शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तेचा आलेख घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2017 00:33 IST

नांदेड : शिक्षण विभागाला जिल्हा परिषद शाळेसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचा विसर पडल्याने यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मोठी घसरण झाली आहे़

भारत दाढेल । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शिक्षण विभागाला जिल्हा परिषद शाळेसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचा विसर पडल्याने यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मोठी घसरण झाली आहे़ जिल्हा परिषद शाळेतील आठवीतील शिष्यवृत्तीधारकांची संख्या केवळ २५ असून पाचवीचे ७५ विद्यार्थी आहेत़ जिल्ह्यातील पाचवीच्या २६ हजार ३७८ विद्यार्थ्यांपैकी ४८५ तर आठवीच्या १९ हजार २ पैकी ४६६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत़ या आकडेवारीमुळे नांदेड जिल्हा राज्यात २४ व्या क्रमांकावर आला आहे़ तीन वर्षापूर्वी जिल्ह्यात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियानाचा प्रारंभ झाला़ जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुले गुणवंत झाली पाहिजे़, या बांधिलकीच्या भूमिकेतून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या पुढाकारातून हे अभियान यशस्वीपणे पूर्ण झाले होते़ वर्षभर मुलांच्या चाचण्या घेण्यात आल्या़ पालकसंवाद, ग्रामसंवाद, लक्षवेधी नमस्कार यामुळे सुसंवाद आणि त्यातून शाळेबद्दलची आत्मीयता निर्माण झाली होती़ शिक्षकांना स्वातंत्र्यदिनी, महिलादिनी, महाराष्ट्रदिनी गौरविण्यात आले़ जिल्ह्यातील ही प्रेरणा इतर शाळांसाठीसुद्धा परिणामकारक ठरली़ शिक्षकांनी ज्ञानरचनावादाची कास धरली होती़ प्रत्येक मूल हे स्वत:च स्वत:च्या ज्ञानाची रचना करीत असते, हे या रचनावादाचं सूत्ऱ त्याआधारे शाळेत तळफळ्यांची रंगोटी झाली़ मुलं गटात बसून एकेकाने स्वत:च कृती करू लागली़ कृतिशीलता हा शिक्षणाचा आत्मा बनली पाहिजे़ यासाठी जिल्ह्यात शैक्षणिक चळवळ जोरात सुरू झाली होती़ परंतु गत वर्षभरापासून ही चळवळ थांबली आहे़ शिक्षण विभागाला या उपक्रमांचा विसर पडला आहे़ शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोणतेही नियोजन करण्यात आले नाही़ त्याचा परिणाम निकालावर झाला़ शिक्षकांच्या बदल्या, विभागांतर्गत होणाऱ्या घटना, घडामोडीत अधिक लक्ष घालण्यात येत असल्याने शैक्षणिक उपक्रम राबवायचे कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ जिल्ह्यातील पाचवीत शिकणारे २६ हजार ३७८ पैकी ३ हजार १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तर ४८५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले़ आठवीत १९ हजार २ पैकी १ हजार ६८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तर ४६६ विद्यार्थी धारक झाले़ जिल्हा परिषद शाळेतील पाचवीत शिकणारे ८ हजार ११४ पैकी ४४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ तर ७५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले़ आठवीतील १ हजार ८९८ पैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले़