शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

जिल्ह्यात सर्वेक्षणानंतर ६४ बोअर प्रस्तावित

By admin | Updated: February 18, 2016 23:42 IST

हिंगोली : सर्वेक्षणानंतर ६४ बोअर तर १३ तात्पुरत्या पूरक योजनांची कामे करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात पाणीटंचाईवरील उपाययोजना करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व जि.प.च्या भूवैज्ञानिकांकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर ६४ बोअर तर १३ तात्पुरत्या पूरक योजनांची कामे करण्याची शिफारस करण्यात आली आहे.हिंगोली जिल्ह्यात टंचाई निवारणाचे काम गतिहीन असल्याच्या तक्रारी होत आहेत. वारंवार मागणी करूनही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षणच्या पाहणीनंतर खरोखर उपायांची गरज असलेल्या ठिकाणांना आता न्याय मिळेल काय, याची प्रतीक्षा आहे. यामध्ये ३00 गावांनी टंचाईत ३४१ बोअरचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी ६४ करण्यायोग्य आहेत. यात हिंगोली-१२, औंढा-१४, सेनगाव-१९, वसमत-११, कळमनुरी-८ अशी तालुकानिहाय संख्या आहे. तर १४२ अयोग्य असल्याचे मत नोंदविले आहे. त्याचबरोबर टंचाईत ७८ नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी ७३ चे सर्वेक्षण झाले. यात १९ प्रस्ताव योग्य आढळले. यात हिंगोली-३, औंढा-८, सेनगाव-९, वसमत-२, कळमनुरी-८ अशी तालुकानिहाय संख्या आहे. एकूण ४१ योग्य तर ३१ अयोग्य आढळले. तात्पुरत्या पूरक दुरुस्तीचे ४४ योजनांचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी २९ चे सर्वेक्षण झाले. यात हिंगोली-१0, सेनगाव-४ तर कळमनुरीतील दोन प्रस्ताव योग्य असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर औंढ्यात व वसमतमध्ये प्रत्येकी तीन ठिकाणचे टँकरचे प्रस्ताव योग्य असल्याचे आढळून आले आहे. १५ फेब्रुवारीअखेरचा हा अहवाल असून तो जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे. एवढे प्रस्ताव कामे करण्यायोग्य असल्याचा प्रशासनाचाच निर्वाळा असताना मंजुरी मात्र मिळत नसल्याची बोंब आहे.