शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘ग्राहकांना दर्जेदार सेवा द्या’

By admin | Updated: December 17, 2015 00:09 IST

औरंगाबाद : शहरातील १४ लाख नागरिकांना चांगली दर्जेदार सेवा देण्याचे दायित्व महापालिकेचे आहे.

औरंगाबाद : शहरातील १४ लाख नागरिकांना चांगली दर्जेदार सेवा देण्याचे दायित्व महापालिकेचे आहे. भविष्यात प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असा आदेश आज राज्य ग्राहक समितीने मनपाला दिला. महापालिकेत आज सायंकाळी ग्राहक समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समितीने मनपाच्या संपूर्ण कारभाराचा आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी घनकचरा, आरोग्य, पाणीपुरवठा आदी सोयी- सुविधांची माहिती दिली. उपायुक्त रवींद्र निकम यांनी शिक्षण विभागाची माहिती दिली. ग्राहक समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी नमूद केले की, शहरातील नागरिकांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. विविध हॉटेलमध्ये मिळणारे सुटे पाणी तपासण्याचे काम मनपाचे आहे. बाटलीत बंद असलेले पाणी तपासण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाकडून होते. प्रत्येक हॉटेलमध्ये वेटर बाटलीबंद पाण्याचा आग्रह धरतो. त्याने हा आग्रह न धरता सुटे पाणीच दिले पाहिजे. मनपाच्या आरोग्य विभागाने पाण्याची तपासणी करायला पाहिजे. शिक्षणावर भाष्य करताना ते म्हणाले की, शिक्षण नाही म्हणून गुन्हेगारी वाढत आहे. या विषयाकडे मनपाने अत्यंत गांभीर्याने बघायला हवे. रस्ते आणि गटार या विषयावर देशपांडे यांनी सांगितले की, यासंदर्भात मनपाने नियोजन करावे. एखाद्या कामाची वॉरंटी पाच वर्षे असेल, तर कंत्राटदाराने अधूनमधून डागडुजी करायला हवी. फूटपाथच्या मुद्यावर समितीने बरीच आगपाखड केली. शहरातील प्रत्येक फूटपाथवर अतिक्रमणे आहेत. फूटपाथ ही ग्राहकांच्या हक्काची आहेत. मनपाला कर भरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला फूटपाथ मिळायला हवे. ठिकठिकाणी अतिक्रमणेच दिसून येतात. फळविक्रेते यावर आपला हक्क दाखवितात. शहानूरमियाँ दर्गा परिसरातील काही उदाहरणेही समितीने दिली. महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्येही चांगल्या दर्जेदार सोयी मिळायला हव्यात. घाटीच्या भरवशावर मनपाने आपली आरोग्यसेवा बळकट करू नये असे नाही.