शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

दुष्काळ निर्र्मूलनासाठी जनजागृती आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:49 IST

राज्यातील जनता दुष्काळाने होरपळून निघत आहे, तरीही सरकार लक्ष देत नाही. दुष्काळ निर्मूलनासाठी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत सीटूचे प्रदेशाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी बजाजनगर येथे रविवारी व्यक्त केले.

वाळूज महानगर : राज्यातील जनता दुष्काळाने होरपळून निघत आहे, तरीही सरकार लक्ष देत नाही. दुष्काळ निर्मूलनासाठी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत सीटूचे प्रदेशाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी बजाजनगर येथे रविवारी व्यक्त केले.बजाजनगरातील शहीद भगतसिंह शाळेत सीटूतर्फे रविवारी राज्यस्तरीय दुष्काळ निवारण कार्यशाळा घेण्यात आली.

डॉ. कराड म्हणाले की, पाण्याचे योग्य नियोजन, त्यावर उपाययोजना, पाण्याचा पुनर्वापर, शेतकरी व बेरोजगारांच्या हिताच्या सरकारी योजना याविषयी जन संघटनेत जनजागृती होणे काळाची गरज आहे. याविषयी सीटू व समविचारी संघटनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी गावातील तरुण-तरुणींना सोबत घेऊन यांचा प्रचार, प्रसार करून लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. लोक जागृत झाले तरच दुष्काळ निर्मूलन करता येईल, असे सांगितले.प्रा. पुरंदरे म्हणाले की, समन्यायी पाणी वाटप होणे गरजेचे आहे. समान पाणीवाटप झाल्यास शेतकऱ्यांचे हित होईल, तर अ‍ॅड. भवलकर यांनी पुढारपण गुलामीने ग्रासले असल्यामुळेच मराठवाड्याचे प्रश्न सुटत नाहीत. या विरोधात शेतकरी, मजूर, विद्यार्थी व महिलांनी आवाज उठविणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी कुमार सिराळकर, पंडित वासरे, एम.एच. शेख, अण्णा सावंत, विजय गाभणे आदींनी विचार मांडले. कार्यशाळेला सीटू, किसान सभा, शेतमजूर युनियन, एसएफआय, डीवायएफआय व जनवादी महिला संघटनेच्या अडीचशे ते तीनशे पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी नितीन देशमुख, गौतम शिंदे, शंकर ननुरे, सतीश कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

विभागीय आयुक्तालयावर मोर्चाशेतकरी, बेरोजगारी, दुष्काळ, पाणी आदी प्रश्नांवर सरकारविरोधात सीटू, किसान सभा, शेतमजूर युनियन, एसएफआय, डीवायएफआय आदींसह समविचारी संघटनेला सोबत घेऊन १० एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Walujवाळूज