शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

पु. ल. देशपांडे यांच्यासारखे प्रेम महाराष्ट्राने ना. धो. महानोरांवर केलं : कौतिकराव ठाले पाटील

By राम शिनगारे | Updated: August 4, 2023 12:36 IST

ना. धो. महानोर म्हणजे कवितेच्या सुवर्णयुगातील अखेरचे शिलेदार

- कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषदपु. ल. देशपांडे यांच्यानंतर महाराष्ट्रानं ना. धो. महानोर यांच्यावर अतोनात प्रेम केलं. देशाच्या कानाकोपऱ्यातील मराठीजनांनी त्यांच्या कवितांचे कार्यक्रम आयोजित केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी कवितांचे वाचन केले. गावखेड्यातील एका व्यक्तीला सर्वच स्तरातून एवढं प्रेम मिळणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. हे प्रेम महानोरांच्या वाट्याला आले.

ना. धो. महानोर यांनी १९६०-७० च्या दशकात कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या ८ कविता मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठानमध्ये ‘रानातल्या कविता’ नावाने प्रकाशित झाल्या. याच नावाने पुढे १९६७ ला त्यांचा पहिला कविता संग्रह आला अन् महानोर मराठी साहित्यात सर्वदूर पोहोचले. १९६०-७० हे दशक मराठी साहित्यातील कवितांचे सुवर्णयुग होते. या दशकात दिलीप चित्रे, अरुण कोलठकर, नारायण सुर्वे, आरती प्रभू, ग्रेस, केशव मेश्राम, नामदेव ढसाळ, मधुकर कोचे आणि ना. धो. महानोर हे महत्त्वाचे कवी. गझलकार सुरेश भटही याच दशकातले. पुढे हेच कवी गाजत राहिले. या सर्वांमधील ना. धो. एकमेव हयात होते. त्यांचीही आता प्राणज्योत मालवली. ही मराठी साहित्याची सर्वात मोठी हानी आहे.

महानोर यांचे इंदूर, बडोदा, हैदराबाद, धारवाड, बंगळुरू, दिल्ली आदी ठिकाणी कविता वाचन व्हायचे. दिल्लीतील कार्यक्रमांना तत्कालीन सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड, केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण, ना. वि. गाडगीळ, वसंतराव साठे, पंजाबराव देशमुख यांच्यासह इतरही रसिकांची उपस्थिती असायची. पु. ल. देशपांडे यांच्यासारखे प्रेम महाराष्ट्राने ना. धो.वर केले.

महानोर १९८४ साली अंबाजोगाई येथील साहित्य संमेलनानंतर ‘मसाप’चे अध्यक्ष झाले. एका विशिष्ट परिस्थितीत त्यांना हे अध्यक्षपद स्वीकारावे लागले. त्यानंतर महामंडळाचेही अध्यक्ष झाले. ‘मसाप’ कोणत्याही प्रकारचे वाङ्मयीन पुरस्कार देत नव्हती. तेव्हा त्यांनी नरहर कुरुंदकर यांच्या नावाने मराठवाड्यातील साहित्यिकांना पुरस्कार देण्यास सुरुवात केली. पहिला पुरस्कार व्यासंगी पत्रकार अनंत भालेराव व कवयित्री अनुराधा पाटील यांना पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानंतर ‘मसाप’तील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बांधण्याचा निर्णयही महानोर यांच्याच कार्यकारिणीने घेतला. एकूणच महानोर यांच्या जाण्याने मराठी साहित्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे अतोनात नुकसान झाले. मसाप व माझ्या कुटुंबीयांतर्फे त्यांना श्रद्धांजली !

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद