शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
3
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
4
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
5
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
6
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
7
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
8
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
9
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
10
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
11
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
12
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
13
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
14
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
15
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
16
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
17
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
18
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
19
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
20
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?

पूर्णा नदी कोरडीठाक

By admin | Updated: August 20, 2014 00:20 IST

येलदरी : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटले तरी जिंतूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही़ त्यामुळे येलदरी धरणावरील पूर्णा नदी अक्षरश: कोरडीठाक पडली आहे़

येलदरी : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटले तरी जिंतूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही़ त्यामुळे येलदरी धरणावरील पूर्णा नदी अक्षरश: कोरडीठाक पडली आहे़ त्यामुळे या परिसरातील खरिपाची पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे़ यंदा खरीप हंगामात पावसाअभावी पिके हातची गेली़ तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ यामुळे शेतकरी चारही बाजुंनी आर्थिक व नैसर्गिक संकटात सापडला आहे़ अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी आपले जीवन जगण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे़ परंतु, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ भर पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे ऊन पडत असल्यामुळे सोयाबीन, कापूस व तूर ही पिके सुकू लागली आहेत़ आणखी आठ-दहा दिवस पाऊस न पडल्यास येलदरी व परिसरातील खरिपाची पिके हातची जाण्याची शक्यता आहे़ बळीराजा सध्या आकाशाकडे डोळे लावून बसला आहे़ गेल्या आठवड्यात या परिसरातील एका शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती़ दुष्काळी परिस्थिती राहिल्यास या परिसरातील शेतकरी व मजुरांना कामासाठी इतर जिल्ह्यामध्ये स्थालंतर करण्याची वेळ येऊ शकते़ काही मजुरांनी इतर जिल्ह्यामध्ये कामाच्या शोधार्थ स्थलांतर केले आहे़ (वार्ताहर)