शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

प्रचाराची रणधुमाळी थांबली; फोडाफोडी, पाठिंब्याच्या राजकारणाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 14:31 IST

सर्वच उमेदवारांनी वाहन रॅली, प्रचार पदयात्रांवर भर देऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी रविवारी थांबली असून, उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरणाºया भोंग्यांचा आवाज बंद झाला आहे. आता गुफ्तगू आणि फोडाफोडीच्या राजकारणासह विविध संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सोमवारी दिवसभर धावपळ सुरू असणार आहे. लोकसभा निवडणूक प्रचार रविवारी सायंकाळी ५ वा. संपला. शेवटच्या दिवशी पूर्ण शक्तिप्रदर्शनाने सर्वच उमेदवारांनी वाहन रॅली, प्रचार पदयात्रांवर भर देऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुकीच्या मैदानात २३ उमेदवार आहेत. यामध्ये शिवसेना- भाजप महायुती, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी, एमआयएम, अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. चौरंगी लढतीमुळे मैदान कोण मारणार, हे अस्पष्ट आहे. कडक उन्हाळ्यात निवडणुका असल्यामुळे सर्वच उमेदवारांचा प्रचार करताना घाम निघाला. २८ मार्चपासून उमेदवार अर्ज भरण्याची मुदत होती. 

८ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर लोकसभा मैदानाचे चित्र स्पष्ट झाले. २३ उमेदवार मैदानात राहिले. पदयात्रा, रिक्षा, सभा, कॉर्नर बैठका घेऊन मागील पंधरा दिवस पूर्ण मतदारसंघात रणधुमाळी सुरू राहिली. जिल्हा प्रशासनाने ‘एक खिडकी’तून वाहन रॅली, प्रचार सभांसह प्रचार वाहनांना परवानगी दिली. अंदाजे ३०० हून अधिक रिक्षा, चारचाकी प्रचारात होत्या. रविवारी सायंकाळी ५ वा. प्रचार तोफा थंडावल्यानंतर सर्व पक्ष-अपक्ष उमेदवारांनी प्रचार वाहनांचा आढावा घेत त्यावरील भोंगे, स्पीकर्स, बॅनर्स, झेंडे काढून घेतले की नाहीत, याचा आढावा घेतला. 

स्टार प्रचारकांच्या सभांचा बोलबालाया वेळच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचाराकांच्या सभा झाल्या. शिवसेनेच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, आ. टी. राजासिंग, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रा. नितीन बानगुडे यांच्या सभा झाल्या. कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी खा. नवज्योतसिंग सिद्धू, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण आदींच्या सभा झाल्या. जालना लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीस, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, गडकरी आदींच्या सभा झाल्या. एमआयएम उमेदवाराच्या प्रचारासाठी खा. असदोद्दीन ओवेसी, भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभा झाल्या. काही अपक्ष उमेदवारांनी स्वत:च सभा घेऊन प्रमुख पक्षातील उमेदवारांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019