शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

जिल्ह्यात केंद्रवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे

By admin | Updated: September 23, 2014 01:39 IST

औरंगाबाद : नवीन मतदारांची संख्या वाढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. जिल्ह्यातील ११७ मतदान केंद्रे वाढविण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे

औरंगाबाद : नवीन मतदारांची संख्या वाढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. जिल्ह्यातील ११७ मतदान केंद्रे वाढविण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील मतदारांची संख्या २३ लाख इतकी होती, लोकसभा निवडणुकीनंतर आयोगाने सातत्याने मतदार नोंदणी मोहीम राबविली. त्यामुळे आता जिल्ह्यातील मतदारांची संख्या २४ लाख ४४ हजार इतकी झाली आहे. मतदारांची संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्याही वाढवावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या लक्षात घेऊन ११७ नवीन मतदान केंद्रे निर्माण करण्याचा प्रस्ताव आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या २७४७ वर पोहोचणार आहे. नवीन मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक ३७ केंदे्र औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात आणि ३५ मतदान केंदे्र औरंगाबाद मध्य मतदारसंघात प्रस्तावित करण्यात आली आहेत.औरंगाबाद पूर्व मतदारसंघातही ११ नवीन मतदान केंदे्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच गंगापूर मतदारसंघात १६, वैजापूर मतदारसंघात ३, पैठण मतदारसंघात ८, सिल्लोड मतदारसंघात ४, कन्नड मतदारसंघात २ आणि फुलंब्री मतदारसंघात १ नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने काही मतदान केंद्रांच्या जागांमध्ये बदल प्रस्तावित केले आहेत. जिल्ह्यातील १८४ मतदान केंद्रांच्या बाबतीत असे बदल सुचविले आहेत. मतदारांना अधिक सोयिस्कर ठरण्याच्या दृष्टीने हे बदल सुचविले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वाधिक ६७ केंद्रांचे बदल औरंगाबाद मध्य मतदारसंघात सुचविण्यात आले आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातही ५१ मतदान केंद्रांमध्ये बदल सुचविण्यात आले आहेत.