शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

५०० गावांत शुद्ध पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव

By admin | Updated: August 8, 2014 00:38 IST

नांदेड : जिल्ह्यातील ४९५ गावांनी केंद्र शासनाच्या मागासक्षेत्र अनुदान निधीतून गावासाठी शुध्द पाणीपुरवठा यंत्र बसविण्याचे प्रस्ताव ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर केले आहेत़

नांदेड : जिल्ह्यातील ४९५ गावांनी केंद्र शासनाच्या मागासक्षेत्र अनुदान निधीतून गावासाठी शुध्द पाणीपुरवठा यंत्र बसविण्याचे प्रस्ताव ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर केले आहेत़ हे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करून सदर आराखड्यास राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे़जिल्ह्यातील अनेक गावांत दुषीत पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत़ त्याचवेळी किनवट व माहूर तालुक्यासह अन्य भागातही काही गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़ येथील नागरिक विविध आजारांशी लढा देत आहेत़ ही बाब लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी गावांमध्ये पाणीपुरवठा यंत्र बसविण्याबाबत चाचपणी केली़ त्यानुसार केंद्र शासनाच्या मागास क्षेत्र अनुदान निधीतून हा आरोग्यदायी प्रकल्प राबविण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील जवळपास ५०० गावांनी शुध्द पाणीपुरवठा यंत्राबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत़ या सर्व गावातील यंत्रांसाठी जवळपास १६ कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे़ प्रत्येक गावातील लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा यंत्र बसविले जाणार आहेत़ एका यंत्रासाठी ३ लाखांपर्यंतचा खर्च अपेक्षीत आहे़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने या यंत्रांसाठी अपेक्षीत किंमतीच्या निविदा मागविल्या आहेत़ राज्यभरातील विविध कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या असून त्याची छाननी केली जात आहे़ मागास क्षेत्र अनुदान निधी प्राप्त होताच प्रस्ताव आलेल्या गावात पाणी शुध्दीकरण यंत्र बसविण्यात येथील अशी माहिती प्रभारी प्रकल्प संचालक गुलाबसिंह राठोड यांनी दिली़ (प्रतिनिधी)