शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

पूर्णा नदी कोरडीठाक

By admin | Updated: August 20, 2014 00:20 IST

येलदरी : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटले तरी जिंतूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही़ त्यामुळे येलदरी धरणावरील पूर्णा नदी अक्षरश: कोरडीठाक पडली आहे़

येलदरी : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटले तरी जिंतूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही़ त्यामुळे येलदरी धरणावरील पूर्णा नदी अक्षरश: कोरडीठाक पडली आहे़ त्यामुळे या परिसरातील खरिपाची पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे़ यंदा खरीप हंगामात पावसाअभावी पिके हातची गेली़ तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ यामुळे शेतकरी चारही बाजुंनी आर्थिक व नैसर्गिक संकटात सापडला आहे़ अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी आपले जीवन जगण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे़ परंतु, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ भर पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे ऊन पडत असल्यामुळे सोयाबीन, कापूस व तूर ही पिके सुकू लागली आहेत़ आणखी आठ-दहा दिवस पाऊस न पडल्यास येलदरी व परिसरातील खरिपाची पिके हातची जाण्याची शक्यता आहे़ बळीराजा सध्या आकाशाकडे डोळे लावून बसला आहे़ गेल्या आठवड्यात या परिसरातील एका शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती़ दुष्काळी परिस्थिती राहिल्यास या परिसरातील शेतकरी व मजुरांना कामासाठी इतर जिल्ह्यामध्ये स्थालंतर करण्याची वेळ येऊ शकते़ काही मजुरांनी इतर जिल्ह्यामध्ये कामाच्या शोधार्थ स्थलांतर केले आहे़ (वार्ताहर)