शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

महावितरणकडून जनजागृती गरजेची !

By admin | Updated: April 15, 2016 01:45 IST

जालना : महावितरणकडून जनजागृती म्हणावी तशी होत नसल्याने वीजचोरीसह विजेचा वापर कसा करावा याबाबत नागरिक अज्ञानी असल्याचे चित्र

जालना : महावितरणकडून जनजागृती म्हणावी तशी होत नसल्याने वीजचोरीसह विजेचा वापर कसा करावा याबाबत नागरिक अज्ञानी असल्याचे चित्र लोकमतने केलेल्या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले. महावितरणकडून जनजागृती होत नसल्याचे ५० टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. महावितरणकडून वीज वापराबाबत जागृती होते का? या विषयावर लोकमतने प्रश्नांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण केले. यावर नागरिकांने आपले मत व्यक्त करून महावितरणने जनजागृती व्यापक करावी, वाचकांनी नमूद केले. महावितरणकडून वीज वापराबाबत जनजागृती होते का? या प्रश्नावर ३० टक्के नागरिक होय म्हणतात. ५० टक्के नागरिक जनजागृती होत नसल्याचे सांगतात तर २० टक्के नागरिकांना याबाबत काहीच म्हणायचे नाही. जागृती नसल्याने वीजचोरीचे प्रमाण वाढले का? या प्रश्नावर ६० टक्के नागरिक चोरी वाढल्याचे सांगतात. ३० टक्के नागरिकांना चोरी होत नसल्याचे वाटते तर १० टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. महावितरण कंपनीने जनजागृती केल्यास वीज चोरी कमी होईल का? याबाबत ७५ टक्के होय म्हणतात. १० टक्के म्हणतात वीज चोरी कमी होणार नाही. १५ टक्के नागरिकांना काहीच माहीत नाही. जागृती झाल्यास ग्राहक विजेचा योग्य वापर करतील का? ८० टक्के होय म्हणतात. १० टक्के नाही म्हणतात तर १० टक्के नागरिकांना याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात येते. एकूणच महावितरण कंपनीने ग्राहकांना वीज जागृतीसोबतच वीज बिलांबाबतही जनजागृती केल्यास मनातील संभ्रम दूर होईल, असे वाचकांनी सांगितले. जागृतीसोबतच महावितरणच्या कारभारावर नागरिकांनी टीका केली. या सर्व्हेक्षणातील प्रश्नांव्यतिरिक्तही नागरिकांनी विविध प्रश्नावंर आपले मनोगत व्यक्त करून महावितरणच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर लावला. महावितरण वीजचोरीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून काही भागात वीज चोरीला सुट देत असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले. महावितरण कंपनीने सर्वच वीजचोरांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी काहींनी केली.