शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात सर्वेक्षणानंतर ६४ बोअर प्रस्तावित

By admin | Updated: February 18, 2016 23:42 IST

हिंगोली : सर्वेक्षणानंतर ६४ बोअर तर १३ तात्पुरत्या पूरक योजनांची कामे करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात पाणीटंचाईवरील उपाययोजना करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व जि.प.च्या भूवैज्ञानिकांकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर ६४ बोअर तर १३ तात्पुरत्या पूरक योजनांची कामे करण्याची शिफारस करण्यात आली आहे.हिंगोली जिल्ह्यात टंचाई निवारणाचे काम गतिहीन असल्याच्या तक्रारी होत आहेत. वारंवार मागणी करूनही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षणच्या पाहणीनंतर खरोखर उपायांची गरज असलेल्या ठिकाणांना आता न्याय मिळेल काय, याची प्रतीक्षा आहे. यामध्ये ३00 गावांनी टंचाईत ३४१ बोअरचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी ६४ करण्यायोग्य आहेत. यात हिंगोली-१२, औंढा-१४, सेनगाव-१९, वसमत-११, कळमनुरी-८ अशी तालुकानिहाय संख्या आहे. तर १४२ अयोग्य असल्याचे मत नोंदविले आहे. त्याचबरोबर टंचाईत ७८ नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी ७३ चे सर्वेक्षण झाले. यात १९ प्रस्ताव योग्य आढळले. यात हिंगोली-३, औंढा-८, सेनगाव-९, वसमत-२, कळमनुरी-८ अशी तालुकानिहाय संख्या आहे. एकूण ४१ योग्य तर ३१ अयोग्य आढळले. तात्पुरत्या पूरक दुरुस्तीचे ४४ योजनांचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी २९ चे सर्वेक्षण झाले. यात हिंगोली-१0, सेनगाव-४ तर कळमनुरीतील दोन प्रस्ताव योग्य असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर औंढ्यात व वसमतमध्ये प्रत्येकी तीन ठिकाणचे टँकरचे प्रस्ताव योग्य असल्याचे आढळून आले आहे. १५ फेब्रुवारीअखेरचा हा अहवाल असून तो जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे. एवढे प्रस्ताव कामे करण्यायोग्य असल्याचा प्रशासनाचाच निर्वाळा असताना मंजुरी मात्र मिळत नसल्याची बोंब आहे.