यात आल्या़ पालकसंवाद, ग्रामसंवाद, लक्षवेधी नमस्कार यामुळे सुसंवाद आणि त्यातून शाळेबद्दलची आत्मीयता निर्माण झाली होती़ शिक्षकांना स्वातंत्र्यदिनी, महिलादिनी, महाराष्ट्रदिनी गौरविण्यात आले़ जिल्ह्यातील ही प्रेरणा इतर शाळांसाठीसुद्धा परिणामकारक ठरली़ शिक्षकांनी ज्ञानरचनावादाची कास धरली होती़ प्रत्येक मूल हे स्वत:च स्वत:च्या ज्ञानाची रचना करीत असते, हे या रचनावादाचं सूत्ऱ त्याआधारे शाळेत तळफळ्यांची रंगोटी झाली़ मुलं गटात बसून एकेकाने स्वत:च कृती करू लागली़ कृतिशीलता हा शिक्षणाचा आत्मा बनली पाहिजे़ यासाठी जिल्ह्यात शैक्षणिक चळवळ जोरात सुरू झाली होती़ परंतु गत वर्षभरापासून ही चळवळ थांबली आहे़ शिक्षण विभागाला या उपक्रमांचा विसर पडला आहे़ शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोणतेही नियोजन करण्यात आले नाही़ त्याचा परिणाम निकालावर झाला़ शिक्षकांच्या बदल्या, विभागांतर्गत होणाऱ्या घटना, घडामोडीत अधिक लक्ष घालण्यात येत असल्याने शैक्षणिक उपक्रम राबवायचे कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ जिल्ह्यातील पाचवीत शिकणारे २६ हजार ३७८ पैकी ३ हजार १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तर ४८५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले़ आठवीत १९ हजार २ पैकी १ हजार ६८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तर ४६६ विद्यार्थी धारक झाले़ जिल्हा परिषद शाळेतील पाचवीत शिकणारे ८ हजार ११४ पैकी ४४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तर ७५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले़ आठवीतील १ हजार ८९८ पैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले़