शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
3
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
4
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
5
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
6
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
7
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
8
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
9
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
10
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
11
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
12
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
15
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
17
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
19
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
20
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी

समृद्धी महामार्ग आता होणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:24 IST

‘राधेश्याम मोपेलवार यांच्या निलंबनानंतर समृद्धी महामार्गाचे काम ठप्प झाले आहे. शिवाय या महामार्गासाठी लागणारे ४६ हजार कोटी रुपये कुठून उपलब्ध करायचे हा सरकारपुढे प्रश्न आहेच. सरकारच्या तिजोरीत तर पैसेच नाहीत, अशा अवस्थेत हा महामार्ग होईल, असे वाटत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘राधेश्याम मोपेलवार यांच्या निलंबनानंतर समृद्धी महामार्गाचे काम ठप्प झाले आहे. शिवाय या महामार्गासाठी लागणारे ४६ हजार कोटी रुपये कुठून उपलब्ध करायचे हा सरकारपुढे प्रश्न आहेच. सरकारच्या तिजोरीत तर पैसेच नाहीत, अशा अवस्थेत हा महामार्ग होईल, असे वाटत नाही. शिवाय या महामार्गासाठी शेतकरी आपल्या जमिनी द्यायला अजिबातच तयार नाही. त्यामुळे हा महामार्ग आता होणे नाही’ असा दावा आज येथे महाराष्टÑ राज्य किसान सभेचे सरचिटणीस कॉ. नामदेव गावडे व समृद्धी महामार्गविरोधी शेतकरी कृती समितीचे नेते कॉ. राम बाहेती यांनी केला.किसान सभेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत समृद्धी महामार्गाचा विषय निघाला. राधेश्याम मोपेलवारांच्या निलंबनानंतर समृद्धी महामार्गाची गती थांबलेली आहे. शेतकरीही आपल्या जमिनी द्यायला तयार नाहीत. कशा देतील? कारण जमिनीची काही वाढ होत नसते. ती गेली म्हणजे गेली. शेतकºयाला काही पैसे मिळतीलही; परंतु ते किती दिवस पुरतील? शेतकºयांची बरबादी कशासाठी? असे सवाल गावडे यांनी उपस्थित केले.त्यांनी सांगितले, राज्य सरकारकडे पैसे नाहीत. सरकारला जागतिक बँकेच्या पैशातून हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यासाठी शेतकºयांच्या जमिनीची संमतीपत्रे हवी आहेत. शेतकºयांच्या सातबाºयावर जागतिक बँकेकडून पैसा मिळवायचा आहे.कॉ. राम बाहेती यांनी सांगितले की, शेतकºयांच्या जमिनींची मोजणी झाली, संमतीपत्रे मिळाली, असे जिल्हा प्रशासन कितीही सांगत असले तरी ते खोटे आहे. कच्ची घाटी येथील जमिनीची अजून मोजणी झाली नाही. मोजणीसंदर्भात सातशे दावे दाखल आहेत. जिल्हा प्रशासन आठशे शेतकºयांच्या जमिनीची संमतीपत्रे मिळाली असे सांगत असले तरी प्रत्यक्षात त्यांनी आठ शेतकºयांची संमतीपत्रे दाखवावीत, असे आमचे आव्हान आहे. बेंदेवाडीच्या दोन शेतकºयांनी मात्र जमिनी दिलेल्या आहेत. प्रशासनातर्फे आताही वेगवेगळा अपप्रचार करून शेतकºयांना आमिषे दाखवण्यात येत आहेत. आजच्या आज जमीन दिली तरी २५ टक्के जादा भाव देऊ असेही शेतकºयांना सांगितले जात आहे; पण शेतकरी या प्रचाराला बळी पडत नाही.नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यांतील शेतकºयांनी आपली जमीन द्यायचीच नाही, असा ठाम निर्धार केला आहे, याकडे लक्ष वेधत कॉ. बाहेती यांनी मोपेलवारांना वाचवण्याचेच प्रयत्न सरकार करीत आहे. कारण त्यांची चौकशी निवृत्त न्यायाधीशांतर्फेच झाली पाहिजे तरच न्याय मिळेल, असे सांगितले.