शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

जिल्ह्यात केंद्रवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे

By admin | Updated: September 23, 2014 01:39 IST

औरंगाबाद : नवीन मतदारांची संख्या वाढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. जिल्ह्यातील ११७ मतदान केंद्रे वाढविण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे

औरंगाबाद : नवीन मतदारांची संख्या वाढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. जिल्ह्यातील ११७ मतदान केंद्रे वाढविण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील मतदारांची संख्या २३ लाख इतकी होती, लोकसभा निवडणुकीनंतर आयोगाने सातत्याने मतदार नोंदणी मोहीम राबविली. त्यामुळे आता जिल्ह्यातील मतदारांची संख्या २४ लाख ४४ हजार इतकी झाली आहे. मतदारांची संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्याही वाढवावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या लक्षात घेऊन ११७ नवीन मतदान केंद्रे निर्माण करण्याचा प्रस्ताव आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या २७४७ वर पोहोचणार आहे. नवीन मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक ३७ केंदे्र औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात आणि ३५ मतदान केंदे्र औरंगाबाद मध्य मतदारसंघात प्रस्तावित करण्यात आली आहेत.औरंगाबाद पूर्व मतदारसंघातही ११ नवीन मतदान केंदे्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच गंगापूर मतदारसंघात १६, वैजापूर मतदारसंघात ३, पैठण मतदारसंघात ८, सिल्लोड मतदारसंघात ४, कन्नड मतदारसंघात २ आणि फुलंब्री मतदारसंघात १ नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने काही मतदान केंद्रांच्या जागांमध्ये बदल प्रस्तावित केले आहेत. जिल्ह्यातील १८४ मतदान केंद्रांच्या बाबतीत असे बदल सुचविले आहेत. मतदारांना अधिक सोयिस्कर ठरण्याच्या दृष्टीने हे बदल सुचविले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वाधिक ६७ केंद्रांचे बदल औरंगाबाद मध्य मतदारसंघात सुचविण्यात आले आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातही ५१ मतदान केंद्रांमध्ये बदल सुचविण्यात आले आहेत.