शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाने मंजूर केलेल्या ६६ पैकी ५७ महाविद्यालयांचे प्रस्ताव फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:05 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने मंजूर केलेल्या नव्याने सुरू करण्यासाठीचे ६६ पैकी ५७ महाविद्यालयांचे प्रस्ताव सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ...

औरंगाबाद : राज्य शासनाने मंजूर केलेल्या नव्याने सुरू करण्यासाठीचे ६६ पैकी ५७ महाविद्यालयांचे प्रस्ताव सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेटाळण्यात आले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाने ४, तर व्यवस्थापन परिषदेने १ अशा पाच महाविद्यालयांची सकारात्मक शिफारस केली आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या २३ फेब्रुवारीच्या बैठकीत निकषात बसणारे १५ प्रस्ताव सोडून उर्वरित २३८ कॉलेजचे प्रस्ताव फेटाळले होते. मात्र, विद्यापीठाचा विरोध पत्करून १६ मार्चला राज्य सरकारने सर्व प्रस्ताव मागवून घेत सरकारने विद्यापीठ कार्यक्षेत्रात ६६ कॉलेज मंजूर केली होती. यात बहुतांश महाविद्यालये राजकीय पुढाऱ्यांची होती. त्यापैकी ५७ प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेने पुन्हा फेटाळले आहेत. केवळ ५ महाविद्यालयांची सकारात्मक शिफारस बैठकीत करण्यात आली. एका महाविद्यालयाने पुढील वर्षी सुरू करण्याची विनंती केली, तर ४ महाविद्यालयांनी प्रस्तावच दाखल केले नाही. व्यवस्थापन परिषदेने शिफारस केलेेल्या महाविद्यालयालाही यावर्षी केवळ कला व वाणिज्य शाळा, तर पुढील वर्षी विज्ञान शाखा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासह कंत्राटी कर्मचारी नियुक्ती, सुरक्षा रक्षक नियुक्तीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत किशोर शितोळे, डॉ. नरेंद्र काळे, राहुल म्हस्के, डॉ. फुलचंंद सलामपुरे, संजय निंबाळकर, डॉ. राजेश करपे, डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. जयसिंगराव देशमुख, सुनील निकम, प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाट, कुलसचिव तथा सदस्य सचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह सर्व सदस्यांची उपस्थिती होती.

चौकट...

प्रशासकीय इमारतीसमोर शिवाजी महाराजांचा पुतळा

विद्यापीठात प्रशासकीय इमारतीसमोर सिटी बस स्थानक परिसरात शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास मान्यता देण्यात आली .

चौकट...

पांडव यांच्या नियुक्तीवरून खडाजंगी

विद्यापीठातील गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. रमेश पांडव यांच्या नियुक्तीवरून व्यवस्थापन परिषदेच्या बैठक सदस्यांची दीड तास खडाजंगी झाली. याप्रकरणी ठराव घेणे योग्य नसल्याचे म्हणत पुढील एका महिन्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन कुलगुरुंनी दिल्यावर सभेचे कामकाज सुरळीत झाले.