शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

रोजगाराच्या शोधात तरुणांचे लोंढे वाळूजमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 20:45 IST

वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून तरुणांचे लोंढे रोजगाराच्या शोधात वाळूजसह परिसरात दाखल होत आहेत. औद्योगिक वसाहत परिसरातील अनेक कंपन्यांच्या गेटसमोर रांगा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून तरुणांचे लोंढे रोजगाराच्या शोधात वाळूजसह परिसरात दाखल होत आहेत. औद्योगिक वसाहत परिसरातील अनेक कंपन्यांच्या गेटसमोर रांगा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

राज्याच्या बहुतांश भागात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. मराठवाडा तर दुष्काळाने अधिकच होरपळत आहे. त्यातच शासनाने काही अपवाद वगळता सरकारी नोकर भरती बंद केली आहे. त्यामुळे बेरोजगार सुशिक्षितांचे प्रमाण वाढले आहे.

दुष्काळामुळे ग्रामीण भागातील रोजगारही हिरावला गेला आहे. रोजगार हमी योजनेची कामेही बहुतांशी बंद आहेत. तर काही ठिकाणी सुरु असलेली काम यंत्राच्या सहाय्याने केली जात असल्याने ग्रामस्थांना काम मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे ग्रामणी भागातील तरुण कामाच्या शोधात शहराकडे स्थलांतर करीत आहेत. रोजगाराची संधी कारखान्यांत असल्याने बहुतांश तरुण येथे येत आहेत.

वाळूज औद्योगिक क्षेत्रात संपूर्ण मराठवाड्यातील तरुण-तरुणींचे लोंढे येत आहेत. येथील जोगेश्वरी, रांजणगाव, वाळूज, घाणेगाव, विटावा, वडगाव, पंढरपूर भागातही तरुण रोजगार शोधाताना दिसून येत आहेत. परिसरातील विविध कारखान्यांच्या गेटवर रोजगारासाठी तरुणांच्या रांगा लागत असून, खाजगी ठेकेदाराकडेही काम मिळविण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे.

दिवसभर फिरुनही काम मिळेनाशासनाच्या धोरणामुळे अनेक छोटे उद्योेग बंद पडले आहेत. दुष्काळाचाही फटका कारखानदाराला बसला आहे. शिवाय प्रशासनाच्या पाणी कपातीच्या धोरणामुळे कारखान्याच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. व्यवसाय तोट्यात जात असल्याने उद्योजकांनी कामगार कपात करुन मोजक्याच कामगारांकडून उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे या कारखान्यांत काम मिळणे अवघड झाले आहे. कारखान्यात कोणी ओळखीचे असेल तरच काम मिळत आहे. अन्यथा अनेक तरुण-तरुणींना उपाशीपोटी दिवसभर वणवण फिरुनही काम मिळत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसीEmployeeकर्मचारी