शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

पु. ल. देशपांडे यांच्यासारखे प्रेम महाराष्ट्राने ना. धो. महानोरांवर केलं : कौतिकराव ठाले पाटील

By राम शिनगारे | Updated: August 4, 2023 12:36 IST

ना. धो. महानोर म्हणजे कवितेच्या सुवर्णयुगातील अखेरचे शिलेदार

- कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषदपु. ल. देशपांडे यांच्यानंतर महाराष्ट्रानं ना. धो. महानोर यांच्यावर अतोनात प्रेम केलं. देशाच्या कानाकोपऱ्यातील मराठीजनांनी त्यांच्या कवितांचे कार्यक्रम आयोजित केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी कवितांचे वाचन केले. गावखेड्यातील एका व्यक्तीला सर्वच स्तरातून एवढं प्रेम मिळणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. हे प्रेम महानोरांच्या वाट्याला आले.

ना. धो. महानोर यांनी १९६०-७० च्या दशकात कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या ८ कविता मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठानमध्ये ‘रानातल्या कविता’ नावाने प्रकाशित झाल्या. याच नावाने पुढे १९६७ ला त्यांचा पहिला कविता संग्रह आला अन् महानोर मराठी साहित्यात सर्वदूर पोहोचले. १९६०-७० हे दशक मराठी साहित्यातील कवितांचे सुवर्णयुग होते. या दशकात दिलीप चित्रे, अरुण कोलठकर, नारायण सुर्वे, आरती प्रभू, ग्रेस, केशव मेश्राम, नामदेव ढसाळ, मधुकर कोचे आणि ना. धो. महानोर हे महत्त्वाचे कवी. गझलकार सुरेश भटही याच दशकातले. पुढे हेच कवी गाजत राहिले. या सर्वांमधील ना. धो. एकमेव हयात होते. त्यांचीही आता प्राणज्योत मालवली. ही मराठी साहित्याची सर्वात मोठी हानी आहे.

महानोर यांचे इंदूर, बडोदा, हैदराबाद, धारवाड, बंगळुरू, दिल्ली आदी ठिकाणी कविता वाचन व्हायचे. दिल्लीतील कार्यक्रमांना तत्कालीन सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड, केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण, ना. वि. गाडगीळ, वसंतराव साठे, पंजाबराव देशमुख यांच्यासह इतरही रसिकांची उपस्थिती असायची. पु. ल. देशपांडे यांच्यासारखे प्रेम महाराष्ट्राने ना. धो.वर केले.

महानोर १९८४ साली अंबाजोगाई येथील साहित्य संमेलनानंतर ‘मसाप’चे अध्यक्ष झाले. एका विशिष्ट परिस्थितीत त्यांना हे अध्यक्षपद स्वीकारावे लागले. त्यानंतर महामंडळाचेही अध्यक्ष झाले. ‘मसाप’ कोणत्याही प्रकारचे वाङ्मयीन पुरस्कार देत नव्हती. तेव्हा त्यांनी नरहर कुरुंदकर यांच्या नावाने मराठवाड्यातील साहित्यिकांना पुरस्कार देण्यास सुरुवात केली. पहिला पुरस्कार व्यासंगी पत्रकार अनंत भालेराव व कवयित्री अनुराधा पाटील यांना पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानंतर ‘मसाप’तील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बांधण्याचा निर्णयही महानोर यांच्याच कार्यकारिणीने घेतला. एकूणच महानोर यांच्या जाण्याने मराठी साहित्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे अतोनात नुकसान झाले. मसाप व माझ्या कुटुंबीयांतर्फे त्यांना श्रद्धांजली !

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद