शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
3
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
4
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
5
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
6
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
7
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
8
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
9
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा नावं
10
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
11
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
12
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
13
समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
14
Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
15
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
16
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
17
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
18
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
19
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
20
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट

‘ग्राहकांना दर्जेदार सेवा द्या’

By admin | Updated: December 17, 2015 00:09 IST

औरंगाबाद : शहरातील १४ लाख नागरिकांना चांगली दर्जेदार सेवा देण्याचे दायित्व महापालिकेचे आहे.

औरंगाबाद : शहरातील १४ लाख नागरिकांना चांगली दर्जेदार सेवा देण्याचे दायित्व महापालिकेचे आहे. भविष्यात प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असा आदेश आज राज्य ग्राहक समितीने मनपाला दिला. महापालिकेत आज सायंकाळी ग्राहक समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समितीने मनपाच्या संपूर्ण कारभाराचा आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी घनकचरा, आरोग्य, पाणीपुरवठा आदी सोयी- सुविधांची माहिती दिली. उपायुक्त रवींद्र निकम यांनी शिक्षण विभागाची माहिती दिली. ग्राहक समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी नमूद केले की, शहरातील नागरिकांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. विविध हॉटेलमध्ये मिळणारे सुटे पाणी तपासण्याचे काम मनपाचे आहे. बाटलीत बंद असलेले पाणी तपासण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाकडून होते. प्रत्येक हॉटेलमध्ये वेटर बाटलीबंद पाण्याचा आग्रह धरतो. त्याने हा आग्रह न धरता सुटे पाणीच दिले पाहिजे. मनपाच्या आरोग्य विभागाने पाण्याची तपासणी करायला पाहिजे. शिक्षणावर भाष्य करताना ते म्हणाले की, शिक्षण नाही म्हणून गुन्हेगारी वाढत आहे. या विषयाकडे मनपाने अत्यंत गांभीर्याने बघायला हवे. रस्ते आणि गटार या विषयावर देशपांडे यांनी सांगितले की, यासंदर्भात मनपाने नियोजन करावे. एखाद्या कामाची वॉरंटी पाच वर्षे असेल, तर कंत्राटदाराने अधूनमधून डागडुजी करायला हवी. फूटपाथच्या मुद्यावर समितीने बरीच आगपाखड केली. शहरातील प्रत्येक फूटपाथवर अतिक्रमणे आहेत. फूटपाथ ही ग्राहकांच्या हक्काची आहेत. मनपाला कर भरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला फूटपाथ मिळायला हवे. ठिकठिकाणी अतिक्रमणेच दिसून येतात. फळविक्रेते यावर आपला हक्क दाखवितात. शहानूरमियाँ दर्गा परिसरातील काही उदाहरणेही समितीने दिली. महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्येही चांगल्या दर्जेदार सोयी मिळायला हव्यात. घाटीच्या भरवशावर मनपाने आपली आरोग्यसेवा बळकट करू नये असे नाही.