शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

पुणे आणखी जवळ येणार; आता १२० कि.मी. औरंगाबाद - नगर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 16:42 IST

Aurangabad - Pune connectivity will increase मध्य रेल्वेचे डेप्युटी चीफ ऑपरेशन मॅनेजर (सर्वे) सुरेशचंद्र जैन, चीफ ट्राफीक इन्स्पेक्टर (सर्वे) रविप्रकाश गुजराल आणि मुकेशलाल यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे औरंगाबाद - नगर या मार्गाच्या दृष्टीने उद्योजकांशी चर्चा केली.

ठळक मुद्देसाजापूर, गंगापूर, देवगड, नेवासा, शनिशिंगणापूर येथे स्थानकया रेल्वे मार्गामुळे थेट पुण्याला कनेक्टिव्हिटी मिळणे शक्य

औरंगाबाद : औरंगाबाद - अहमदनगर या १२० किलोमीटर अंतराच्या नव्या रेल्वेे मार्गाच्या फिल्ड सर्वेक्षणाला सोमवारी सुरुवात झाली. यासाठी मध्य रेल्वेचे पथक शहरात दाखल झाले. या रेल्वे मार्गामुळे थेट पुण्याला कनेक्टिव्हिटी मिळणे शक्य होणार असल्याचे पथकाने स्पष्ट केले. हा मार्ग अधिक सोयीचा, फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. पण, २२ किलोमीटरच्या राेटेगाव - कोपरगाव मार्गानेही पुणे कनेक्टिव्हिटी मिळणे शक्य आहे. परंतु या नव्या मार्गामुळे रोटेगाव - कोपरगाव मार्गाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

मध्य रेल्वेचे डेप्युटी चीफ ऑपरेशन मॅनेजर (सर्वे) सुरेशचंद्र जैन, चीफ ट्राफीक इन्स्पेक्टर (सर्वे) रविप्रकाश गुजराल आणि मुकेशलाल यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे औरंगाबाद - नगर या मार्गाच्या दृष्टीने उद्योजकांशी चर्चा केली. यावेळी खा. डाॅ. भागवत कराड, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतेश चॅटर्जी, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, राम भोगले, कमलेश धूत, ‘सीआयआय’चे रमण अजगावकर, रवींद्र वैद्य आदींची उपस्थिती होती. यावेळी या पथकाने औरंगाबादहून किती मालवाहतूक होते आणि औरंगाबाद - नगर मार्ग झाल्यास किती मालवाहतूक शक्य होईल, यादृष्टीने चर्चा केली. यावेळी उद्योजकांनी त्यासंदर्भात माहिती देत हा मार्ग झाल्यास मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होईल, असे सांगितले.

या प्रस्तावित मार्गात साजापूर, गंगापूर, देवगड, नेवासा, शनिशिंगणापूर येथे स्थानक करणे प्रस्तावित आहे. साजापूर येथे कंटेनर डेपो केल्यास अधिक फायदा होईल, असे उद्योजकांनी म्हटले. हे पथक ४ तारखेपर्यंत या सर्व ठिकाणी भेटी देऊन आढावा घेणार आहे. नगर - दौंड - पुणे या अशा मार्गाने पूर्वी पुण्याला जावे लागत होते. परंतु आता कॅडलाइन टाकून नगरहून पुण्याला जाणे शक्य झाले आहे. त्यामुळे औरंगाबाद - नगर मार्गामुळे पुण्याची कनेक्टिव्हिटी मिळेल. सर्वेक्षणाचा अहवाल तीन महिन्यांत तयार होईल. त्यानंतर तो प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे जाईल, असे सुरेशचंद्र जैन यांनी सांगितले.

नव्या मार्गाला विरोध नाहीऔरंगाबाद रेल्वेमार्ग पुणे, गोवा मार्गाला जोडण्यासाठी रोटेगाव ते कोपरगाव या रेल्वे मार्गाची जवळपास २५ वर्षांपासून प्रतीक्षा केली जात आहे. केवळ २२ किलोमीटरचा हा मार्ग आहे. या मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. त्याचा डीपीआरही तयार झालेला आहे. त्यामुळे हा मार्ग निश्चितच होईल. आता औरंगाबाद - नगर मार्गाचे सर्वेक्षण केले जात आहे. पण, औरंगाबाद - नगर मार्गाला आमचा विरोध नाही. तोही व्हावा.- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेtourismपर्यटन