शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाची ढकलगाडी !कुणाला पटली, कुणाला खटकली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता कहर पाहता इयत्ता पहिली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकट पास करायचे, असा ...

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता कहर पाहता इयत्ता पहिली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकट पास करायचे, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परीक्षारूपी तिकीट न फाडता सरसकट सगळ्याच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात घेऊन जाणारी ही शिक्षणाची ढकलगाडी कुणाला पटली आहे, तर कुणाला खटकली आहे. पालक आणि शिक्षणतज्ज्ञांच्याकडून याबाबतीत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

काही शिक्षणतज्ज्ञांच्या मते विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देणे चुकीचे आहे. अगदी परीक्षाच नाही, तरी इतर कोणत्या मार्गांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. याउलट काही शिक्षणतज्ज्ञांनी राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा परीक्षा न घेतलेलीच बरी आहे, असे सांगितले.

शहरी भागात खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर या निर्णयाचा कोणताही परिणाम झालेला नाही. कारण इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये सध्या १ ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरू असून शाळेच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनच पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.

चौकट :

औरंगाबाद जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या

पहिली - ८८३२९

दुसरी - ८८१८९

तिसरी - ८८२०२

चौथी - ८९२११

पाचवी - ८७८६९

सहावी - ८६२०७

सातवी - ८५०४४

आठवी - ७९६३३

नववी - ७५८९१

अकरावी - ५५१७१

चौकट :

शिक्षणतज्ज्ञ म्हणतात-

१. प्रत्येक शाळेतील शिक्षक किंवा शिक्षकांच्या घरातील लोक सध्या कोरोनाने बाधित आहेत. दुसऱ्या लाटेचे स्वरूप अत्यंत तीव्र असून याकाळात परीक्षेपेक्षा विद्यार्थ्यांचे सुरक्षित असणे सर्वाधिक महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाचा परीक्षा न घेण्याचा निर्णय योग्य असून केंद्र सरकारनेही हे वर्ष ‘झिरो एज्युकेशन इयर’ म्हणून घोषित करावे.

- एस. पी. जवळकर

२. विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे, हा राज्य शासनाचा निर्णय काही अंशी चुकीचा वाटतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाप्रतीचे गांभीर्य नष्ट होत आहे. परीक्षा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या मूल्यमापनासाठी घेतली जाते. थेट परीक्षा न घेता कोणत्या न कोणत्या पद्धतीने जमेल तसे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करूनच त्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश द्यायला पाहिजे होता.

- सतीश तांबट

३. सर्वत्र कोरोनाचा उद्रेक होत असताना राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे आणि इतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आणणे परवडणारे नाही. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात नाही. यावर्षी मागे पडलेला अभ्यास पुढेही भरून काढता येतो.

- देवेंद्र सोळंके, मुख्याध्यापक

चौकट :

पालक म्हणतात

१. परीक्षा न घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय असला तरी खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा होत आहेत. त्यामुळे या मुलांना तर परीक्षा देऊनच पुढच्या वर्गात जायचे आहे, त्यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान नाही, असे काही पालकांचे मत आहे.

२. परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचे बहुसंख्य पालकांनी स्वागत केले आहे. परीक्षा घेतल्या असत्या तरी आम्हाला मुलांना शाळेत पाठविणे सुरक्षित वाटले नसते, असे अनेक पालकांचे म्हणणे आहे. तर परीक्षा न घेता मुलांना पुढच्या वर्गात पाठविणे काही पालकांना चुकीचे वाटत आहे.