शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पुरी-भाजीसोबत लोणचे नसल्याने दंड

By admin | Updated: March 15, 2016 00:38 IST

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता यांनी सोमवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनला भेट देऊन विविध सोयी-सुविधांची मॅरेथॉन पाहणी केली.

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता यांनी सोमवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनला भेट देऊन विविध सोयी-सुविधांची मॅरेथॉन पाहणी केली. या पाहणीत विविध कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच झापले. तसेच अन्नपदार्थांच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कँटीन, फूड प्लाझाचालक आणि आरक्षण कार्यालयात दर फलक लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारासही दंड लावला. विशेष म्हणजे पुरी-भाजीसोबत योग्य प्रमाणात लोणचे नसल्याने कँटीनचालकास दंड लावण्यात आला.महाव्यवस्थापकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा रेल्वेस्टेशनला भेट देऊन गुप्ता यांनी रेल्वेस्टेशनची नवीन इमारत, जुनी इमारती, आरक्षण कार्यालय, पार्सल विभाग, कर्मी दल बुकिंग लॉबीसह विविध सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी नांदेड विभागाचे व्यवस्थापक ए. के. सिन्हा यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आरक्षण कार्यालयात एसी नसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे याठिकाणी तात्काळ एक्झास्ट फॅन लावण्याची सूचना त्यांनी केली. याठिकाणी तिकिटाचे दरफलक न लावणाऱ्या ठेकेदारास दंड लावण्याची सूचना त्यांनी केली. फूड प्लाझामधील पाहणीच्या वेळी ‘जनता खाना’ उपलब्ध नसल्याने दंड लावण्याचीही त्यांनी सूचना केली.पार्किंगसाठी नियोजित जागेशिवाय अन्य जागेचा वापर होत असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. हा प्रकार तात्काळ बंद करण्याची सूचना केली. जुन्या इमारतीमधील रिकाम्या जागा करारावर देण्यासही त्यांनी सांगितले. स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या जुनाट यंत्रांविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. रेल्वेस्टेशनवरील नळातील पाणी थंड आहे का, याची पाहणी करण्यासाठी त्यांनी अन्य अधिकाऱ्यांच्या हातातील पाणी घेतल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी मात्र नाराजी व्यक्त केली.