शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

महावितरणकडून जनजागृती गरजेची !

By admin | Updated: April 15, 2016 01:45 IST

जालना : महावितरणकडून जनजागृती म्हणावी तशी होत नसल्याने वीजचोरीसह विजेचा वापर कसा करावा याबाबत नागरिक अज्ञानी असल्याचे चित्र

जालना : महावितरणकडून जनजागृती म्हणावी तशी होत नसल्याने वीजचोरीसह विजेचा वापर कसा करावा याबाबत नागरिक अज्ञानी असल्याचे चित्र लोकमतने केलेल्या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले. महावितरणकडून जनजागृती होत नसल्याचे ५० टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. महावितरणकडून वीज वापराबाबत जागृती होते का? या विषयावर लोकमतने प्रश्नांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण केले. यावर नागरिकांने आपले मत व्यक्त करून महावितरणने जनजागृती व्यापक करावी, वाचकांनी नमूद केले. महावितरणकडून वीज वापराबाबत जनजागृती होते का? या प्रश्नावर ३० टक्के नागरिक होय म्हणतात. ५० टक्के नागरिक जनजागृती होत नसल्याचे सांगतात तर २० टक्के नागरिकांना याबाबत काहीच म्हणायचे नाही. जागृती नसल्याने वीजचोरीचे प्रमाण वाढले का? या प्रश्नावर ६० टक्के नागरिक चोरी वाढल्याचे सांगतात. ३० टक्के नागरिकांना चोरी होत नसल्याचे वाटते तर १० टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. महावितरण कंपनीने जनजागृती केल्यास वीज चोरी कमी होईल का? याबाबत ७५ टक्के होय म्हणतात. १० टक्के म्हणतात वीज चोरी कमी होणार नाही. १५ टक्के नागरिकांना काहीच माहीत नाही. जागृती झाल्यास ग्राहक विजेचा योग्य वापर करतील का? ८० टक्के होय म्हणतात. १० टक्के नाही म्हणतात तर १० टक्के नागरिकांना याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात येते. एकूणच महावितरण कंपनीने ग्राहकांना वीज जागृतीसोबतच वीज बिलांबाबतही जनजागृती केल्यास मनातील संभ्रम दूर होईल, असे वाचकांनी सांगितले. जागृतीसोबतच महावितरणच्या कारभारावर नागरिकांनी टीका केली. या सर्व्हेक्षणातील प्रश्नांव्यतिरिक्तही नागरिकांनी विविध प्रश्नावंर आपले मनोगत व्यक्त करून महावितरणच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर लावला. महावितरण वीजचोरीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून काही भागात वीज चोरीला सुट देत असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले. महावितरण कंपनीने सर्वच वीजचोरांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी काहींनी केली.