शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

शिक्षणाची ढकलगाडी !कुणाला पटली, कुणाला खटकली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता कहर पाहता इयत्ता पहिली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकट पास करायचे, असा ...

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता कहर पाहता इयत्ता पहिली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकट पास करायचे, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परीक्षारूपी तिकीट न फाडता सरसकट सगळ्याच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात घेऊन जाणारी ही शिक्षणाची ढकलगाडी कुणाला पटली आहे, तर कुणाला खटकली आहे. पालक आणि शिक्षणतज्ज्ञांच्याकडून याबाबतीत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

काही शिक्षणतज्ज्ञांच्या मते विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देणे चुकीचे आहे. अगदी परीक्षाच नाही, तरी इतर कोणत्या मार्गांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. याउलट काही शिक्षणतज्ज्ञांनी राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा परीक्षा न घेतलेलीच बरी आहे, असे सांगितले.

शहरी भागात खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर या निर्णयाचा कोणताही परिणाम झालेला नाही. कारण इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये सध्या १ ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरू असून शाळेच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनच पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.

चौकट :

औरंगाबाद जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या

पहिली - ८८३२९

दुसरी - ८८१८९

तिसरी - ८८२०२

चौथी - ८९२११

पाचवी - ८७८६९

सहावी - ८६२०७

सातवी - ८५०४४

आठवी - ७९६३३

नववी - ७५८९१

अकरावी - ५५१७१

चौकट :

शिक्षणतज्ज्ञ म्हणतात-

१. प्रत्येक शाळेतील शिक्षक किंवा शिक्षकांच्या घरातील लोक सध्या कोरोनाने बाधित आहेत. दुसऱ्या लाटेचे स्वरूप अत्यंत तीव्र असून याकाळात परीक्षेपेक्षा विद्यार्थ्यांचे सुरक्षित असणे सर्वाधिक महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाचा परीक्षा न घेण्याचा निर्णय योग्य असून केंद्र सरकारनेही हे वर्ष ‘झिरो एज्युकेशन इयर’ म्हणून घोषित करावे.

- एस. पी. जवळकर

२. विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे, हा राज्य शासनाचा निर्णय काही अंशी चुकीचा वाटतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाप्रतीचे गांभीर्य नष्ट होत आहे. परीक्षा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या मूल्यमापनासाठी घेतली जाते. थेट परीक्षा न घेता कोणत्या न कोणत्या पद्धतीने जमेल तसे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करूनच त्यांना पुढच्या इयत्तेत प्रवेश द्यायला पाहिजे होता.

- सतीश तांबट

३. सर्वत्र कोरोनाचा उद्रेक होत असताना राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे आणि इतर कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आणणे परवडणारे नाही. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात नाही. यावर्षी मागे पडलेला अभ्यास पुढेही भरून काढता येतो.

- देवेंद्र सोळंके, मुख्याध्यापक

चौकट :

पालक म्हणतात

१. परीक्षा न घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय असला तरी खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा होत आहेत. त्यामुळे या मुलांना तर परीक्षा देऊनच पुढच्या वर्गात जायचे आहे, त्यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान नाही, असे काही पालकांचे मत आहे.

२. परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचे बहुसंख्य पालकांनी स्वागत केले आहे. परीक्षा घेतल्या असत्या तरी आम्हाला मुलांना शाळेत पाठविणे सुरक्षित वाटले नसते, असे अनेक पालकांचे म्हणणे आहे. तर परीक्षा न घेता मुलांना पुढच्या वर्गात पाठविणे काही पालकांना चुकीचे वाटत आहे.