शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रोजगाराच्या शोधात तरुणांचे लोंढे वाळूजमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:45 IST

वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून तरुणांचे लोंढे रोजगाराच्या शोधात वाळूजसह परिसरात दाखल होत आहेत. औद्योगिक वसाहत परिसरातील अनेक कंपन्यांच्या गेटसमोर रांगा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून तरुणांचे लोंढे रोजगाराच्या शोधात वाळूजसह परिसरात दाखल होत आहेत. औद्योगिक वसाहत परिसरातील अनेक कंपन्यांच्या गेटसमोर रांगा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

राज्याच्या बहुतांश भागात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. मराठवाडा तर दुष्काळाने अधिकच होरपळत आहे. त्यातच शासनाने काही अपवाद वगळता सरकारी नोकर भरती बंद केली आहे. त्यामुळे बेरोजगार सुशिक्षितांचे प्रमाण वाढले आहे.

दुष्काळामुळे ग्रामीण भागातील रोजगारही हिरावला गेला आहे. रोजगार हमी योजनेची कामेही बहुतांशी बंद आहेत. तर काही ठिकाणी सुरु असलेली काम यंत्राच्या सहाय्याने केली जात असल्याने ग्रामस्थांना काम मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे ग्रामणी भागातील तरुण कामाच्या शोधात शहराकडे स्थलांतर करीत आहेत. रोजगाराची संधी कारखान्यांत असल्याने बहुतांश तरुण येथे येत आहेत.

वाळूज औद्योगिक क्षेत्रात संपूर्ण मराठवाड्यातील तरुण-तरुणींचे लोंढे येत आहेत. येथील जोगेश्वरी, रांजणगाव, वाळूज, घाणेगाव, विटावा, वडगाव, पंढरपूर भागातही तरुण रोजगार शोधाताना दिसून येत आहेत. परिसरातील विविध कारखान्यांच्या गेटवर रोजगारासाठी तरुणांच्या रांगा लागत असून, खाजगी ठेकेदाराकडेही काम मिळविण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे.

दिवसभर फिरुनही काम मिळेनाशासनाच्या धोरणामुळे अनेक छोटे उद्योेग बंद पडले आहेत. दुष्काळाचाही फटका कारखानदाराला बसला आहे. शिवाय प्रशासनाच्या पाणी कपातीच्या धोरणामुळे कारखान्याच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. व्यवसाय तोट्यात जात असल्याने उद्योजकांनी कामगार कपात करुन मोजक्याच कामगारांकडून उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे या कारखान्यांत काम मिळणे अवघड झाले आहे. कारखान्यात कोणी ओळखीचे असेल तरच काम मिळत आहे. अन्यथा अनेक तरुण-तरुणींना उपाशीपोटी दिवसभर वणवण फिरुनही काम मिळत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीEmployeeकर्मचारी