शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बेपत्ता व्यक्तीचा विहिरीत ढकलून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 23:09 IST

औरंगाबाद : दि. ९ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा पैशाच्या वादातून विहिरीत ढकलून खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ...

ठळक मुद्देपैशाचा वाद : जालना जिल्ह्यातील मौजपुरी परिसरात आढळला मृतदेह

औरंगाबाद : दि. ९ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा पैशाच्या वादातून विहिरीत ढकलून खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.विजय देवीदास सुर्वे (४१, रा. शंभूनगर) असे मृताचे नाव आहे. त्यांची पत्नी पुष्पा या शहरातील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका आहेत. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. ९ एप्रिल रोजी पुष्पा सुर्वे या कामावरून घरी आल्या असता मनोज शहादेव गवळी (रा. इंदिरानगर) आणि विजय सुर्वे यांच्यात वाद सुरू होता. गवळी हा विजय यांना सोबत चल म्हणून हट्ट करीत होता. त्यानंतर विजय सुर्वे पत्नीची दुचाकी (एमएच-२० डीवाय-५७९४) घेऊन निघून गेले. तेव्हापासून ते बेपत्ता होते. याबाबत त्यांच्या पत्नीने जवाहरनगर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. १२ एप्रिल रोजी मनोज गवळी दोन वेळा सुर्वे यांच्या घरी गेला. त्याने विजय सुर्वेबाबत पुष्पाकडे विचारणा केली. तसेच सावरगाव (जि. जालना) येथे चला तीन तासांत विजय कुठे आहे ते दाखवतो, असेही मनोज गवळीने त्यांना सांगितले. त्यामुळे मनोज गवळीवर सुर्वे कुटुंबियांचा संशय बळावला होता. याच दरम्यान मौजपुरी ठाण्यातून पुष्पा सुर्वे यांच्या भावाला पोलिसांचा फोन आला. त्यांनी खात्री केल्यानंतर विहिरीतील मृतदेह विजय सुर्वे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मनोज गवळीविरुद्ध जालना जिल्ह्यातील मौजपुरी ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानंतर तो जवाहरनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.- जिवे मारण्याची धमकी दिली होतीमनोज गवळी किरायाने राहतो. किरायाच्या पैशाबाबत विजय सुर्वे यांनी त्याच्या घरमालकासोबत तडजोड करून दिली होती. २८ मार्चला सकाळी सुर्वे यांचा घरामागे राहणाऱ्या एका महिलेसोबत ड्रेनेजवरून वादही झाला होता. तेव्हा विजय सुर्वे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असेही तक्रारीत नमूद आहे.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस