शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

पुणे आणखी जवळ येणार; आता १२० कि.मी. औरंगाबाद - नगर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 16:42 IST

Aurangabad - Pune connectivity will increase मध्य रेल्वेचे डेप्युटी चीफ ऑपरेशन मॅनेजर (सर्वे) सुरेशचंद्र जैन, चीफ ट्राफीक इन्स्पेक्टर (सर्वे) रविप्रकाश गुजराल आणि मुकेशलाल यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे औरंगाबाद - नगर या मार्गाच्या दृष्टीने उद्योजकांशी चर्चा केली.

ठळक मुद्देसाजापूर, गंगापूर, देवगड, नेवासा, शनिशिंगणापूर येथे स्थानकया रेल्वे मार्गामुळे थेट पुण्याला कनेक्टिव्हिटी मिळणे शक्य

औरंगाबाद : औरंगाबाद - अहमदनगर या १२० किलोमीटर अंतराच्या नव्या रेल्वेे मार्गाच्या फिल्ड सर्वेक्षणाला सोमवारी सुरुवात झाली. यासाठी मध्य रेल्वेचे पथक शहरात दाखल झाले. या रेल्वे मार्गामुळे थेट पुण्याला कनेक्टिव्हिटी मिळणे शक्य होणार असल्याचे पथकाने स्पष्ट केले. हा मार्ग अधिक सोयीचा, फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. पण, २२ किलोमीटरच्या राेटेगाव - कोपरगाव मार्गानेही पुणे कनेक्टिव्हिटी मिळणे शक्य आहे. परंतु या नव्या मार्गामुळे रोटेगाव - कोपरगाव मार्गाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

मध्य रेल्वेचे डेप्युटी चीफ ऑपरेशन मॅनेजर (सर्वे) सुरेशचंद्र जैन, चीफ ट्राफीक इन्स्पेक्टर (सर्वे) रविप्रकाश गुजराल आणि मुकेशलाल यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे औरंगाबाद - नगर या मार्गाच्या दृष्टीने उद्योजकांशी चर्चा केली. यावेळी खा. डाॅ. भागवत कराड, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतेश चॅटर्जी, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, राम भोगले, कमलेश धूत, ‘सीआयआय’चे रमण अजगावकर, रवींद्र वैद्य आदींची उपस्थिती होती. यावेळी या पथकाने औरंगाबादहून किती मालवाहतूक होते आणि औरंगाबाद - नगर मार्ग झाल्यास किती मालवाहतूक शक्य होईल, यादृष्टीने चर्चा केली. यावेळी उद्योजकांनी त्यासंदर्भात माहिती देत हा मार्ग झाल्यास मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होईल, असे सांगितले.

या प्रस्तावित मार्गात साजापूर, गंगापूर, देवगड, नेवासा, शनिशिंगणापूर येथे स्थानक करणे प्रस्तावित आहे. साजापूर येथे कंटेनर डेपो केल्यास अधिक फायदा होईल, असे उद्योजकांनी म्हटले. हे पथक ४ तारखेपर्यंत या सर्व ठिकाणी भेटी देऊन आढावा घेणार आहे. नगर - दौंड - पुणे या अशा मार्गाने पूर्वी पुण्याला जावे लागत होते. परंतु आता कॅडलाइन टाकून नगरहून पुण्याला जाणे शक्य झाले आहे. त्यामुळे औरंगाबाद - नगर मार्गामुळे पुण्याची कनेक्टिव्हिटी मिळेल. सर्वेक्षणाचा अहवाल तीन महिन्यांत तयार होईल. त्यानंतर तो प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे जाईल, असे सुरेशचंद्र जैन यांनी सांगितले.

नव्या मार्गाला विरोध नाहीऔरंगाबाद रेल्वेमार्ग पुणे, गोवा मार्गाला जोडण्यासाठी रोटेगाव ते कोपरगाव या रेल्वे मार्गाची जवळपास २५ वर्षांपासून प्रतीक्षा केली जात आहे. केवळ २२ किलोमीटरचा हा मार्ग आहे. या मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. त्याचा डीपीआरही तयार झालेला आहे. त्यामुळे हा मार्ग निश्चितच होईल. आता औरंगाबाद - नगर मार्गाचे सर्वेक्षण केले जात आहे. पण, औरंगाबाद - नगर मार्गाला आमचा विरोध नाही. तोही व्हावा.- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेtourismपर्यटन