शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
2
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
3
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
4
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
5
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
6
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
7
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
8
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
9
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
10
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
12
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
13
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
14
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
16
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
17
विशेष लेख: आळशी मावशी ! केवळ कोंबडीमुळं बिबट्या बिघडला... इकडं धूर.. तिकडं जाळ
18
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
19
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
20
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीच्या इंटरचेंजमुळे ‘डीएमआयसी’ येणार वाहतुकीच्या प्रचंड रेट्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 11:56 IST

जालना ड्रायपोर्ट, मुंबई ते नागपूर, त्यातच डीएमआयसीतील वाहतूक, शहरातून मुंबई व नागपूरकडे जाणारी वाहतूक या इंटरचेंजचा वापर करील.

ठळक मुद्देऔद्योगिक गुंतवणुकीवर होऊ शकतो परिणाम डीएमआयसीमार्गे जालना रोडच समृद्धीला जोडला जाईल

- विकास राऊत

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत येणाऱ्या ऑरिक इंडस्ट्रीयल टाऊनशिप लि.(एआयटीएल) मधून जयपूर-भांबर्डा येथे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणाऱ्या इंटरचेंजमुळे वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढेल. एकप्रकारे समृद्धी महामार्ग डीएमआयसीमार्गे जालना रोडलाच जोडला जाणार आहे. यामुळे औद्योगिक वातावरणाला धक्का बसण्याची चिन्हे आहेत.

समृद्धी महामार्ग प्रस्तावित इंटरचेंजमुळे डीएमआयसीमार्गे थेट जालना रोडलाच जोडला जाणार असल्यामुळे आज जरी डीएमआयसीत उद्योगांची मोठी गुंतवणूक नसली तरी भविष्यात गुंतवणूक वाढल्यास वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होईल. जालना रोडवरून बीड व इतर जिल्ह्यांतून येणारी वाहतूक डीएमआयसीमार्गे इंटरचेंजवरून मुंबई किंवा नागपूरकडे वळेल. यामुळे वाहतुकीची कोंडी होणे शक्य आहे. सोबतच जालन्याकडून येणारी, चिकलठाण्यासह नवनगरमधून जाणारी आणि शहरातून मुंबई व नागपूरकडे जाणारी व येणारी वाहतूक याच इंटरचेंजचा वापर करू लागल्यास डीएमआयसीतील सर्व रस्ते वाहनांच्या गर्तेत येतील. जालना ड्रायपोर्ट, मुंबई ते नागपूर, त्यातच डीएमआयसीतील वाहतूक, शहरातून मुंबई व नागपूरकडे जाणारी वाहतूक या इंटरचेंजचा वापर करील. त्यामुळे ऑरिक सिटी परिसर हा प्रचंड वाहतुकीच्या विळख्यात येईल. औद्योगिक वसाहत वाहतुकीच्या वर्दळीत आल्यास त्याचे गुंतवणुकीवर मोठे परिणाम होतील. डीएमआयसीच्या उत्तर बाजूने साधारणत: पाऊण किलोमीटरवर समृद्धी महामार्गावरून इंटरचेंज कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. यामुळे जालना रोडमार्गे डीएमआयसी ऑरिक सिटीत इंडस्ट्रियल दळणवळण वाढून वाहतुकीची कोंडी वाढेल.

चाकण आणि तळेगाव येथे काय झालेचाकण औद्योगिक वसाहत ते तळेगाव येथे औद्योगिक वसाहतीत वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. त्याला कारण म्हणजे औद्योगिक आणि सार्वजनिक वाहतुकीची कनेक्टिव्हिटी एकत्र असणे आहे. असाच प्रकार डीएमआयसीत इंटरचेंजमुळे आगामी काळात होण्याची शक्यता आहे. नाशिक महामार्ग व तळेगाव, मुंबई महामार्गावर वाहतूक खोळंबत असल्याने ४५ कि.मी.चा नवीन रस्ता एमआयडीसीने तेथे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. डीएमआयसीत वाहतुकीची कोंडी वाढली तर पुन्हा नवीन रस्ता बांधावा लागेल.

औद्योगिक गुंतवणुकीवरही परिणामाची शक्यताचाकण आणि तळेगावमध्ये नव्याने गुंतवणूक वाढू लागली आहे. औद्योगिक वाहतुकीवर परिणाम झाल्यास या गुंतवणुकीबाबत साशंकता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नवीन मार्ग उभारणीकडे एमआयडीसीने लक्ष केंद्रित केले आहे. असाच प्रकार इंटरचेंज कनेक्टिव्हिटीमुळे डीएमआयसीत होऊन वाहतुकीची कोंडी वाढली तर गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इंटरचेंजवरून होत असलेले दावे असेएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन यांनी दावा केला, सध्या तरी डीएमआयसीतून जोडण्यात येणाऱ्या इंटरचेंज रस्त्याचा शहरी वाहतुकीवर परिणाम होणार नाही. दहा वर्षांनंतर वाहतूक वाढेल, त्यानंतर परिणाम जाणवू शकेल. ४२ कोटींची रक्कम एमएसआरडीसीकडे वर्ग केल्याचेही त्यांनी सांगितले. ऑरिकमधून इंटरचेंज औद्योगिक वाहतुकीसाठीच केला जात आहे. औरंगाबादमध्ये इतर इंटरचेंज सामान्य वाहतुकीसाठी उपलब्ध असतील. शेंद्रा, चिकलठाणा, करमाड, बदनापूर परिसरातील वाहतुकीसाठी या इंटरचेंजचा फायदा होईल, तर डीएमआयसीचे सहसंचालक जितेंद्र कास्तुके यांनी दावा केला की, डोमॅस्टिक वाहतुकीचा राबता त्या इंटरचेंजमुळे वाढणार नाही, असे वाटते.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबाद