शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

५०० गावांत शुद्ध पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव

By admin | Updated: August 8, 2014 00:38 IST

नांदेड : जिल्ह्यातील ४९५ गावांनी केंद्र शासनाच्या मागासक्षेत्र अनुदान निधीतून गावासाठी शुध्द पाणीपुरवठा यंत्र बसविण्याचे प्रस्ताव ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर केले आहेत़

नांदेड : जिल्ह्यातील ४९५ गावांनी केंद्र शासनाच्या मागासक्षेत्र अनुदान निधीतून गावासाठी शुध्द पाणीपुरवठा यंत्र बसविण्याचे प्रस्ताव ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर केले आहेत़ हे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करून सदर आराखड्यास राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे़जिल्ह्यातील अनेक गावांत दुषीत पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत़ त्याचवेळी किनवट व माहूर तालुक्यासह अन्य भागातही काही गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़ येथील नागरिक विविध आजारांशी लढा देत आहेत़ ही बाब लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी गावांमध्ये पाणीपुरवठा यंत्र बसविण्याबाबत चाचपणी केली़ त्यानुसार केंद्र शासनाच्या मागास क्षेत्र अनुदान निधीतून हा आरोग्यदायी प्रकल्प राबविण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील जवळपास ५०० गावांनी शुध्द पाणीपुरवठा यंत्राबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत़ या सर्व गावातील यंत्रांसाठी जवळपास १६ कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे़ प्रत्येक गावातील लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा यंत्र बसविले जाणार आहेत़ एका यंत्रासाठी ३ लाखांपर्यंतचा खर्च अपेक्षीत आहे़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने या यंत्रांसाठी अपेक्षीत किंमतीच्या निविदा मागविल्या आहेत़ राज्यभरातील विविध कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या असून त्याची छाननी केली जात आहे़ मागास क्षेत्र अनुदान निधी प्राप्त होताच प्रस्ताव आलेल्या गावात पाणी शुध्दीकरण यंत्र बसविण्यात येथील अशी माहिती प्रभारी प्रकल्प संचालक गुलाबसिंह राठोड यांनी दिली़ (प्रतिनिधी)