शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

समृद्धीच्या इंटरचेंजमुळे ‘डीएमआयसी’ येणार वाहतुकीच्या प्रचंड रेट्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 11:56 IST

जालना ड्रायपोर्ट, मुंबई ते नागपूर, त्यातच डीएमआयसीतील वाहतूक, शहरातून मुंबई व नागपूरकडे जाणारी वाहतूक या इंटरचेंजचा वापर करील.

ठळक मुद्देऔद्योगिक गुंतवणुकीवर होऊ शकतो परिणाम डीएमआयसीमार्गे जालना रोडच समृद्धीला जोडला जाईल

- विकास राऊत

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत येणाऱ्या ऑरिक इंडस्ट्रीयल टाऊनशिप लि.(एआयटीएल) मधून जयपूर-भांबर्डा येथे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणाऱ्या इंटरचेंजमुळे वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढेल. एकप्रकारे समृद्धी महामार्ग डीएमआयसीमार्गे जालना रोडलाच जोडला जाणार आहे. यामुळे औद्योगिक वातावरणाला धक्का बसण्याची चिन्हे आहेत.

समृद्धी महामार्ग प्रस्तावित इंटरचेंजमुळे डीएमआयसीमार्गे थेट जालना रोडलाच जोडला जाणार असल्यामुळे आज जरी डीएमआयसीत उद्योगांची मोठी गुंतवणूक नसली तरी भविष्यात गुंतवणूक वाढल्यास वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होईल. जालना रोडवरून बीड व इतर जिल्ह्यांतून येणारी वाहतूक डीएमआयसीमार्गे इंटरचेंजवरून मुंबई किंवा नागपूरकडे वळेल. यामुळे वाहतुकीची कोंडी होणे शक्य आहे. सोबतच जालन्याकडून येणारी, चिकलठाण्यासह नवनगरमधून जाणारी आणि शहरातून मुंबई व नागपूरकडे जाणारी व येणारी वाहतूक याच इंटरचेंजचा वापर करू लागल्यास डीएमआयसीतील सर्व रस्ते वाहनांच्या गर्तेत येतील. जालना ड्रायपोर्ट, मुंबई ते नागपूर, त्यातच डीएमआयसीतील वाहतूक, शहरातून मुंबई व नागपूरकडे जाणारी वाहतूक या इंटरचेंजचा वापर करील. त्यामुळे ऑरिक सिटी परिसर हा प्रचंड वाहतुकीच्या विळख्यात येईल. औद्योगिक वसाहत वाहतुकीच्या वर्दळीत आल्यास त्याचे गुंतवणुकीवर मोठे परिणाम होतील. डीएमआयसीच्या उत्तर बाजूने साधारणत: पाऊण किलोमीटरवर समृद्धी महामार्गावरून इंटरचेंज कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. यामुळे जालना रोडमार्गे डीएमआयसी ऑरिक सिटीत इंडस्ट्रियल दळणवळण वाढून वाहतुकीची कोंडी वाढेल.

चाकण आणि तळेगाव येथे काय झालेचाकण औद्योगिक वसाहत ते तळेगाव येथे औद्योगिक वसाहतीत वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. त्याला कारण म्हणजे औद्योगिक आणि सार्वजनिक वाहतुकीची कनेक्टिव्हिटी एकत्र असणे आहे. असाच प्रकार डीएमआयसीत इंटरचेंजमुळे आगामी काळात होण्याची शक्यता आहे. नाशिक महामार्ग व तळेगाव, मुंबई महामार्गावर वाहतूक खोळंबत असल्याने ४५ कि.मी.चा नवीन रस्ता एमआयडीसीने तेथे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. डीएमआयसीत वाहतुकीची कोंडी वाढली तर पुन्हा नवीन रस्ता बांधावा लागेल.

औद्योगिक गुंतवणुकीवरही परिणामाची शक्यताचाकण आणि तळेगावमध्ये नव्याने गुंतवणूक वाढू लागली आहे. औद्योगिक वाहतुकीवर परिणाम झाल्यास या गुंतवणुकीबाबत साशंकता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नवीन मार्ग उभारणीकडे एमआयडीसीने लक्ष केंद्रित केले आहे. असाच प्रकार इंटरचेंज कनेक्टिव्हिटीमुळे डीएमआयसीत होऊन वाहतुकीची कोंडी वाढली तर गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इंटरचेंजवरून होत असलेले दावे असेएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन यांनी दावा केला, सध्या तरी डीएमआयसीतून जोडण्यात येणाऱ्या इंटरचेंज रस्त्याचा शहरी वाहतुकीवर परिणाम होणार नाही. दहा वर्षांनंतर वाहतूक वाढेल, त्यानंतर परिणाम जाणवू शकेल. ४२ कोटींची रक्कम एमएसआरडीसीकडे वर्ग केल्याचेही त्यांनी सांगितले. ऑरिकमधून इंटरचेंज औद्योगिक वाहतुकीसाठीच केला जात आहे. औरंगाबादमध्ये इतर इंटरचेंज सामान्य वाहतुकीसाठी उपलब्ध असतील. शेंद्रा, चिकलठाणा, करमाड, बदनापूर परिसरातील वाहतुकीसाठी या इंटरचेंजचा फायदा होईल, तर डीएमआयसीचे सहसंचालक जितेंद्र कास्तुके यांनी दावा केला की, डोमॅस्टिक वाहतुकीचा राबता त्या इंटरचेंजमुळे वाढणार नाही, असे वाटते.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबाद