शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

शहरात रॅलीद्वारे अवयवदानाचा महाजागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:48 IST

मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत राहण्यासाठी समाजातील प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.

जालना : देशात आज असंख्य रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अवयवदान करून तुम्ही त्यांना जीवनदान देऊ शकता. अवयवदानाद्वारे मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत राहण्यासाठी समाजातील प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले.अवयवदानाविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी शहरातून मंगळवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.गांधी चमन येथे जिल्हाधिकाºयांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक एस. बी. म्हस्के, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील, जिल्हा नोडल अधिकारी डॉ. संजय साळवे, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. केशव इंगळे, दीपक झारखंडे, अवयवदान समुपदेशक योगिता काकडे, एस. डब्ल्यू पाईकराव आदींची उपस्थिती होती.अवयवदानासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यात अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अवयवदानाबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.डॉ. राठोड म्हणाले की, अवयवदान- सर्वात श्रेष्ठ दान आहे. अवयवदान करणे हा माणुसकीचा धर्म आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात अवयवदानाचे फार्म भरून द्यावेत. यावेळी अवयवदानाबाबत सर्व उपस्थितांना प्रतिज्ञा देण्यात आली. गांधीचमन ते मस्तगड, मुथा बिल्डिंगमार्गे मामाचौकात रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, डॉक्टर्स यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला.