शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

पूस पाणीपुरवठा योजनेची वीज तोडली

By admin | Updated: September 4, 2014 01:26 IST

घाटनांदूर : गौरी, गणपती अशा महत्वपूर्ण सणउत्सवाच्या दिवसांत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूस आणि उद्भवन केंद्र अंबलवाडीचा वीजपुरवठा थकबाकीमुळे वीज वितरण कंपनीने तोडला आहे

घाटनांदूर : गौरी, गणपती अशा महत्वपूर्ण सणउत्सवाच्या दिवसांत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूस आणि उद्भवन केंद्र अंबलवाडीचा वीजपुरवठा थकबाकीमुळे वीज वितरण कंपनीने तोडला आहे. परिणामी सणासुदीच्या दिवसात योजनेवर अवलंबून असलेल्या घाटनांदूरसह तब्बल १९ गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जलजन्य आजारात वाढ होऊ लागली आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा पूस योजना आणि अंबलवाडी उद्भवन केंद्राचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने थकबाकीपोटी खंडित केला आहे. मे, जून व जुलै २०१४ या तीन महिन्यांचे एकूण चालू वीज बिल १२ लाख रुपये थकलेले आहे. वीज वितरण कंपनीने कुठलीही नोटीस न देता अचानक वीजपुरवठा खंडित करीत असल्याने प्रत्येकवेळी पाण्यासाठी भटकंती अटळ आहे. जिल्हा परिषदेंतर्गत असलेली पूस पाणीपुरवठा योजना सतत या ना त्या कारणाने बंदच असते. तुरटी, ब्लिचिंग पावडरचा तुटवडा तर दुरुस्ती साहित्याचा अभाव, कर्मचाऱ्यांची वाणवा यामुळे ही योजना सतत बंद असते. वीजपुरवठा सुरू असला तरी या ना त्या कारणाने ही योजना नेहमी बंद असते. सध्या सणासुदीचे दिवस असून, पाण्याची गरज भासते. अशा स्थितीत पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. अनेक गावांतून पूरक पाणीपुरवठा योजना असल्या तरीही एकाही गावाला पिण्यायोग्य शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. सध्या पावसाळा सुरू असल्याने सर्वत्र घाण पाणी, डबके, तुंबलेल्या नाल्या, रस्त्यावर चिखल दिसून येत आहे. यामुळे डासांचा उपद्रव वाढला असून, साथरोग फैलावत आहेत. अशा परिस्थितीत वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने अडचण निर्माण झाली आहे. १२ लाख रुपये थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने पूस पाणीपुरवठा योजना पुन्हा अडचणीत सापडली आहे. या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. याबाबत पूस योजनेचे शाखा अभियंता जी.बी. भुजबळ म्हणाले, योजनेवर अवलंबून असलेल्या गावाकडे तब्बल ३ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी थकीत आहे. एकही ग्रा.पं. पैसे भरावयास तयार नाही. बील भरल्यास कनेक्शन जोडू. (वार्ताहर) पूस योजनेवर अवलंबून असलेल्या घाटनांदूरसह तळणी, दत्तपूर, अंबलटेक, तेलघणा, हनुमंतवाडी, पूस, गिरवली आपेट, गिरवली बावणे, साकूड, मुलतानतांडा, वरवटी, अंबलवाडी या अंबाजोगाई तालुक्यातील १३ तर परळी तालुक्यातील नंदागौळ, लेंडेवाडी, लेंडेवाडीतांडा, आनंदवाडी, नागदरा या पाच अशा १९ गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे.