शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

प्रचाराची रणधुमाळी थांबली; फोडाफोडी, पाठिंब्याच्या राजकारणाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 14:31 IST

सर्वच उमेदवारांनी वाहन रॅली, प्रचार पदयात्रांवर भर देऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी रविवारी थांबली असून, उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरणाºया भोंग्यांचा आवाज बंद झाला आहे. आता गुफ्तगू आणि फोडाफोडीच्या राजकारणासह विविध संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सोमवारी दिवसभर धावपळ सुरू असणार आहे. लोकसभा निवडणूक प्रचार रविवारी सायंकाळी ५ वा. संपला. शेवटच्या दिवशी पूर्ण शक्तिप्रदर्शनाने सर्वच उमेदवारांनी वाहन रॅली, प्रचार पदयात्रांवर भर देऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुकीच्या मैदानात २३ उमेदवार आहेत. यामध्ये शिवसेना- भाजप महायुती, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी, एमआयएम, अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. चौरंगी लढतीमुळे मैदान कोण मारणार, हे अस्पष्ट आहे. कडक उन्हाळ्यात निवडणुका असल्यामुळे सर्वच उमेदवारांचा प्रचार करताना घाम निघाला. २८ मार्चपासून उमेदवार अर्ज भरण्याची मुदत होती. 

८ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर लोकसभा मैदानाचे चित्र स्पष्ट झाले. २३ उमेदवार मैदानात राहिले. पदयात्रा, रिक्षा, सभा, कॉर्नर बैठका घेऊन मागील पंधरा दिवस पूर्ण मतदारसंघात रणधुमाळी सुरू राहिली. जिल्हा प्रशासनाने ‘एक खिडकी’तून वाहन रॅली, प्रचार सभांसह प्रचार वाहनांना परवानगी दिली. अंदाजे ३०० हून अधिक रिक्षा, चारचाकी प्रचारात होत्या. रविवारी सायंकाळी ५ वा. प्रचार तोफा थंडावल्यानंतर सर्व पक्ष-अपक्ष उमेदवारांनी प्रचार वाहनांचा आढावा घेत त्यावरील भोंगे, स्पीकर्स, बॅनर्स, झेंडे काढून घेतले की नाहीत, याचा आढावा घेतला. 

स्टार प्रचारकांच्या सभांचा बोलबालाया वेळच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचाराकांच्या सभा झाल्या. शिवसेनेच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, आ. टी. राजासिंग, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रा. नितीन बानगुडे यांच्या सभा झाल्या. कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी खा. नवज्योतसिंग सिद्धू, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण आदींच्या सभा झाल्या. जालना लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीस, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, गडकरी आदींच्या सभा झाल्या. एमआयएम उमेदवाराच्या प्रचारासाठी खा. असदोद्दीन ओवेसी, भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभा झाल्या. काही अपक्ष उमेदवारांनी स्वत:च सभा घेऊन प्रमुख पक्षातील उमेदवारांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019