शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निर्र्मूलनासाठी जनजागृती आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:49 IST

राज्यातील जनता दुष्काळाने होरपळून निघत आहे, तरीही सरकार लक्ष देत नाही. दुष्काळ निर्मूलनासाठी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत सीटूचे प्रदेशाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी बजाजनगर येथे रविवारी व्यक्त केले.

वाळूज महानगर : राज्यातील जनता दुष्काळाने होरपळून निघत आहे, तरीही सरकार लक्ष देत नाही. दुष्काळ निर्मूलनासाठी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत सीटूचे प्रदेशाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी बजाजनगर येथे रविवारी व्यक्त केले.बजाजनगरातील शहीद भगतसिंह शाळेत सीटूतर्फे रविवारी राज्यस्तरीय दुष्काळ निवारण कार्यशाळा घेण्यात आली.

डॉ. कराड म्हणाले की, पाण्याचे योग्य नियोजन, त्यावर उपाययोजना, पाण्याचा पुनर्वापर, शेतकरी व बेरोजगारांच्या हिताच्या सरकारी योजना याविषयी जन संघटनेत जनजागृती होणे काळाची गरज आहे. याविषयी सीटू व समविचारी संघटनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी गावातील तरुण-तरुणींना सोबत घेऊन यांचा प्रचार, प्रसार करून लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. लोक जागृत झाले तरच दुष्काळ निर्मूलन करता येईल, असे सांगितले.प्रा. पुरंदरे म्हणाले की, समन्यायी पाणी वाटप होणे गरजेचे आहे. समान पाणीवाटप झाल्यास शेतकऱ्यांचे हित होईल, तर अ‍ॅड. भवलकर यांनी पुढारपण गुलामीने ग्रासले असल्यामुळेच मराठवाड्याचे प्रश्न सुटत नाहीत. या विरोधात शेतकरी, मजूर, विद्यार्थी व महिलांनी आवाज उठविणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी कुमार सिराळकर, पंडित वासरे, एम.एच. शेख, अण्णा सावंत, विजय गाभणे आदींनी विचार मांडले. कार्यशाळेला सीटू, किसान सभा, शेतमजूर युनियन, एसएफआय, डीवायएफआय व जनवादी महिला संघटनेच्या अडीचशे ते तीनशे पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी नितीन देशमुख, गौतम शिंदे, शंकर ननुरे, सतीश कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

विभागीय आयुक्तालयावर मोर्चाशेतकरी, बेरोजगारी, दुष्काळ, पाणी आदी प्रश्नांवर सरकारविरोधात सीटू, किसान सभा, शेतमजूर युनियन, एसएफआय, डीवायएफआय आदींसह समविचारी संघटनेला सोबत घेऊन १० एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Walujवाळूज