शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग आता होणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:24 IST

‘राधेश्याम मोपेलवार यांच्या निलंबनानंतर समृद्धी महामार्गाचे काम ठप्प झाले आहे. शिवाय या महामार्गासाठी लागणारे ४६ हजार कोटी रुपये कुठून उपलब्ध करायचे हा सरकारपुढे प्रश्न आहेच. सरकारच्या तिजोरीत तर पैसेच नाहीत, अशा अवस्थेत हा महामार्ग होईल, असे वाटत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘राधेश्याम मोपेलवार यांच्या निलंबनानंतर समृद्धी महामार्गाचे काम ठप्प झाले आहे. शिवाय या महामार्गासाठी लागणारे ४६ हजार कोटी रुपये कुठून उपलब्ध करायचे हा सरकारपुढे प्रश्न आहेच. सरकारच्या तिजोरीत तर पैसेच नाहीत, अशा अवस्थेत हा महामार्ग होईल, असे वाटत नाही. शिवाय या महामार्गासाठी शेतकरी आपल्या जमिनी द्यायला अजिबातच तयार नाही. त्यामुळे हा महामार्ग आता होणे नाही’ असा दावा आज येथे महाराष्टÑ राज्य किसान सभेचे सरचिटणीस कॉ. नामदेव गावडे व समृद्धी महामार्गविरोधी शेतकरी कृती समितीचे नेते कॉ. राम बाहेती यांनी केला.किसान सभेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत समृद्धी महामार्गाचा विषय निघाला. राधेश्याम मोपेलवारांच्या निलंबनानंतर समृद्धी महामार्गाची गती थांबलेली आहे. शेतकरीही आपल्या जमिनी द्यायला तयार नाहीत. कशा देतील? कारण जमिनीची काही वाढ होत नसते. ती गेली म्हणजे गेली. शेतकºयाला काही पैसे मिळतीलही; परंतु ते किती दिवस पुरतील? शेतकºयांची बरबादी कशासाठी? असे सवाल गावडे यांनी उपस्थित केले.त्यांनी सांगितले, राज्य सरकारकडे पैसे नाहीत. सरकारला जागतिक बँकेच्या पैशातून हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यासाठी शेतकºयांच्या जमिनीची संमतीपत्रे हवी आहेत. शेतकºयांच्या सातबाºयावर जागतिक बँकेकडून पैसा मिळवायचा आहे.कॉ. राम बाहेती यांनी सांगितले की, शेतकºयांच्या जमिनींची मोजणी झाली, संमतीपत्रे मिळाली, असे जिल्हा प्रशासन कितीही सांगत असले तरी ते खोटे आहे. कच्ची घाटी येथील जमिनीची अजून मोजणी झाली नाही. मोजणीसंदर्भात सातशे दावे दाखल आहेत. जिल्हा प्रशासन आठशे शेतकºयांच्या जमिनीची संमतीपत्रे मिळाली असे सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांनी आठ शेतकºयांची संमतीपत्रे दाखवावीत, असे आमचे आव्हान आहे. बेंदेवाडीच्या दोन शेतकºयांनी मात्र जमिनी दिलेल्या आहेत. प्रशासनातर्फे आताही वेगवेगळा अपप्रचार करून शेतकºयांना आमिषे दाखवण्यात येत आहेत. आजच्या आज जमीन दिली तरी २५ टक्के जादा भाव देऊ असेही शेतकºयांना सांगितले जात आहे; पण शेतकरी या प्रचाराला बळी पडत नाही.नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यांतील शेतकºयांनी आपली जमीन द्यायचीच नाही, असा ठाम निर्धार केला आहे, याकडे लक्ष वेधत कॉ. बाहेती यांनी मोपेलवारांना वाचवण्याचेच प्रयत्न सरकार करीत आहे. कारण त्यांची चौकशी निवृत्त न्यायाधीशांतर्फेच झाली पाहिजे तरच न्याय मिळेल, असे सांगितले.