शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

पीआरपीने काँग्रेसकडे दिली २४ जागांची यादी

By admin | Updated: August 20, 2014 23:55 IST

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे पीआरपीने प्राबल्य असलेल्या २४ मतदारसंघाची यादी दिली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परभणी : पीपल्स रिपब्लिकन पार्टीने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सहकार्य केले. विधानसभेलाही काँग्रेससोबत मैत्री असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे पीआरपीने प्राबल्य असलेल्या २४ मतदारसंघाची यादी दिली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी फॅक्टर चालला. परंतु, या निवडणुकीत हा प्रभाव राहणार नाही, असे सांगत विधानसभा निवडणुकीसाठी पीआरपीने २४ जागांची यादी काँग्रेसवरिष्ठांकडे पाठविली आहे. राज्यात पीआरपीची काँग्रेस आघाडीसोबत युती आहे. काँग्रेस बरोबरच पीआरपीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसलाही होणार आहे. त्यामुळे त्यांनीही जागा सोडाव्यात, असा आग्रह आम्ही धरल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांची अजूनही पुर्तता झालेली नाही. महागाई वाढली आहे. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला असून पूर्वीचेच सरकार बरे होते, अशी भावना जनतेची बनत चालली असल्याचे कवाडे म्हणाले. सध्या मोदी यांचाच रिमोट कंट्रोल असून देशाची लोकशाही हुकूमशाही होण्याची भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली. मोहन भागवत यांच्या वक्तव्याचाही निषेध करत त्यांचे वक्तव्य देशहिताचे नाही. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ते शोभणारे नाही, असे ते म्हणाले. भागवत यांनी भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे वक्तव्य केले होते. परंतु, भारत हा शब्द राष्ट्रवाचक असून हिंदू हा शब्द धर्मवाचक आहे. त्यामुळे या विधानातून देशाला विघटनाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न होत असून असे वक्तव्य करणाऱ्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी महामंत्री चरणदास मोरे, महाराष्ट्र सचिव गौतम मुंडे, जिल्हाध्यक्ष डी.एस.लहाने, अरुण लोखंडे, कैलास हिरवाळे, संगिताताई मुळे, विलास बनसोडे, बापुसाहेब गजभारे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)