शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

दुष्काळ निर्र्मूलनासाठी जनजागृती आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:49 IST

राज्यातील जनता दुष्काळाने होरपळून निघत आहे, तरीही सरकार लक्ष देत नाही. दुष्काळ निर्मूलनासाठी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत सीटूचे प्रदेशाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी बजाजनगर येथे रविवारी व्यक्त केले.

वाळूज महानगर : राज्यातील जनता दुष्काळाने होरपळून निघत आहे, तरीही सरकार लक्ष देत नाही. दुष्काळ निर्मूलनासाठी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत सीटूचे प्रदेशाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी बजाजनगर येथे रविवारी व्यक्त केले.बजाजनगरातील शहीद भगतसिंह शाळेत सीटूतर्फे रविवारी राज्यस्तरीय दुष्काळ निवारण कार्यशाळा घेण्यात आली.

डॉ. कराड म्हणाले की, पाण्याचे योग्य नियोजन, त्यावर उपाययोजना, पाण्याचा पुनर्वापर, शेतकरी व बेरोजगारांच्या हिताच्या सरकारी योजना याविषयी जन संघटनेत जनजागृती होणे काळाची गरज आहे. याविषयी सीटू व समविचारी संघटनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी गावातील तरुण-तरुणींना सोबत घेऊन यांचा प्रचार, प्रसार करून लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. लोक जागृत झाले तरच दुष्काळ निर्मूलन करता येईल, असे सांगितले.प्रा. पुरंदरे म्हणाले की, समन्यायी पाणी वाटप होणे गरजेचे आहे. समान पाणीवाटप झाल्यास शेतकऱ्यांचे हित होईल, तर अ‍ॅड. भवलकर यांनी पुढारपण गुलामीने ग्रासले असल्यामुळेच मराठवाड्याचे प्रश्न सुटत नाहीत. या विरोधात शेतकरी, मजूर, विद्यार्थी व महिलांनी आवाज उठविणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी कुमार सिराळकर, पंडित वासरे, एम.एच. शेख, अण्णा सावंत, विजय गाभणे आदींनी विचार मांडले. कार्यशाळेला सीटू, किसान सभा, शेतमजूर युनियन, एसएफआय, डीवायएफआय व जनवादी महिला संघटनेच्या अडीचशे ते तीनशे पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी नितीन देशमुख, गौतम शिंदे, शंकर ननुरे, सतीश कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

विभागीय आयुक्तालयावर मोर्चाशेतकरी, बेरोजगारी, दुष्काळ, पाणी आदी प्रश्नांवर सरकारविरोधात सीटू, किसान सभा, शेतमजूर युनियन, एसएफआय, डीवायएफआय आदींसह समविचारी संघटनेला सोबत घेऊन १० एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Walujवाळूज